शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शोध नव्या मित्रांचा!, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 04:20 IST

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार हे स्पष्ट दिसत आहे. सुमारे दोन-अडीच दशके परस्परांचे मित्र राहिलेल्या शिवसेना-भाजपाची युती मागील

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयाला येणार हे स्पष्ट दिसत आहे. सुमारे दोन-अडीच दशके परस्परांचे मित्र राहिलेल्या शिवसेना-भाजपाची युती मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी तुटल्यावर सत्तेकरिता हातात हात घेतलेल्या दोन्ही काँग्रेसही वेगळ्या झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे राज्यात भाजपाशी युती नाही, असे जाहीर केल्यापासूनच शिवसेनेने नव्या मित्रांचा शोध सुरू केला होता. जेव्हा ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची हालचाल सुरू झाली तेव्हा शिवसेनेचा ग्रामीण भागातील पाया किती मजबूत आहे, हा मुद्दा समोर आला; आणि भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्याप्रमाणे भाजपाला रोखण्यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र आले तोच राजकीय पॅटर्न पुन्हा राबवावा, याची चाचपणी सुरू झाली. ग्रामीण भागात- त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांत युती करायची झाली, तर त्यातून एखाद्या ठिकाणी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका पत्करावा लागतो. त्याची तयारी शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्षाच्या सेक्युलर गटाने दाखवली. भाजपाला रोखण्याच्या मुद्द्यावर हे पक्ष एकत्र आले. त्यातून त्यांचे संख्याबळ, मतांची टक्केवारी आणि ग्रामीण भागातील विस्तार वाढला. एवढेच नव्हेतर, ५५ वर्षांनी जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेच्या हाती आली. या निवडणुकीत भाजपाचेही नुकसान झाले नाही. त्यांच्याही मतांची टक्केवारी मागील वेळेपेक्षा वाढली; पण त्यात पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांचा करिष्मा अधिक होता, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. निकालानंतर सत्तास्थापनेसाठी भाजपानेही प्रयत्न केले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नसला; तरी सत्ता या एकमेव उद्दिष्टासाठी शिवसेना आणि भाजपा भविष्यात कोणताही मार्ग चोखाळण्यास तयार आहेत, हेच यातून दिसून आले. होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाची तयारी असेल की लोकसभा-विधानसभेसाठीची व्यूहरचना त्यातही शिवसेनाच तुलनेने अधिक आक्रमकरीत्या पुढे असल्याचे दिसते. संपूर्ण जिल्ह्यात एका व्यक्तीच्या हाती असलेले नेतृत्व हा शिवसेनेचा ‘प्लस पॉइंट’ आहे. त्या तुलनेत पारिवारिक मदत घेऊनही भाजपाला पक्षांतर्गत गट-तट यांचा सामना करावा लागतो आहे. पण जिल्हा परिषदेच्या राजकारणाने दोन्ही पक्षांतील राजकारणाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. परिणामी, लोकसभा-विधानसभेच्या उमेदवार बदलाबदलीपासून, पक्षांतरापर्यंत अनेक घडामोडी घडतील. तसे झाले तर ठाणे जिल्ह्याचे राजकीय चित्र आमूलाग्र बदलून जाईल. त्याची ही नांदी मानायला हरकत नाही.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस