शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शोध नव्या मित्रांचा!, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 04:20 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार हे स्पष्ट दिसत आहे. सुमारे दोन-अडीच दशके परस्परांचे मित्र राहिलेल्या शिवसेना-भाजपाची युती मागील

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार हे स्पष्ट दिसत आहे. सुमारे दोन-अडीच दशके परस्परांचे मित्र राहिलेल्या शिवसेना-भाजपाची युती मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटल्यावर सत्तेकरिता हातात हात घेतलेल्या दोन्ही काँग्रेसही वेगळ्या झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे राज्यात भाजपाशी युती नाही, असे जाहीर केल्यापासूनच शिवसेनेने नव्या मित्रांचा शोध सुरू केला होता. जेव्हा ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल सुरू झाली तेव्हा शिवसेनेचा ग्रामीण भागातील पाया किती मजबूत आहे, हा मुद्दा समोर आला; आणि भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्याप्रमाणे भाजपाला रोखण्यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र आले तोच राजकीय पॅटर्न पुन्हा राबवावा, याची चाचपणी सुरू झाली. ग्रामीण भागात- त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांत युती करायची झाली, तर त्यातून एखाद्या ठिकाणी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका पत्करावा लागतो. त्याची तयारी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्षाच्या सेक्युलर गटाने दाखवली. भाजपाला रोखण्याच्या मुद्द्यावर हे पक्ष एकत्र आले. त्यातून त्यांचे संख्याबळ, मतांची टक्केवारी आणि ग्रामीण भागातील विस्तार वाढला. एवढेच नव्हेतर, ५५ वर्षांनी जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेच्या हाती आली. या निवडणुकीत भाजपाचेही नुकसान झाले नाही. त्यांच्याही मतांची टक्केवारी मागील वेळेपेक्षा वाढली; पण त्यात पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांचा करिष्मा अधिक होता, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपानेही प्रयत्न केले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नसला; तरी सत्ता या एकमेव उद्दिष्टासाठी शिवसेना आणि भाजपा भविष्यात कोणताही मार्ग चोखाळण्यास तयार आहेत, हेच यातून दिसून आले. होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाची तयारी असेल की लोकसभा-विधानसभेसाठीची व्यूहरचना त्यातही शिवसेनाच तुलनेने अधिक आक्रमकरीत्या पुढे असल्याचे दिसते. संपूर्ण जिल्ह्यात एका व्यक्तीच्या हाती असलेले नेतृत्व हा शिवसेनेचा ‘प्लस पॉइंट’ आहे. त्या तुलनेत पारिवारिक मदत घेऊनही भाजपाला पक्षांतर्गत गट-तट यांचा सामना करावा लागतो आहे. पण जिल्हा परिषदेच्या राजकारणाने दोन्ही पक्षांतील राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. परिणामी, लोकसभा-विधानसभेच्या उमेदवार बदलाबदलीपासून, पक्षांतरापर्यंत अनेक घडामोडी घडतील. तसे झाले तर ठाणे जिल्ह्याचे राजकीय चित्र आमूलाग्र बदलून जाईल. त्याची ही नांदी मानायला हरकत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस