शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मुल्ला-लष्करातील साटेलोटे हे पाकिस्तानचे खरे दुखणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:20 IST

Pakistan: पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि लष्करानेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले, हेच सत्य होय!

- वप्पला बालचंद्रन(मंत्रिमंडळ सचिवालयाचे निवृत्त विशेष सचिव) 

मुल्ला मंडळींबरोबर पाकिस्तानी सैन्याचे साटेलोटे जनरल झिया-उल-हक लष्करप्रमुख झाले होते तेव्हापासूनचे, म्हणजे १९७६ पासूनचे असल्याचा सर्वसाधारण समज आहे; परंतु तो बरोबर नाही. त्याची प्रक्रिया खूप आधी सुरू झालेली होती. पाकिस्तानमधील ‘फ्रायडे टाइम्स’ने ९  नोव्हेंबर २०२१ रोजी असे म्हटले आहे की, १९४७ साली भारतातील काश्मीरशी संघर्ष उद्भवला, तेव्हापासून सशस्त्र बंडखोर पुरविण्याचे काम राजकीय पक्ष करत आले आहेत.

काश्मीर संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी महाराजा हरिसिंग यांची संमती मिळविणाऱ्या व्ही. पी. मेनन यांनी १९५६ साली लिहिलेल्या ‘द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स’ या पुस्तकात याला दुजोरा देणारा उल्लेख आहे.

सीमेवरील वन्य जमातीचे सुमारे ५ हजार सशस्त्र बंडखोर दोन-तीनशे लॉऱ्यांमध्ये भरून २२ ऑक्टोबर १९४७ रोजी चाल करून आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यात आफ्रिडी, वझीर, मेहसूद आणि स्वाथीज् अशा जमातींच्या टोळ्या होत्या.

१९९३ ते ९६ या काळात बेनझीर सरकारमध्ये जनरल नसीर उल्ला बाबर हे गृहमंत्री होते. अफगाण तालिबानची निर्मिती त्यांनीच केली. २००७ साली एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते, ‘पाकिस्तानच्या निम्म्या आयुष्यात मुल्ला आणि सैन्याच्या आघाडीनेच तिथले सरकार चालविले आहे. उरलेल्या काळात राजकीय पक्षांनी राज्य केले.’

१९७१ च्या पराभवानंतर झुल्फिकार अली भुत्तो यांना मुल्ला आणि लष्करातील साटेलोटे तोडता आले असते; परंतु त्यांनी राजकीय लाभासाठी धर्माचा उलट जास्त वापर केला. १९७४ मध्ये त्यांनी दुसरी जागतिक इस्लामिक शिखर बैठक लाहोरमध्ये भरवली. त्याचवर्षी त्यांनी मध्ये अहमदियाना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला. ते मुस्लीम राहिले नाहीत. रविवारऐवजी शुक्रवार हा त्यांनी सुट्टीचा दिवस जाहीर केला.

‘द मिराज ऑफ पॉवर इन्क्वायरी इन टू भुत्तो इयर्स, १९७१-१९७७’ या पुस्तकात झुल्फिकार अली भुत्तो यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मुबशीर हुसेन म्हणतात, ‘सरकारी माध्यमातील सरंजामदार आणि त्यांच्या नोकरचाकरांनी मुल्लांमध्ये आणखी मुल्लापण भरले.’

भुत्तोंशी जवळीक असलेले खालीद हुसैन म्हणतात, ‘भुत्तोंनी पाकिस्तानी लष्कर आणि त्याच्या नीतिधैर्याची पुनर्बांधणी केली. १९७१च्या नामुष्की झालेल्या युद्धानंतर ती आवश्यक होती. परंतु त्यांनी एक चूक केली. लष्कराची ताकद त्यांनी स्वतःला बळकट करण्यासाठी वापरली. लष्करावर विसंबून राहण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. उलट त्यांनी नागरी व्यवहारापासून लष्कर दूर ठेवायला हवे होते; परंतु तसे घडले नाही.’

अफगाण युद्धासाठी मूलतत्त्ववादी इस्लामी शक्ती एकत्र केल्याचा आरोप झियांवर होतो; परंतु ही चूक कितीतरी आधी १९७३  साली भुत्तोंनी केली होती. कारण अगदी वेगळे होते. मोहम्मद दाऊद खान यांनी अफगाणिस्तानमध्ये बंड करून चुलत भाऊ किंग मोहम्मद जहीर शाह यांची राजवट उलथून टाकली, तेव्हा हे घडले. ब्रिगेडियर नसीरुल्ला बाबर त्यावेळी सीमावर्ती स्काउटचे प्रमुख होते. 

दाऊदला विरोध करण्यासाठी गुलबुद्दीन हिकमत्यार यांच्यासारख्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घ्यायला भुत्तो यांनीच बाबर यांना सांगितले. आयएसआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या मूलतत्त्ववाद्यांना भरती करून घेण्याचा प्रघात पडला आणि नंतर तेच पाकिस्तानचे धोरण झाले. याच नसरुल्ला बाबर यांनी बेनझीर यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबान्यांना मदत पोहोचविण्यासाठी १९९४ साली त्यांनी अफगाण सेल तयार केला. क्वेट्टा ते मध्य आशिया असा जाणारा महत्त्वाचा हमरस्ता युद्धखोरांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अफगाणांची ताकद वापरण्याची कल्पना बेनझीर यांची होती. अर्थातच, अमेरिकेचे व्यापारी हितसंबंध त्यामागे होते.

मुल्ला आणि लष्कर यांचे साटेलोटे पाकिस्तानमध्ये खोलवर मुरलेले आहे. त्या देशाच्या परदेशी मालकांचे तुष्टीकरण करण्यासाठी अत्यंत हुशारीने त्यात विविधरंगी बदल होत असतात आणि त्यावरच तो देश जगत आलेला आहे.    (लेखातील मते व्यक्तिगत.)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर