शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'आग लागली पळा पळा'; म्हणण्यापेक्षा कारणे शोधा, उपाय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:58 IST

मृत्यू कसा येईल याचे भाकीत करता येत नाही. विज्ञान केवळ मृत्यूचा तर्क लढवतो. मृत्यूसाठी मानव निर्मित अनेक कारणे आहेत.

- विनायक पात्रुडकर

मृत्यू कसा येईल याचे भाकीत करता येत नाही. विज्ञान केवळ मृत्यूचा तर्क लढवतो. मृत्यूसाठी मानव निर्मित अनेक कारणे आहेत. या कारणांवर मानवाने औषधही शोधून काढले आहे. जसे की आग, पाणी यांच्याशी खेळू नये. ज्वलंत पदार्थ बाळगू नये. इमारत, आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्र असावे, अशी ही औषधांची यादी आहे. प्रशासन आणि सरकार हेदेखील आग लागली की खडबडून जागे होते. आग लागली पळा पळा व कारवाई सुरू करा, अशा भूमिकेत सर्वजण असतात. मग उपाय योजनांचा फड रंगतो. अमूकएका गोष्टीवर कायमची बंदी, परवाने रद्दे, अशा कारवाया सुरू होतात. मुंबई महापालिकेने असाच एक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात आगींचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. दिवाळी व इतर काही सणांसाठी विक्रीचे तात्पूरते परवाने दिले जातील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. म्हणजे मुंबईकरांना फटाके हवे असतील तर त्यांना शहराबाहेर जावे लागेल. ही कारवाई स्वागतार्ह आहे.

 प्रतिबंधात्मक उपाय करायलाच हवेत. फटाके दुकानांचे परवाने रद्द केल्याने आगी थांबतील का, याचेही मंथन व्हायला हवे़ फटाक्यांच्या दुकानाला आग लागून नागरिकांचा बळी गेला अशी एकही घटना आजवर मुंबईत घडली नसल्याचा दावा फटाके विक्रेत्यांनी केला आहे. गॅस सिलेंडर फुटून किंवा शॉर्टसर्किट होऊन नागरिकांचा बळी गेल्याच्या शेकडो घटना मुंबईत घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यावर ठोस अशी उपाय योजना पालिकेने केलेली नाही किंवा तशी आखणीही केलेली नाही़ मुंबईत गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री सर्रास होते. गल्लोगल्लीत असलेल्या चायनीज गाड्यांवर, हॉटेलमध्ये व बहुतांश घरातही बेकायदा सिलेंडरची विक्री होते. सिलेंडरची बेकायदा विक्री गेली अनेक वर्षे सुरू आहे़ यामुळे अनेक आगीच्या घटनाही घडल्या आहेत़ तसे अहवाल सादर झाले आहेत़ त्याकडे काणाडोळा केला जातो आणि काही दिवसांच्या अंतराने पुन्हा आगीची घटना घडते़ याचे ताजे उदाहरण म्हणजे दोन वर्षांपूर्वी कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेलला लागलेली आग. या घटनेनंतर पालिकेने हॉटेलमधील अग्निरोधक यंत्र बंधनकारक केले व अनेक उपाय योजना सुरू केल्या़ बेकायदा सिलेंडरला निर्बंध घालण्यासाठी काहीच आखणी केली नाही.

 शॉर्टसर्किटचा प्रश्न आज मुंबईतील प्रत्येक इमारतीला भेडसावत आहे़ शहरातील बहुतांश इमारतीत विजेच्या वायरी लटकलेल्या दिसतात़ याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना नागरिकांना याची काळजी आहे़ रहिवाशी व प्रशासन दुर्घटना घडण्याच्या प्रतीक्षेत असतात़ घटना घडली की जितक्या वेगाने कारवाई सुरू होते, तितक्याचे वेगाने ती थंडावते़ गेल्यावषी परळ येथील क्रिस्टल टॉवरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली़. त्यानंतर पालिकेने दंडाच्या कारवाईचा बडगा उगारला़ ही कारवाई आता थांबली आहे़ कामाची ही पद्धत गेली अनेक वर्षे सुरू आहे़. सर्वसामान्यांनादेखील याची सवय झाली आहे़ घटना घडली की आवाज करायचा आणि काही दिवसांनी सर्व विसरून जायचे, अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकाची झालेली आहे़. होरपळून कोणाचाही मृत्यू होऊ नये, असे आपण म्हणतो़. असा मृत्यू टाळण्यासाठी आपणही प्रयत्न करू शकतो़. यासाठी केवळ सुजाण नागरिक व्हायला हवे़. बेकायदा गॅस सिलेंडर घेणार नाही व कोणाला घेऊ देणार नाही, अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी़. इमारतीची व घराची वायरींग सुस्थितीत असेल, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी़ प्रशासनानेही तात्पूरती कारवाई न करता, त्यात सातत्य ठेवायला हवे़ इमारतीची वायरींग सुस्थितीत आहे की नाही, याची पाहाणी वारंवार करायला हवी़ बेकायदा गॅस सिलेंडर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी़. तरच भविष्यात होरपळून होणारे मृत्यू टाळता येतील अन्यथा अशा घटनांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच राहिल. 

टॅग्स :fireआगfire crackerफटाके