शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कारगिल कटाचे सूत्रधार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 09:58 IST

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख आणि नवाझ शरीफ पंतप्रधान होते. लाहोर शांतता कराराद्वारे भारत-पाक संबंध सुधारत होते. वाजपेयी आणि नवाझ शरीफ यासाठी अनुकूल होते.

पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निर्वासित अवस्थेत प्रदीर्घ आजाराने दुबईमध्ये निधन झाले. भारताची राजधानी दिल्लीत १९४३ मध्ये त्यांचा जन्म झाला.  वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले. घरची परंपरागत परिस्थिती चांगली असल्याने उच्चशिक्षण घेऊन लष्करात दाखल झाले. भारताविरुद्ध पाकिस्तानने १९६५ चे युद्ध छेडले त्यात ते सहभागी झाले. बांगलादेश मुक्तीसाठी भारताने आक्रमण केले तेव्हाही परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या बाजूने भारताविरोधात लढले. ‘एक लढवय्या सैनिक अधिकारी’ अशी प्रतिमा असलेले मुशर्रफ मनातून भारतविरोधी कारवायांसाठी वारंवार दु:साहसी वृत्तीने वागत राहिले. लष्करात त्यांचा दबदबा तयार झाला; पण भारताच्या विरोधात त्यांच्यात द्वेष ठासून भरला होता.

१९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख आणि नवाझ शरीफ पंतप्रधान होते. लाहोर शांतता कराराद्वारे भारत-पाक संबंध सुधारत होते. वाजपेयी आणि नवाझ शरीफ यासाठी अनुकूल होते. मात्र, लष्करप्रमुख म्हणून मुशर्रफ यांच्या मनात वेगळेच काही तरी शिजत होते. त्याचा सुगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही लागला नव्हता. हाच तो कारगिल युद्धाचा कट होता आणि त्याचे सूत्रधार मुशर्रफ होते. भारताच्या ताब्यातील कारगिल खोऱ्यात साध्या वेशातील पाक सैनिकांना घुसखोरी करायला लावून कारगिल ताब्यात घेण्याचा तो प्रयत्न होता. या घुसखोरीने लाहोर शांतता कराराचे तुकडे तुकडे झाले. भारताने हा कट उधळून लावत कारगिल युद्ध जिंकले. पाकिस्तानच्या घुसखोर सैनिकांचा पाडाव केला. त्यातून पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला. नवाझ शरीफ यांचे सरकार पदच्युत करून लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी देश ताब्यात घेतला. लष्करशहा पुन्हा एकदा पाकिस्तानचा हुकूमशहा बनला. त्याचा खूप मोठा परिणाम भारत-पाकिस्तान संबंधांवर झाला.

नवाझ शरीफ यांना देश सोडून जावे लागले. १९९९ ते २००८ पर्यंत परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख म्हणून हुकूमत ठेवली. दहशतीचा वापर करून ते सत्ताधीश झाले होते. त्यांना कारगिल जिंकता आलेच नाही, शिवाय पाकिस्तानातील दहशतवादालाही संपविता आले नाही. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी चारवेळा हल्ला करून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादविरोधी भूमिका घेतल्याचे दाखवून देण्यासाठी त्यांनी अनेक संघटनांवर कारवाई केली. मात्र, त्यांनी काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखल्या नाहीत. वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी चर्चेचा हात पुढे केला. त्यातून आग्रा येथे बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघेल असे वाटत होते. मनाने दहशतवादीच असणारे परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानात लपलेल्या भारतीय गुन्हेगारांना ताब्यात देण्यावरून चर्चेतून काढता पाय घेतला. दाऊद इब्राहिम याला ताब्यात देण्यास नकार दिला. तेथेच चर्चा फिसकटली.

या भेटीदरम्यान त्यांनी जुन्या दिल्लीतील आपल्या ‌‘नहरवाली हवेली’ जन्मस्थळालाही भेट दिली होती. मुशर्रफ यांच्या आजोबांनी ती विकत घेतली होती. त्यांचे कुटुंब पाकिस्तानला स्थलांतरित झाल्यापासून ती मोकळी पडली आहे. मुशर्रफ यांचे वागणे आणि बोलणे वेगळे होते. प्रत्यक्षातील कृती नेहमीच भारताच्या द्वेषाने भरलेली होती.  मुशर्रफ यांच्या नेतृत्वावर त्यांच्या लष्कराचाही विश्वास राहिला नाही तेव्हा त्यांना लोकशाहीची आठवण होऊ लागली आणि २००८ मध्ये निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. त्या निवडणुकीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा नव्या सरकारने वाचायला सुरुवात केली तेव्हा ते देश सोडून परागंदा झाले.

दुबईमध्ये निर्वासित म्हणून आश्रय घेतला. त्यांना पुन्हा मायदेशात पाय ठेवता आला नाही. मनाने काळेकुट्ट असणारे परवेझ मुशर्रफ यांना सत्ता लाभली नाही. कोणत्याही आघाडीवर पाकिस्तानचे प्रश्न हाताळता आले नाहीत. अमेरिकेचे मांडलिकत्वसुद्धा भारत द्वेषासाठी त्यांनी स्वीकारले होते. त्यांचा वेश, राहणीमान आणि व्यक्त होण्याची कला प्रभावी असली, आधुनिक वाटत असली तरी ते मूलतत्त्ववादीच होते. दहशतवादाचा निवडणूक वापर आणि निवडणूक विरोध अशा दोन्हीही बाजूने ते विचार करत होते. लाहोरनंतर आग्रा करार यशस्वी करून भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करून नवा इतिहास घडविण्याची संधीही त्यांच्या या ‘गुणा’ने गमाविली.

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफPakistanपाकिस्तानIndiaभारत