शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ध्यानधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:13 AM

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते !

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,बन्धूरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।अनात्मान्स्तु शत्रुत्वे वर्ततात्मैव शत्रूवत ।।म्हणजेच ज्याने मन जिंकले आहे. त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. जगतगुरु श्रीशंकराचार्य म्हणतात,जिंत जगत केन। मनो ही येन ।।माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य म्हणजे सतत विचार करणे हे आहे. आपण शांत बसून असलो तरी आपल्या मेंदूतील काही भाग मात्र शांत होत नाही. तो सतत विचार निर्माण करीत असतो. या मेंदूच्या ठराविक भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात सतत येणारे विचार आपल्या मेंदूला थकवतात. आपल्या मनात विचारांची शृंखला चालू असते. मनामध्ये नकारात्मक विचार जास्त असतात, ते आपल्या स्मृती पटलावर नकारात्मक भाव निर्माण करतात, त्यामुळे मेंदूची शक्ती खर्ची पडते. मग चिडचिड होते, मानिसक तणाव निर्माण होतो, शरीरातले हार्मोन्स असंतुलित होतात व त्याचे रूपांतर मधुमेह, रक्तदाब, थॉयराईडसारखे आजार निर्माण करतात. ध्यानामध्ये आपण आपले लक्ष श्वासावर, हृदयावर, प्रकाश ज्योतीवर, भगवंताच्या नामस्मरणावर केंद्रित करतो त्यामुळे मेंदूमधील इन्सुला नावाचा भाग सक्रि य होतो व सतत विचार करणारा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क भाग शांत होतो. त्यामुळे त्याला विश्रांती मिळते व आपले मन शांत होते, आपल्याला ताजेतवाने वाटते, मनाची एकाग्रता वाढते व आत्मिक बळ मिळते.जेव्हा तुम्ही ध्यान संपून उठता तेव्हा तुम्हाला अगदी प्रगाढ निद्रेने मिळालेली विश्रांती लाभलेली असते. ध्यानाच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला ‘धारणा’ असे म्हणतात. दुसºया अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात.तिसºया अवस्थेला ‘समाधी’ असे म्हणतात. आज समाजात प्रत्येक जण ताणतणावात दिसत आहे. त्यामुळेच दिवसातून काही वेळ ध्यानधारणा करणे हिताचे ठरते. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्याMeditationसाधना