शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

मुलगा-मुलगी भेदाभेद टाळण्यासाठी मनाचीच मशागत गरजेची

By किरण अग्रवाल | Published: February 27, 2020 11:19 AM

महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत

किरण अग्रवाल

काळ बदलतो आहे तसे पारंपरिक वा बुरसटलेले विचारही बदलत आहेत हे खरे, परंतु काही बाबतीत अजूनही समाजमनातील विशिष्ट धारणांची पुटे दूर होताना दिसत नाहीत. वंशाचा दिवा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्या व तसे न झाल्यास कन्या व तिच्या मातेचाही तिरस्कार करणा-या महाभागांची गणना अशात करता यावी. कन्या जन्माच्या स्वागताचे सोहळे एकीकडे साजरे होऊ लागले असताना, दुसरीकडे कन्या जन्माला आल्याच्या नाखुशीतून तिला व तिच्या आईला रुग्णालयातून घरी नेण्यास नकार देण्याचा जो प्रकार अंबरनाथमध्ये पुढे आल्याचे पाहावसास मिळाले, त्यातूनही या संबंधीची अप्रागतिकताच स्पष्ट व्हावी.

महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्त्री-पुरुष समानता ब-यापैकी आकारास आली आहे. विशेषत: शाळाशाळांमधून मुलगा-मुलगी एकसमान म्हणून जनजागरण होत असल्याने त्याचाही समाजमनावर चांगला परिणाम होत आहे. अनेक गावांमध्ये तर शाळांच्या पुढाकाराने घरातील दारांवर मुलीच्या नावाच्या पाट्या लावल्या गेल्या आहेत. शासनही आपल्या स्तरावर ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारखे उपक्रम योजून यासंबंधीच्या जाणीव जागृतीत कुठलीही कसर न राहू देण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून महिलांबद्दलच्या आदर-सन्मानात नक्कीच वाढ झालेली दिसत आहे., याबद्दल शंका घेता येऊ नये; परंतु असे असले तरी अपवादात्मक का होईना, काही घटना अशाही घडून येताना दिसतात की, ज्यामुळे या संदर्भातील लक्ष्य पूर्णांशाने गाठले गेले नसल्याचेच म्हणता यावे. मुंबईतील अंबरनाथमध्ये घडलेली घटना तसेच परळीत काटेरी झुडपात टाकून दिल्या गेलेल्या कन्येचे प्रकरण त्यादृष्टीने प्रातिनिधिक व बोलके ठरावे.

अंबरनाथ तालुक्यातील कुशीबली गाव परिसरातील एका भगिनीला दुसरीही मुलगीच झाल्याने तिच्या पतीने व सासूने रुग्णालयातून तिला घरी नेण्यास टाळाटाळ केली, अखेर पोलिसांनी कानउघडणी केल्यावर त्या मातेला पोलीस बंदोबस्तात घरी सोडण्याची वेळ आली. तिकडे परळीत एका मातेने नवजात कन्येला काटेरी झुडपात टाकून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणत्या मानसिकतेतून हा प्रकार घडला असावा, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन मुलगी झाल्यावर तिला रुग्णालयातच सोडून पळ काढला गेल्याचे दोन-तीन प्रकारही अलीकडेच उघडकीस आले. अर्थात, उघडकीस न आलेल्या प्रकारातील ‘नकोशीं’ची घुसमट वा वास्तविकतेचा अंदाज यावरून बांधता यावा. कन्येला लक्ष्मीचे रूप मानले जाते. ‘धन की पेटी’ म्हणून संबोधिले जाते तसेच नवरात्रीत तिची पूजाही केली जाते; हे सारे खरे, परंतु मुलाऐवजी मुलीला वंशाचा दिवा मानण्याची मानसिकता काही कुटुंबात रुजू शकलेली नाही. परिणामी पहिल्या कन्या जन्माचे स्वागत केले जाऊन दुसरी वा तिसरीही कन्याच जन्मास आली तर अनिच्छेने तिचे पालन-पोषण, शिक्षण होते. ही मानसिकता बदलली जाणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत हादेखील चिंतेचा विषय राहिला आहे. अशात वाढते शहरीकरण व ग्रामीण भागातील कुटुंबांचे नोकरी-व्यापारानिमित्तचे स्थलांतर पाहता ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या लग्नाची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. लग्नासाठी अधिकतर मुलींची पसंती शहरातील मुलांनाच असते. त्यामुळे खेड्यापाड्यातील उपवर मुलांनी मूकबधिर, विधवा, घटस्फोटिता मुलींशीही विवाहाची तयारी ठेवल्याची बाब एका वधू-वर मेळाव्यानिमित्त समोर आली आहे. यासंबंधीच्या सामाजिक दुखण्याचे वा समस्येचे अनेकविध पदर असले तरी, त्यातून मुलींबद्दलच्या आदर-सन्मानाची भावना गहिरी होण्यास मदतच घडून येते आहे. ‘बेटी नही, तो बहू कहॉँ से लाओगे?’ अशी जाणीव-जागृती यासंदर्भात केली जात असते. तेव्हा, स्त्री-पुरुष समानतेचे केवळ सुस्कारे न सोडता अद्यापही मुलालाच वंशाचा दिवा मानण्याचे जे अप्रागतिक विचार काहींच्या मनात रुजून आहेत ते कसे दूर करता येतील याकडे समाजसेवींनी लक्ष देणे गरजेचे आहे. उत्सवी अगर प्रदर्शनी सोहळ्यांऐवजी व्यक्ती-व्यक्तीच्या मनाच्या मशागतीतूनच ते शक्य आहे, एवढेच या निमित्ताने.  

टॅग्स :WomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्र