शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

मुकी बिचारी कोणीही हाका... स्वामी नित्यानंद की जय !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 5:11 PM

दक्षिणेतील स्वामी नित्यानंद यांनी अफलातून दावा केला आहे. एका सॉफ्टवेअरद्वारे गाय आणि माकडांना संस्कृत, तामिळ भाषा बोलायला ते शिकवणार आहेत.

- धर्मराज हल्लाळे

दक्षिणेतील स्वामी नित्यानंद यांनी अफलातून दावा केला आहे. एका सॉफ्टवेअरद्वारे गाय आणि माकडांना संस्कृत, तामिळ भाषा बोलायला ते शिकवणार आहेत. म्हणजे मुकी बिचारी कोणीही हाका, हे मुक्या म्हटल्या जाणाऱ्या प्राण्यांबाबत यापुढे म्हणता येणार नाही. ते बोलतील. तेही संस्कृतमध्ये. बरे झाले लोकभावना सरकारला नाही कळली तर प्राणिभावना कळेल. ते त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराचे कथन स्वतःच करतील. न्यायालयात त्यांची साक्ष होईल. खरंच काय काय घडेल! हे सगळं अगदी काल्पनिक निबंधासारखं आहे. नाही म्हणायला मराठीत अगं बाई अरेच्या, हा चित्रपट येऊन गेला. ज्यात नायकाला महिलांच्या मनातलं व शेवटी प्राण्यांच्या मनातलं बोललेलं ऐकू येत. तशी काही काल्पनिक कथा नित्यानंद यांची असेल तर रंजन म्हणून वाचून सोडून  देता येईल. परंतु ऐकल ते नवलच. त्यांनी चक्क सॉफ्टवेअर शोधाचा दाखला दिला, हा मोठा विनोद आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हा दावा टिकणारा नाही, हे सत्य कळूनही कथित स्वामी, महाराजांच्या चमत्कारावर विश्वास ठेवणारे हजारो लोक आहेत. इतकेच नव्हे तर कडवे समर्थक आहेत. त्यांचे भक्तगण भक्तीमार्ग विसरुन कोणत्याही क्षणी हिंसेचा मार्गही अवलंबू शकतात. शेवटी तर्क मांडणारी व्यक्ती प्रश्न विचारते, जर गाय, माकड हे प्राणी संस्कृत आणि तामिळ बोलू शकतील तर ज्यांना जन्मत: बोलता येत नाही, अशा मूकबधीर बांधवांना स्वामींनी बोलते करावे. त्यांना नैसर्गिक न्याय मिळेल.या देशात कोट्यवधी लोक व्यंग घेवून जन्माला येतात. अत्यंत खडतर आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. कित्येकदा अपंग मुलाचा सांभाळ करणेही आई-वडिलांच्या आवाक्याबाहेर असते. बोलू न शकणाऱ्या आपल्या मुलाने अथवा मुलीने इतरांसारखे बोलावे, यासाठी आई-वडील रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवतात. काही मुले शास्त्रशुद्घ स्पीच थेअरपीद्वारे हळूहळू बोलायला शिकतात. मात्र, कित्येकांचे व्यंग आजन्म राहते. विज्ञान कायम सत्याचा शोध घेते. त्याला प्रयोगाचा आधार राहतो. वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाने अनेकांचे आयुष्य सुसह्य केले आहे. मात्र, काही ठिकाणी मर्यादा येतात. त्याचाच फायदा घेणारे भोंदूबाबा चमत्काराचे दावे करतात. असाध्य आजार दुरुस्त केल्याचे सांगतात. त्यांना आव्हान दिले की, मात्र पळ काढतात. परंतु, भोंदूबाबांचे ठरलेले असते ‘यँहा नही तो और सही...इस दुनिया में बेवकुफोंकी कमी नही..’ एकंदर एखाद्या ठिकाणी भांडाफोड झाला की, नवे ठिकाण शोधायचे. तिथे लोकांना फसवायचे हा उद्योग कायम सुरु असतो.

स्वामी नित्यानंद हे दक्षिणेतील बहुचर्चित महाराज आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. आता त्यांचे अद्भूत स्पीच थेअरपी सॉफ्टवेअर चर्चेत आले आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे एखादी गाय व माकड संस्कृत बोलू लागले तर हा चमत्कार म्हणावा लागेल. त्याला महाराष्ट्र अंधश्रद्घा निर्मूलन समिती नक्कीच आव्हान देईल. ‘चमत्कार करा आणि 21 लाख मिळवा’ हे अंधश्रद्घा निर्मूलन चळवळीचे जाहीर आव्हान आहे. त्याची एक प्रक्रिया आहे. परंतु, आजतागायत एकाही चमत्कारी पुरुषाने हे आव्हान तडीस नेले नाही. महाराष्ट्रात संत, समाज सुधारकांची थोर परंपरा आहे. अनेकांनी धर्मविचारांची वेळोवेळी चिकित्सा केली आहे. कथित चमत्कार करणाऱ्यांना संतांनीही फटकारले आहे. अलिकडच्या काळात राज्यातील आणि राज्याबाहेरील काही महाराजांचे जाळे देशाबरोबर महाराष्ट्रात विस्तारले आहे. त्यात धर्म-श्रद्घा उपासना पद्घतीच्या प्रचार, प्रसाराबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, चमत्काराचे दावे करणारे महाराजही अनेकांची श्रद्धास्थाने बनली आहेत. असा एखादा वर्ग उद्या नित्यानंदांच्या कथित दाव्यावरही विश्वास ठेवून जागोजागी गर्दी करुन उभा राहिला तर नवल वाटू नये. ज्यांना हे पटत नाही, ज्यांची विवेक बुद्धी चमत्कारांना स्वीकारत नाही, त्यांनी प्रश्न विचारणे सोडू नये. आपल्या अवती-भोवतीच्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्यांना चाप लावणे हे सुजाण लोकांचे कर्तव्य आहे.

टॅग्स :cowगायMaharashtraमहाराष्ट्र