शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

'आग लागली पळा पळा'; म्हणण्यापेक्षा कारणे शोधा, उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 4:56 PM

मृत्यू कसा येईल याचे भाकीत करता येत नाही. विज्ञान केवळ मृत्यूचा तर्क लढवतो. मृत्यूसाठी मानव निर्मित अनेक कारणे आहेत.

- विनायक पात्रुडकर

मृत्यू कसा येईल याचे भाकीत करता येत नाही. विज्ञान केवळ मृत्यूचा तर्क लढवतो. मृत्यूसाठी मानव निर्मित अनेक कारणे आहेत. या कारणांवर मानवाने औषधही शोधून काढले आहे. जसे की आग, पाणी यांच्याशी खेळू नये. ज्वलंत पदार्थ बाळगू नये. इमारत, आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्र असावे, अशी ही औषधांची यादी आहे. प्रशासन आणि सरकार हेदेखील आग लागली की खडबडून जागे होते. आग लागली पळा पळा व कारवाई सुरू करा, अशा भूमिकेत सर्वजण असतात. मग उपाय योजनांचा फड रंगतो. अमूकएका गोष्टीवर कायमची बंदी, परवाने रद्दे, अशा कारवाया सुरू होतात. मुंबई महापालिकेने असाच एक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात आगींचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. दिवाळी व इतर काही सणांसाठी विक्रीचे तात्पूरते परवाने दिले जातील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. म्हणजे मुंबईकरांना फटाके हवे असतील तर त्यांना शहराबाहेर जावे लागेल. ही कारवाई स्वागतार्ह आहे.

 प्रतिबंधात्मक उपाय करायलाच हवेत. फटाके दुकानांचे परवाने रद्द केल्याने आगी थांबतील का, याचेही मंथन व्हायला हवे़ फटाक्यांच्या दुकानाला आग लागून नागरिकांचा बळी गेला अशी एकही घटना आजवर मुंबईत घडली नसल्याचा दावा फटाके विक्रेत्यांनी केला आहे. गॅस सिलेंडर फुटून किंवा शॉर्टसर्किट होऊन नागरिकांचा बळी गेल्याच्या शेकडो घटना मुंबईत घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यावर ठोस अशी उपाय योजना पालिकेने केलेली नाही किंवा तशी आखणीही केलेली नाही़ मुंबईत गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री सर्रास होते. गल्लोगल्लीत असलेल्या चायनीज गाड्यांवर, हॉटेलमध्ये व बहुतांश घरातही बेकायदा सिलेंडरची विक्री होते. सिलेंडरची बेकायदा विक्री गेली अनेक वर्षे सुरू आहे़ यामुळे अनेक आगीच्या घटनाही घडल्या आहेत़ तसे अहवाल सादर झाले आहेत़ त्याकडे काणाडोळा केला जातो आणि काही दिवसांच्या अंतराने पुन्हा आगीची घटना घडते़ याचे ताजे उदाहरण म्हणजे दोन वर्षांपूर्वी कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेलला लागलेली आग. या घटनेनंतर पालिकेने हॉटेलमधील अग्निरोधक यंत्र बंधनकारक केले व अनेक उपाय योजना सुरू केल्या़ बेकायदा सिलेंडरला निर्बंध घालण्यासाठी काहीच आखणी केली नाही.

 शॉर्टसर्किटचा प्रश्न आज मुंबईतील प्रत्येक इमारतीला भेडसावत आहे़ शहरातील बहुतांश इमारतीत विजेच्या वायरी लटकलेल्या दिसतात़ याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना नागरिकांना याची काळजी आहे़ रहिवाशी व प्रशासन दुर्घटना घडण्याच्या प्रतीक्षेत असतात़ घटना घडली की जितक्या वेगाने कारवाई सुरू होते, तितक्याचे वेगाने ती थंडावते़ गेल्यावषी परळ येथील क्रिस्टल टॉवरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली़. त्यानंतर पालिकेने दंडाच्या कारवाईचा बडगा उगारला़ ही कारवाई आता थांबली आहे़ कामाची ही पद्धत गेली अनेक वर्षे सुरू आहे़. सर्वसामान्यांनादेखील याची सवय झाली आहे़ घटना घडली की आवाज करायचा आणि काही दिवसांनी सर्व विसरून जायचे, अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकाची झालेली आहे़. होरपळून कोणाचाही मृत्यू होऊ नये, असे आपण म्हणतो़. असा मृत्यू टाळण्यासाठी आपणही प्रयत्न करू शकतो़. यासाठी केवळ सुजाण नागरिक व्हायला हवे़. बेकायदा गॅस सिलेंडर घेणार नाही व कोणाला घेऊ देणार नाही, अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी़. इमारतीची व घराची वायरींग सुस्थितीत असेल, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी़ प्रशासनानेही तात्पूरती कारवाई न करता, त्यात सातत्य ठेवायला हवे़ इमारतीची वायरींग सुस्थितीत आहे की नाही, याची पाहाणी वारंवार करायला हवी़ बेकायदा गॅस सिलेंडर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी़. तरच भविष्यात होरपळून होणारे मृत्यू टाळता येतील अन्यथा अशा घटनांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच राहिल. 

टॅग्स :fireआगfire crackerफटाके