शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:00 AM

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली.

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली. मरणारी ही माणसे नक्षल्यांचा उघडपणे विरोध करणारी होती. ३७ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केलेल्या नक्षलवादाचा खरा चेहरा कळून चुकल्याने त्यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय या आदिवासींच्या जीवावर उठला. आजतागायत ४९० हून अधिक आदिवासी नक्षलवाद्यांच्या बंदुकीने मारले गेले. यातील काही प्रकरणात तर हे कृत्य अनवधानाने झाल्याचे मान्य करीत नक्षली या आदिवासींची माफीही मागायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. विकासाची जी स्वप्नं नक्षल्यांनी आजवर आदिवासींना दाखविली मुळात तीच त्यांच्या विकासात बाधक असल्याची जाणीव झाल्याने आदिवासी आता नक्षल विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. खरं तर ही नक्षलवाद विरुद्ध आदिवासी अशा संघर्षाची सुरुवात असून नक्षलवाद्यांसाठी ही आत्मविनाशक वाटचाल आहे. नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करताना नागरिकांना आता भीती वाटत नाही. उलट नक्षल हल्ल्यात मरणाºया नागरिकांचे स्मारक बांधण्याचे धाडस त्यांच्यात आले आहे. पोलिसांसाठी ही जमेची बाजू आहे. पोलीस आणि आदिवासींमधील दरी गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी भरून काढण्याचे मोठे कार्य या जिल्ह्यात केले आहे. खचलेल्या पोलीस दलात नवचैतन्य निर्माण करण्याची किमया आबांनी करून दाखविली.पोलीस तुमचे शत्रू नसून मित्र आहेत, हेदेखील आबांनी आदिवासींंना पटवून दिले. तेथूनच नक्षलवादाला लागलेली ओहोटी आजही कायम आहे. जमिनीत पेरलेल्या भूसुरूंगाची माहिती वेळेवर मिळू लागली. नक्षल्यांना गावातून मिळणाºया मदतीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आणि याच मुळे नक्षलवाद्यांनी आता नागरिकांना टार्गेट करणे सुरू केले आहे. पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून असले भ्याड हल्ले होत आहेत. पूर्वी पोलिसांचा खब-या असा ठपका ठेवत एखाद्याला भरचौकात मारणारे नक्षली आता अपहरण करून एकांतवासात त्याची हत्या करतात तेव्हा नागरिकांचीही भीती त्यांना असल्याचे स्पष्ट होते. शासकीय आकड्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याची संख्या फक्त २२० च्या घरात आहे. अर्थात आपण उघडपणे नागरिकांचादेखील सामना करू शकत नाही, ही बाब नक्षल्यांना कळून चुकली आहे. नागरिकांनी नक्षलवादाचा बीमोड करण्याचा संकल्प घेतला आहे, त्याला गरज आहे ती पोलिसांच्या सहकार्याची.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी