शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परराष्ट्र व्यवहार धोरणातील कोलांटउड्या!

By रवी टाले | Updated: December 1, 2018 12:25 IST

पूर्वाश्रमीचा भाजपाचा आणि सध्याचा कॉंग्रेसचा नेता असलेल्या नवज्योतसिंग सिद्धाूने सर्वप्रथम कर्तारपूर मार्गिकेच्या उभारणीचा विषय उपस्थित केला होता तेव्हा मोदी सरकारचा प्रतिसाद अत्यंत थंड होता.

ठळक मुद्दे कर्तारपूर मार्गिकेच्या मुद्यावर घेतलेली कोलांटउडी ही त्या मालिकेतील सर्वात ताजी घडामोडमोदींनी त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ पाकिस्तानसह सर्वच सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना स्वत:च्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करून केला होता. शेजारी देशांसोबतच्या भारताच्या संबंधांमध्ये मोदी जणू काही एक नवा अध्याय जोडू इच्छितात, असाच त्यांचा तेव्हाचा एकंदरित अभिनिवेश होता.

नरेंद्र मोदीसरकारने परराष्ट्र धोरणाच्या पातळीवर ज्या कोलांटउड्या मारल्या आहेत, त्या अनाकलनीयच म्हणाव्या लागतील. कर्तारपूर मार्गिकेच्या मुद्यावर घेतलेली कोलांटउडी ही त्या मालिकेतील सर्वात ताजी घडामोड! मोदींनी त्यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ पाकिस्तानसह सर्वच सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना स्वत:च्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करून केला होता. शेजारी देशांसोबतच्या भारताच्या संबंधांमध्ये मोदी जणू काही एक नवा अध्याय जोडू इच्छितात, असाच त्यांचा तेव्हाचा एकंदरित अभिनिवेश होता.     पुढे त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अचानक पाकिस्तान वारी करून आश्चर्याचा धक्काच दिला. पाकिस्तानसोबतच्या संबंधांसंदर्भात आजवरच्या भारतीय राज्यकर्त्यांना जे जमले नाही ते मी चुटकीसरशी करून दाखवतो, असाच काहीसा त्यांचा अविर्भाव होता. त्यांच्या त्या बरीच चर्चा झालेल्या पाकिस्तान वारीनंतर आठच दिवसांनी दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील लष्करी तळावर हल्ला चढवला आणि मोदींचे विमान वस्तुस्थितीच्या धरातलावर आणले. पठाणकोट हल्ल्यानंतर, दहशतवाद आणि वाटाघाटी एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत, अशी कठोर भूमिका घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानसोबतचे वाटाघाटींचे दोरच कापून टाकले.     त्यानंतर पाकिस्तानात होणार असलेल्या सार्क शिखर परिषदेवर बहिष्कार, पाकिस्तानी भूमीवरील सर्जिकल स्ट्राइक, सिंधू जलवाटप करारासंदर्भात ताठर भूमिका इत्यादी पावलांमुळे पाकिस्तानसोबतचे संबंध पार रसातळाला पोहोचले. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर समर्थकांना त्यामुळे प्रचंड आनंद झाला; मात्र कालपरवा कर्तारपूर मार्गिकेच्या मुद्यावर मोदी सरकारने जी भूमिका घेतली, ती त्याच मुद्यावरील सरकारच्या आधीच्या भूमिकेला छेद देणारी आहे. पूर्वाश्रमीचा भाजपाचा आणि सध्याचा कॉंग्रेसचा नेता असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने सर्वप्रथम कर्तारपूर मार्गिकेच्या उभारणीचा विषय उपस्थित केला होता तेव्हा मोदी सरकारचा प्रतिसाद अत्यंत थंड होता. आता अचानक असे काय झाले, की सरकारने केवळ मार्गिकेच्या उभारणीला मान्यताच दिली नाही, तर मार्गिकेच्या भारतातील कामाचे भूमिपूजनही केले आणि पाकिस्तानातील भूमिपूजन कार्यक्रमासाठी दोन केंद्रीय मंत्र्यांनाही धाडले? याला कोलांटउडी नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? परराष्ट्र व्यवहारासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण धोरणाच्या बाबतीत सरकार गोंधळलेले असल्याचेच हे द्योतक नव्हे का? अर्थात कर्तारपूर मार्गिकेचा मार्ग प्रशस्त केला म्हणून पाकिस्तानसोबतच्या वाटाघाटींचा मार्ग प्रशस्त होणार नसल्याचे सांगून आपल्या समर्थकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने अवश्य केला आहे.     परराष्ट्र व्यवहारासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण धोरणासंदर्भात कोलांटउडी घेण्याचे कर्तारपूर मार्गिका हे एकमेव उदाहरण नव्हे. काही दिवसांपूर्वीच नॉर्वेचे माजी पंतप्रधान केल मॅग्ने बॉण्डविक यांनी अचानक जम्मू-काश्मीरला भेट दिली. तिथे त्यांनी हुर्रियत नेत्यांची भेट घेतली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हुर्रियत नेत्यांना अलगथलग पाडण्यात आले आहे. गत सहा वर्षांमध्ये कोणत्याही विदेशी नेत्याने हुर्रियत नेत्यांची भेट घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर, सध्या ओस्लो सेंटर फॉर पिस अ‍ॅण्ड रिकन्सिलिएशनचे प्रमुख असलेले बॉण्डविक अचानक काश्मीरला भेट देऊन हुर्रियत नेत्यांची भेट घेत असतील आणि पुढे पाकव्याप्त काश्मीरलाही भेट देत असतील, तर भुवया तर उंचावणारच! इथे हेदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे, की नॉर्वे या देशाने नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघर्षांमध्ये शांंतीदूत म्हणून काम करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. श्रीलंकेतील वांशिक संघर्षातही श्रीलंका सरकार आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलमदरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी नॉर्वेने पुढाकार घेतला होता आणि तेव्हा बॉण्डविक हेच नॉर्वेचे पंतप्रधान होते. आता ते काही मोदी सरकारशी चर्चा झाल्याशिवाय तर काश्मीरला भेट देण्यासाठी आले नसतील.                         - रवी टालेravi.tale@lokmat.com

 

टॅग्स :AkolaअकोलाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानGovernmentसरकार