शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

मराठवाड्याचे आरोग्य दुर्लक्षितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:13 IST

जीवनदायी अवयवदान मोहिमेत औरंगाबाद, नांदेड आणि आता लातूरनेही दातृत्व दाखविले. मरणोपरांत इतरांच्या आयुष्याला बळकटी देणारे हृदय दान दिले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना वा मराठवाड्यातील असंख्य ग्रामीण लोकांना सुदृढ आरोग्यासाठी कायम झगडावे लागते.

- धर्मराज हल्लाळेजीवनदायी अवयवदान मोहिमेत औरंगाबाद, नांदेड आणि आता लातूरनेही दातृत्व दाखविले. मरणोपरांत इतरांच्या आयुष्याला बळकटी देणारे हृदय दान दिले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना वा मराठवाड्यातील असंख्य ग्रामीण लोकांना सुदृढ आरोग्यासाठी कायम झगडावे लागते. सर्वसाधारण सुविधाही त्यांच्या वाट्याला येत नाहीत. आरोग्याच्या निर्देशांकात हा प्रदेश कायम मागे आहे. आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू असलेली प्राथमिक आरोग्य व्यवस्था ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरील एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आहे. ३० ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. ज्याला आपण साधन सुविधा म्हणतो, त्याची तर प्रचंड वानवा आहे. आरोग्य केंद्रांच्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहेत, अशा दिसतात. मराठवाड्यात एकही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. अमरावती, नाशिकला ते होऊ शकते. विदर्भातील नागपूरला एम्ससारख्या वैद्यकीय संस्था उभारल्या जातील. मात्र अजूनही मराठवाड्यातील जनतेला हृदय, यकृत, किडनीच्या अत्याधुनिक उपचारासाठी मुंबई, पुणे वा हैदराबादच्या फेºया माराव्या लागतात.ताणतणाव आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातही मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. जगण्याचे भान हरवलेली माणसे शेकडोंच्या संख्येने अवतीभोवती दिसतात. अशा रुग्णांनाही उपचारांसाठी येरवडा, ठाणे, नागपूरला रुग्ण पाठवावे लागतात. प्रत्येकाला सन्मानाने आयुष्य जगण्याचा अधिकार घटनादत्त आहे. परंतु, अनोळखी, भान विसरलेली माणसे, अर्धवस्त्र इतकेच नव्हे बºयाचदा विवस्त्रावस्थेत हिंडतात. त्यांना भरती करण्याची कुठलीही सोय मराठवाड्याच्या भूमीत नाही. वैद्यकीय क्षेत्रात लागणारे तांत्रिक मनुष्यबळ तयार करणारी कोणतीही यंत्रणा येथे नाही. एक्स-रे तंत्रज्ञापासून ते कॅथलॅब तंत्रज्ञापर्यंत हजारोंचे तांत्रिक मनुष्यबळ उभे करणारी एखादी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात द्या, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी वारंवार केली.नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बाल विभागात झालेल्या मृत्यूमुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले. मात्र त्याचवेळी मराठवाड्याच्या शासकीय रुग्णालयांतील नवजात बालकांसाठी आवश्यक असलेले न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये किती आधुनिक उपकरणे आहेत, हे तपासण्याची तसदी यंत्रणेने घेतली नाही. महिलांच्या आरोग्याविषयी तर अक्षम्य दुर्लक्ष होते. आदिवासीबहुल पट्ट्यातील किनवटमध्ये सहा महिन्यांत आठ मातामृत्यू झाले होते. परिणामी, केवळ ट्रॉमा केअरची संख्या वाढवून शासनाने पाठ थोपटून घेण्यापेक्षा माता व बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व सिंधुदुर्गला हेल्थ केअरमध्ये मॉडेल जिल्हे बनवा, अशा सूचना दिल्या. त्यावरही मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. बेलखोडे यांनी प्रश्न उपस्थित केला. संकल्पना अभिनंदनीय आहे. विदर्भ, कोकणाचा विचार केला त्याचेही कौतुक. मात्र त्याचवेळी मराठवाड्यातील एखादा जिल्हा का निवडला नाही? विरोधक थंड आणि सत्ताधारी प्रभावहीन झाल्याची जाणीव मराठवाड्याला होत आहे. त्यामुळेच विकासाचा मार्ग इथल्या मातीतून जाताना दिसत नाही.dharmraj.hallale@lokmat.com