शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुत्सद्दी शरदकाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:31 AM

कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली.

- अतुल कुलकर्णीदेवावर गाढा विश्वास असणाऱ्या कुमारची ही गोष्ट. ३५ टक्के गुण मिळवलेल्या कुमारला त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांचा पाठिंबा असतानाही, गुरु जींनी दुसºयाच मुलाला मॉनिटर करायचा निर्णय घेतला होता. का तर म्हणे त्याला १०० गुण मिळाले...! हे काय कारण झाले? कुमार चिंतेत होता. गुरु जींचे वागणे त्याला खटकत होते. पण गुरु जींवर संस्थाचालकांचा वरदहस्त होता. त्यामुळे त्यांना कुणी काही बोलले तर संस्था अध्यक्षांना राग यायचा. विचार करत करत कुमारने एक आयडिया केली. तो गेला त्याच्या विरोधात असणाºया सिद्धूकडे. त्यालाही गुरु जींच्या वागण्याचा रागच आला होता. दोघे एकत्र आले आणि दोघांनी मिळून गुरु जींच्या निर्णयाच्या विरोधात गावातल्या पाटलांकडे जायचे ठरवले. गावातले पाटीलही गुरु जींवर कातावलेले होते. संस्थाचालकांच्या मनमानीमुळे पाटलांचा त्या संस्थाचालकांवर तसाही राग होताच.कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली. एका मॉनिटरमुळे आपल्या बाकीच्या शाळा अडचणीत येतील म्हणून संस्थाचालकही विचारात पडले होते. इकडे गुरु जी तर बोलून बसले होते. त्यामुळे व्यवहारात येडा पण पुस्तकात हुशार असणाºया त्या मुलाला मॉनिटर नाही केले तर आपली पंचाईत होणार म्हणूनगुरु जी परेशान झाले होते. अखेर त्या शाळेशी आणि गावाशी काडीचा संबंध नसणारे शेजारच्या गावातले एक शरदकाका सगळ्यांच्या मदतीला आले. ते तसे कुणाचे मित्र आणि कुणाचे शत्रू हे त्यांच्या मित्रांना आणि शत्रूंनाही कळत नसे.संस्थाचालकांची प्रतिष्ठा राखली जाईल, असे त्यांना वाटत पाहिजे. आपला शब्द वाया जाऊ नये, असे गुरुजींना वाटत होते. कुमार मॉनिटर झाला पाहिजे, असं त्याच्या वडिलांना वाटत होते, आणि हे सगळं करताना कुमारला मदत करणारा सिद्धूदेखील जे घडलं ते शरदकाकांमुळे घडलं, ते नसते तर सगळं कठीण झालं असतं, असं त्यांच्या दिल्लीच्या राहुलदादाला सांगण्यासाठी गेला पाहिजे, अशी खेळी खेळायचे शरदकाकांनी ठरवले. त्यांनी संस्थाचालकांना गाठले, त्यांच्या कानात काही तरी सांगितले... आणि काय आश्चर्य, त्या हुशार मुलाने वर्गात जाऊन सांगितले, मला नाही मॉनिटर व्हायचे, मला अजून खूप अभ्यास करायचाय, आणि त्याबरोबर सगळे प्रश्न सुटले...!गुरु जी खूश, संस्थाचालक खूश, सिद्धूचे दिल्लीतले नातेवाईक खूश... सगळे शरदकाकाचे नाव घेऊ लागले...! मात्र आपण या गावचेच नाही असे म्हणत शरदकाका पुढच्या कामाला निघून गेले.ही बातमी कळताच गोवा, मणिपूर आणि मेघालयमधील शाळेत असेच प्रकार घडले. पण त्यावेळी कुणी कसे लक्ष दिले नाही, अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र त्यावेळी शरदकाका गप्प होते की कुणी त्यांच्याकडे मदत मागायलाच गेले नव्हते की दिल्लीत राहणाºया त्या संस्थाचालकांनी त्यावेळी शरदकाकांना गप्प बसायची विनंती केली होती की त्यावेळी काकांनाच ठरवून गप्प बसायचे होते, यावर आता चर्चा सुरू झालीय. त्या संस्थाचालकांच्या शाळांबद्दल कधी, किती व कुणी बोलायचे याचे वर्ग आता शरदकाका सुरू करणार आहेत, अशीही एक पुडी कुणी तरी सोडल्याचे ऐकीवात आहे... किती लक्ष द्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे...!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस