शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मन हे मोगरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 04:17 IST

मनाचा खेळ कळत नाही़ ते वर्तमानामध्ये रमतच नाही़ भूतकाळातील गोष्टी आठवते तर कधी भविष्याचाच अहोरात्र विचार करते़ त्याला लगाम घालता येत नाही

- डॉ. गोविंद काळेमनाचा खेळ कळत नाही़ ते वर्तमानामध्ये रमतच नाही़ भूतकाळातील गोष्टी आठवते तर कधी भविष्याचाच अहोरात्र विचार करते़ त्याला लगाम घालता येत नाही नि वठणीवरही आणता येत नाही़ मनासारखे नाही झाले तर तक्रार करायची तरी कोणाकडे? मनाची गुंतागुंत अनाकलनीय आहे हेच खरे़ आपले सगळे तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मग्रंथ मनाचाच शोध घेते आहे़ मग ते पातंजल योगदर्शन असो, उपनिषदे असोत अथवा भगवद्गीता असो़ ‘मन एव कारणम् बन्धन मोक्षयो:’ मुक्तीला आणि बंधनाला मनच कारणीभूत आहे़ बघा! अनुभवा! मनाची ताकद़ ते दिसत नाही, सापडत नाही पण आयुष्यभर देहाला आणि इंद्रियांना नाचवते हे मात्र खरे़ ‘मन: शिवसंकल्पम् अस्तु’ हे म्हणायला सोपे़ प्रत्यक्षात मन तर अशिवाचाच विचार करते़ नको नको ते मनी येते हाच साऱ्यांचा एकसुरी अनुभव़ कायिक, वाचिक पाप एकवेळ टाळता येईल़ पण मानसिक पापाचे काय? त्यालाही प्रायश्चित्त घ्यायला हवेच़ मन ताब्यात आले तर शिवसंकल्प होणाऱ संतांचा मनावरती पूर्ण ताबा होता़ ते मनाचे ऐकत नव्हते तर मनच त्यांना शरण आले होते़ मनच त्यांचे निमूटपणे ऐकत होते़ म्हणून तर त्यांच्या जीवनात अपार सुख नि समाधान भरून होते़ माऊलींनी मनाला मोगरा बनवून फुलविले ‘मोगरा फुलला मोगरा फु लला’ संकल्प करताना तो काया-वाचा-मने करावा लागतो़ कायेने कार्य करायचे, वाणीने उच्चारायचे आणि मनाने सहभागी व्हायचे़ तरच तो संकल्प़ ज्यात मन नाही ते कसले कार्य़ माऊलींच्या मनात मोगरा फु लला, भरून आला़ सरोवरात फु लणाऱ्या कमळापेक्षा आणि काश्मीरच्या गुलाबापेक्षाही ‘मोगरा’ मोठा़ माऊलीनी तो जवळ केला़ वर्षातून एकदा बहरणारा़ ‘मातीसंगे वास लागे’ हे फक्त मोगऱ्याचे बाबतीत खरे़ उन्हाळ्याच्या दिवसात माठात टाकलेली चार मोगरीची फुले माठातील पाणी सुगंधित करीत़ रुमालात ठेवलेली दोन फु ले सायंकाळपर्यंत रुमाल सुगंधित ठेवीत़ हा झाला लौकिक सुगंध़ माऊलींनी मोगऱ्याचा सुगंध अलौकिक केला़ मनाला मोगरा करून ईश्वरचरणी अर्पण करण्यासाठी उद्युक्त केले़ माझा मनरूपी मोगरा तुझे चरण सुगंधित करण्यासाठी आहे़ सृष्टीनिर्मात्या परमेश्वराशिवाय मोगऱ्याचे स्थान कोणते? मन परमेश्वरालाच अर्पण केले पाहिजे़ किती सुंदर कल्पना़ ‘मन हा मोगरा / अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसार/ येणे नाही’ मनासहित देह ईश्वरार्पण करायचा म्हणजे पुन्हा न परतण्यासाठी ‘जन्ममरण नको आता / नको येरझार’ हेच साकडे घालायचे़ येरझार थांबवताना आसमंत मात्र सुगंधित करायचा़