शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

भारतीय प्रजासत्ताकासमोर आर्थिक विषमतेचे नवे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:15 IST

आज दिनांक २६ जानेवारी, २०१९ रोजी भारतीय प्रजासत्ताक ७० वर्षांचे झाले.

- डॉ. सुरेश मानेआज दिनांक २६ जानेवारी, २०१९ रोजी भारतीय प्रजासत्ताक ७० वर्षांचे झाले. राज्यघटनाकारांनी हजारो वर्षांच्या अमानवी परंपरा, चालीरीती, सामाजिक बंधने, विशिष्ट वर्गाचे वर्चस्व, राजेशाही आणि नवाबशाही या सर्वांना मूठमाती देत, भारतीय समाजात आमूलाग्र सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक बदलाचा दिलेला आराखडा म्हणजे भारतीय संविधान होय. संविधानकर्ते यांच्या धोरणानुसार लोकशाही, न्यायपालिका व नागरिकांचे स्वतंत्र अधिकार अशा विविध स्तंभावर कल्याणकारी राज्याची संकल्पना उभी करीत नव्या भारताची मांडणी राज्यघटनेने केली आहे.गेल्या ६९ वर्षांमध्ये भारतीय प्रजासत्ताकाचा आढावा घेताना आपणास हे मान्य करावे लागेल की, सुरुवातीला अनेक विचारवंत, विद्वान, विरोधक यांनी असे भाकीत केले होते की, हे संविधान व लोकशाही टिकणार नाही, परंतु ७० वर्षांनंतर हे खोटे सिद्ध झालेले आहे. याचा अर्थ, सर्व प्रवास हा सुखकर झालेला आहे असे मात्र नाही. कारण या कालखंडात भारतीय संविधान व लोकशाही यांच्यावर सत्ताधारी वर्ग व इतरांकडून वारंवार हल्ले झालेले आहेतच. त्यातून अगदी न्यायपालिकाही सुटलेली नाही. तरीदेखील दिवसेंदिवस भारतात संविधान संस्कृतीला सनातनी संस्कृतीद्वारा आव्हान दिले जात असतानाही देशात संविधान संस्कृतीची वाढ होत आहे. लोकशाहीची पाळेमुळे वृद्धिंगत होत आहेत. ही समाधानाची बाब होय.राज्यघटनेने भारतीय समाजाची पुनर्रचनाच केलेली आहे. त्यामुळे ज्यांच्या प्रस्थापित हितसंबंधांना बाधा पोहोचली आहे. ते सर्व पूर्ण ताकदीनिशी घटनात्मक मूल्यांना तिलांजली देण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहेत, परंतु सुदैवाने ते सर्व अपयशी होत आहेत आणि म्हणूनच देशातील सर्व शोषित वंचित समाजघटकांना शासन-प्रशासनामध्ये भागीदारी देऊन राज्यघटनेने खऱ्या अर्थाने लोकांचा भारत उभा केलेला आहे, हे नि:संशय.जागतिकीकरणाच्या आव्हानानंतर भारतीय राज्यघटना आणि लोकशाही यांच्यासमोर नवीन अर्थव्यवस्थेची आव्हाने व जागतिक बंधनांची मर्यादा येऊन पडल्या. पर्यायाने सार्वभौम देशाची आर्थिक सार्वभौमता जागतिक सार्वभौमतेच्या कचाट्यात सापडली. परिणामत: भारतीय प्रजासत्ताकाचा प्रवास हा राष्ट्रीयीकरणाकडून खासगीकरणाकडे सुरू झाला आणि राज्याची लोककल्याणकारी भूमिका याला सुरुंग लागल्यामुळे शिक्षण, स्वास्थ, सामाजिक सुरक्षा व सबलीकरणाच्या राज्याच्या योजना पुरेशा नितीअभावी मागे पडू लागल्या आहेत, तर गरीब शेतकरी बी-बियाण्यांच्या अनुदानाला महाग झाला आहे. दुसºया बाजूला नव्या अर्थव्यवस्थेत उद्योगपती व भांडवलदार हे करोडो रुपयांच्या अनुदानाचा उपभोग घेत आहेत. या प्रक्रियेला गेल्या वीस वर्षांत अतिशय गतिमान केल्यामुळे भारतीय समाजवादी प्रजासत्ताक हळूहळू क्रोनी कॅपिटलझिमच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न होय. संविधानकर्ते व संविधान या दोघांनाही हे अपेक्षित नव्हते आणि म्हणून भारतीय राज्यकर्ते, नियोजनकर्ते यांना आपल्या धोरणांवर पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे.आता घटनात्मक संस्थांसमोर नवीन आव्हाने ठाकलेली आहेत. सीबीआय, न्यायव्यवस्था, आरबीआय अशा स्वायत्त संस्था वादाच्या भोवºयात सापडलेली आहेत. ईव्हीएमच्या वादामुळे निकोप लोकशाहीच्या विश्वासाला तडा जात आहे, तर निवडणुकीतील काळ्या पैशाचा अमाप वापर हे निवडणूक प्रक्रियेसमोर आव्हान उभे आहे. एक टक्का लोकांकडे ७३ टक्के संपत्ती एकवटली असून, सामाजिक विषमतेचे भूत गाडीत असताना आपल्या प्रजासत्ताकासमोर आर्थिक विषमतेचे नवीन आव्हान उभे राहिले आहे. अनियंत्रित सत्तेच्या नावाखाली मूलभूत स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना व अनेक समाजघटकांचे मानवी अधिकार डावलले जात असताना, विकासाच्या अजेंड्यावर सर्वसमावेशक विकास की, विशेष घटकांचा विकास हा प्रश्न निर्माण झाला आहे. थोडक्यात काय, तर २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अनेक इशाºयांकडे आपण दुर्लक्ष केल्याने भविष्यात देशाला कोणती किंमत चुकवावी लागेल, याचा अंदाज आजच्या घडामोडीतून आपणास येत आहे. अशा कठीण समयी देशात संविधान संस्कृती, प्रजासत्ताक संस्कृती ही सुदृढ करणे हेच प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य होय.एकंदरीत गेल्या ७० वर्षांतील भारतीय प्रजासत्ताकाचा प्रवास हा संमिश्र यशापयशाचा आहे. संविधानाने निर्माण केलेली राज्यसंस्था जिचा ग्रामपातळीपासून संसदेपर्यंत विस्तार आहे, तिला कल्याणकारी राज्याचा आधार आहे. शिक्षण, दरडोई उत्पन्नात वाढ होत असताना मानवी विकासाचा निर्देशांक घटनाकारांना अपेक्षित असलेल्या गतीनुसार वाढला का, हा आपल्या समीक्षणाचा विषय नक्कीच होय.(घटना अभ्यासक)

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन