शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

दुष्काळावर दीर्घकालीन उपायांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 6:01 AM

- सयाजी शिंदे सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी पडला, म्हणून दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे, परंतु पाऊस कमी पडणे हा ...

- सयाजी शिंदे

सध्या महाराष्ट्रात पाऊस कमी पडला, म्हणून दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे, परंतु पाऊस कमी पडणे हा जर दुष्काळ असेल, तर इस्रायलमध्ये महाराष्ट्राच्या पावसाच्या निम्म्यासुद्धा पाऊस पडत नाही, पण तिथे कधीच दुष्काळ पडलेला नसतो. मग पाऊस कमी पडणे म्हणजे दुष्काळ ही आपली विचार करण्याची पद्धत कधीतरी बदलण्याची गरज आहे. आपण ज्याला दुष्काळ म्हणतो, तो शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास दुष्काळ नसतो, तर ती असते अनावृष्टी.

अनावृष्टी म्हणजे कमी पाऊस पडणे. कमी पाऊस म्हणजे दुष्काळ असे काही नाही. निसर्गात कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे आपल्या मनात दुष्काळ निर्माण होतो, परंतु पाऊस कमी पडला, तरीसुद्धा शेती व्यवसायाचे व्यवस्थापन कौशल्याने केले, तर या अनावृष्टीतही मनामध्ये सुकाळ निर्माण करता येतो. तेव्हा दुष्काळ-सुकाळ या मनाच्या भावना आहेत. मनाचा हिय्या करून दुष्काळावर मात करायचा प्रयत्न केला, तर दुष्काळ आपल्या जीवनातून हद्दपार होऊ शकतो, पण तसे करण्याऐवजी दुष्काळावर नेहमीच वरवरची मलमपट्टी केली जाते. शासकीय पातळीवर किंवा राजकीय पातळीवर कोठे तरी दुष्काळाचे कायमचे उच्चाटन करण्याचा विचार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या मलमपट्टीवरचा खर्च सुरूच राहणार आहे. सर्वप्रथम दुष्काळात कोणासमोर हात पसरण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दिवडी गावातील निसर्गाशी, झाडांशी नाते जोडत आम्ही सह्याद्री देवराई या संस्थेद्वारे वृक्षारोपण, संवर्धनाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणला. देवराई ही संकल्पना फार प्राचीन असून, गावागावांतून अतिशय महत्त्वाचे जीवनदायी वृक्ष देवळाच्या परिसरात आवर्जून लावले जायचे आणि त्यांची निगा व संरक्षण गावकरी करायचे, तसेच एखादा वृक्ष स्वत:साठी अथवा गावासाठी तोडायचा झाल्यास अगोदर देवाला कौल लावायचे व कौल मिळाला, तरच तोडत. आता मात्र देवराया गेल्या. मानवाने आपल्या हव्यासापोटी सर्व देवराया तोडल्या. कुणीही त्याचे पुनर्वसन केले नाही. आज महाराष्ट्रात काहीच गावांत देवराया अस्तित्वात आहेत. हाच धागा पकडून निसर्ग जागर प्रतिष्ठानने देवराया निर्माण करण्यासाठी सह्याद्री देवराई प्रकल्प हाती घेत राज्यभर त्याचा प्रचार व प्रसार केला जो अतिशय यशस्वी ठरला.

पाणीटंचाई, दुष्काळ या समस्या जशा भौगोलिक आहेत, तशाच मानवनिर्मितही आहेत आणि या समस्यांवर दीर्घकालीन उपायही आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. दुष्काळी भागाच्या विकासासाठी नेमके काय करायचे, याचा विचार करीत असताना अभ्यासाअंती काही गोष्टी लक्षात आल्या. सातारा जिह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी, दिवडी या गावांमध्ये ४५ हजार देशी झाडे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून लावण्यात आली. निसर्गाशी आपणच चुकीचे वागू लागलो की, त्याची भरपाई आपल्याला करावी लागतेच. दुष्काळ, पाणीटंचाई, हवामानातला कमालीचा बदल हे या ओघाने येतेच. या चुका सुधारण्यासाठी वृक्षारोपणाला प्राधान्य देण्याची फार गरज आहे. टँकरमुक्त महाराष्ट्र हे तर अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले स्वप्न. हे स्वप्न केवळ स्वप्नच राहू नये, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सध्या हातभार लावत आहेत. जलसंधारणाची अनेक कामे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात होताना दिसतात. साताऱ्यातील वावरहिरे आणि परिसरातील गावे टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आणि या गावांतील पाण्याचा साठा वाढविण्यात आम्हाला यश आले आहे. राज्यातील अनेक गावांत गावकरी एकत्र येत आहेत. श्रमदान करत ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशमधील गावकरी, शेतकºयांनी वृक्षलागवड, श्रमदान, पाणीबचतीचे महत्त्व ओळखले, तर अनेक समस्या नक्कीच सुटतील.

पाऊस कमी-जास्त पडत राहणारच, पण म्हणून आपण सतत दुष्काळ दुष्काळ म्हणून ओरडत राहणार का, हा प्रश्न आहे. मलमपट्टी सुरू असतानाच खोल जखमांवर कायमचा इलाज करण्याचे उपायही सुरू राहिले पाहिजेत, दरसाल पडणारा पाऊस जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवत असतो, परंतु पातळी वाढविण्याच्या वेगापेक्षा जमिनीतले पाणी उपसण्याचा वेग मोठा आहे. त्यामुळे दरसाल एक फूट पाणी वाढते आणि आपण दोन फूट पाणी उपसतो. आपण दरवर्षी जेवढे पाणी उपसतो, त्यापेक्षा अधिक पाणी पावसाळ्यात जमिनीत मुरविले, तरच जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढणार आहे. प्रत्येक जण ट्युबवेल खोदून आणि त्यावर मोटारी बसवून पाणी खेचत आहे, पण तेवढेच पाणी जिरविण्याची दक्षता मात्र घेत नाही.

दुष्काळावर मात करायची तर गरज आहेच, पण लोकसहभागातून ही लोकचळवळ यशस्वी करण्याची, पर्यावरण व जैवविविधता संवर्धनाचा हा प्रयोग म्हणजे हिरवाईची चळवळ आहे. ही हिरवाई निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व ते जगवावे अशी अपेक्षा आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रwater scarcityपाणी टंचाई