शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

जि. प. शाळा बंद करण्याचा घाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:34 IST

ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशाला पाठवतील?

शैक्षणिक वर्ष २०२४-२५च्या बहुतांश जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संचमान्यता चुकल्या आहेत. काही शाळांना मुख्याध्यापक पद राहिले नाही. बहुतांश शाळांची शिक्षकांची पदे कमी केली आहेत. विशेष बाब म्हणजे सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे फार कमी करण्यात आली आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे नववी व दहावी वर्गांना शिकवणाऱ्या माध्यमिक शिक्षकांची पदे शून्य केली आहेत. त्यामुळे बरेच शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश निघत आहेत. जर असे झाले तर शिक्षणक्षेत्राचे वाटोळे होणार आहे. कारण अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर बहुतांश शाळांमध्ये शिकवायला शिक्षक राहणार नाहीत. ज्या शाळांच्या संचमान्यता पूर्णपणे चुकल्या आहेत त्या शाळेत फक्त विद्यार्थी असतील, शिक्षक असणार नाहीत.  ज्या शाळेत शिक्षक नसतील त्या शाळेत पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशाला पाठवतील? भविष्याची चिंता लक्षात घेऊन पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून काढतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आपोआप बंद पडतील. शासनाला नेमके हेच पाहिजे आहे. लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या आणि खासगी कंपन्यांना शिक्षणाची मक्तेदारी सोपवून शासन शिक्षण प्रक्रियेतून अंग काढून घ्यायचे. त्यामुळे गोरगरिबांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची सोय राहणार नाही. यासाठी शिक्षक आंदोलन करत आहेत. पालकांनीही हा धोका वेळीच लक्षात घेतला पाहिजे.- बबन दामोदर गुळवे, उमरगा कोर्ट, ता. अहमदपूर, जि. लातूर 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSchoolशाळा