शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

नव्या शैक्षणिक धोरणाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य संशोधनाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 2:18 AM

हे नव्या शैक्षणिक धोरणाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील नॅशनल रिसर्च फाउंडेशनमुळे देशातील शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाला निश्चितच चालना मिळेल. परंतु, या फाउंडेशनच्या माध्यमातून संशोधनासाठी दिला जाणारा अधिकाधिक निधी संशोधन संस्थांऐवजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना द्यायला हवा. त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या कामातही पारदर्शकता असणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही संशोधक होत नाही, तोपर्यंत तुम्हाला चांगला शिक्षक होता येत नाही, अशीच जगभर मानसिकता आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली तर निश्चितच विद्यापीठ व महाविद्यालय यांना चांगला फायदा होईल.

नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना संसदेकडून केली जाणार असल्याने ही संस्था स्वायत्त असेल. त्यासाठी सध्या केलेली वीस हजार कोटींची तरतूद ही चांगली बाब आहे. डीएसटी, डीबीटी, यूजीसी यांसारख्या संस्थांकडून संशोधनासाठी निधी मिळत आहे. मात्र, आयसर, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठ, एनसीएल यांसारख्या संस्थांनाच या निधीचा ९० ते ८० टक्के लाभ मिळाला. विद्यापीठ व महाविद्यालयांना यातून फारसे काही मिळत नाही. त्यामुळे रिसर्च फाउंडेशनमधून केवळ शैक्षणिक संस्थांना निधी मिळणे महत्त्वाचे आहे. संशोधन प्रकल्पाची गुणवत्ता तपासूनच निधी दिला पाहिजे.रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून रिसर्च फेलोशीप, प्रोजेक्ट, सेमिनारसाठी निधी मिळणार आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयातील प्राध्यापक हे पूर्णवेळ संशोधन करीत नाहीत. विद्यार्थ्यांना शिकविणे यास ते पहिले प्राधान्य देतात व त्यांचे संशोधनाला दुसरे प्राधान्य असते. पूर्णवेळ संशोधनाला दिले जात नसल्यामुळे त्यांच्याकडून सादर केला जाणारा संशोधन प्रकल्प संशोधन संस्थेमधील संशोधकांच्या तुलनेत कमकुवत होतो. त्यामुळे संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा, याबाबतचे प्रशिक्षण प्राध्यापकांना देण्याची आवश्यकता आहे.विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर सुरू असलेल्या संशोधनाशी निगडित संदर्भ देण्यासाठी पुरेसे साहित्य उपलब्ध होत नाही. केंद्रीय विद्यापीठातआणि परदेशात संशोधन प्रकल्प तयार करण्याबाबतचे मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातीलकिंवा नव्याने संशोधन करू इच्छिणाºया संशोधकांना संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी येणाºया अडचणी दूर कराव्या लागतील. भारतातील एक किंवा दोन शिक्षण संस्था जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत याव्यात या दृष्टीने प्रयत्न करण्याऐवजी दोनशे-तीनशे संस्थांवरलक्ष केंद्रित करावे लागेल. केवळ विज्ञान शाखेतच नाही, तर सामाज विज्ञान शाखेतही विद्यार्थ्यांना चांगले संशोधन करता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडे सकारात्मकपणे पाहायला हवे. पुढील काळात संशोधनासाठी लागणाºया पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. प्रयोगशाळा, अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल ग्रंथालये उपलब्ध होतील. त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायला हवा.

आतापर्यंत केवळ शासनाच्या संशोधन संस्थांनानिधी उपलब्ध होत होता. परंतु, आता सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना निधी उपलब्ध होणार आहे.तसेच सीएसआर कंपन्यांकडून दिला जाणारा निधीरिसर्च फाउंडेशनमध्ये जमा करता येणार आहे. त्यामुळेया निधीचा लाभ देशातील सर्वच शिक्षण संस्थांना मिळणार आहे.डॉ. वासुदेव गाडेमाजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र