शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिक्षणाच्या नावानं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:56 IST

शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची सुमार कामगिरी तिसऱ्यांदा अधोरेखित झाली. वस्तुत: गेल्या वर्षी निकालगोंधळाने विद्यापीठाची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली, कुलपती या नात्याने राज्यपालांना त्यात हस्तक्षेप करावा लागला, त्यातूनच त्यांच्या कारभाराचे धिंडवडे निघाले होते.

शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाची सुमार कामगिरी तिसऱ्यांदा अधोरेखित झाली. वस्तुत: गेल्या वर्षी निकालगोंधळाने विद्यापीठाची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली, कुलपती या नात्याने राज्यपालांना त्यात हस्तक्षेप करावा लागला, त्यातूनच त्यांच्या कारभाराचे धिंडवडे निघाले होते. त्यावर या यादीने शिक्कामोर्तब केले, इतकेच. उच्च आणि तंत्रशिक्षणाचे खाजगीकरण महाराष्ट्रात ज्या झपाट्याने झाले, त्यातून स्पर्धा वाढणे आणि दर्जात सुधारणा होणे अपेक्षित होते. पण या व्यवस्थेने शिक्षणसम्राटांना जन्म दिला, शिक्षण सामान्यांच्या आवाक्याबाहेर नेले आणि दर्जाही घसरला. स्पर्धेतून वाढली ती फक्त जाहिरातबाजी. पण त्यातून शिक्षणाची पातळी स्पष्ट होत नसल्याने शिक्षण संख्यात्मक वाढले की गुणात्मक दर्जा सुधारला, हे तपासण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय राष्ट्रीय पातळीवरील यादी जाहीर करू लागले. यात शिक्षणाचा दर्जा, शिकवण्याची-शिकण्याची पद्धत, तेथे संशोधनाला असलेला वाव, या शिक्षणाचा थेट रोजगाराला होणारा उपयोग अशा २० निकषांचा विचार केला जातो. त्यासाठी त्या त्या शिक्षणसंस्था, विविध विद्याशाखा, विद्यापीठांनी माहिती भरून दिल्यावर एकत्र यादी आणि वेगवेगळ्या विद्याशाखांनुसार नऊ याद्या जाहीर होतात. त्यात मुंबई विद्यापीठ १५० क्रमांकाच्या पुढे फेकले गेले. महाविद्यालयांच्या यादीतही शंभरात अवघ्या चौघांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे देशातील प्रगत राज्य म्हणून टेंभा मिरवणाºया महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा, त्याची क्षमता आणि या शिक्षणाची पातळी पुरती स्पष्ट झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षणासाठी पैसा कमी पडणार नाही, याची तजवीज केली. पण जेव्हा प्राध्यापकांच्या क्षमतेचा मुद्दा पुढे आला तेव्हा गदारोळ उडाला. त्यासाठीच्या परीक्षा द्यायच्या की नाही, यावरून बंद-आंदोलने झाली. कोर्टकज्जे झाले. गुणवत्ता वाढवायची असेल, तर ती आधी आडात असायला हवी; मग पोहोºयात येते याचा सोईस्कर संघटनात्मक विसर पडला. तंत्रसज्जता, माजी विद्यार्थ्यांच्या संघटना, क्रीडाविषयक सोयी, प्रशस्त वास्तू या साधनसामग्रीच्या आधारे अनेक संस्थांनी नॅकचा दर्जा पदरात पाडून घेतला. पण हे सारे चित्र किती तकलादू, आभासी होते, त्याचा बुरखा या अहवालाने फाडला. महाराष्ट्रातील ज्या ११ संस्था पहिल्या शंभरात आहेत, त्यातील फक्त पुणे हे राज्याचे विद्यापीठ आणि पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यादीत दिसते. या यादीने काही विशिष्ट शाखांकडील ओढा कायम असल्याचे दाखवून दिले. त्याचवेळी त्यांची रोजगाराभिमुखता किती कमी होत चालली आहे, याचे भान जर शिक्षणक्षेत्रातील नियोजनकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांना आले, तरी पुरेसे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिकuniversityविद्यापीठMaharashtraमहाराष्ट्र