शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे आरोग्य दुर्लक्षितच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 03:13 IST

जीवनदायी अवयवदान मोहिमेत औरंगाबाद, नांदेड आणि आता लातूरनेही दातृत्व दाखविले. मरणोपरांत इतरांच्या आयुष्याला बळकटी देणारे हृदय दान दिले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना वा मराठवाड्यातील असंख्य ग्रामीण लोकांना सुदृढ आरोग्यासाठी कायम झगडावे लागते.

- धर्मराज हल्लाळेजीवनदायी अवयवदान मोहिमेत औरंगाबाद, नांदेड आणि आता लातूरनेही दातृत्व दाखविले. मरणोपरांत इतरांच्या आयुष्याला बळकटी देणारे हृदय दान दिले. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांना वा मराठवाड्यातील असंख्य ग्रामीण लोकांना सुदृढ आरोग्यासाठी कायम झगडावे लागते. सर्वसाधारण सुविधाही त्यांच्या वाट्याला येत नाहीत. आरोग्याच्या निर्देशांकात हा प्रदेश कायम मागे आहे. आरोग्य सेवेचा केंद्रबिंदू असलेली प्राथमिक आरोग्य व्यवस्था ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावरील एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आहे. ३० ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. ज्याला आपण साधन सुविधा म्हणतो, त्याची तर प्रचंड वानवा आहे. आरोग्य केंद्रांच्या इमारती अखेरच्या घटका मोजत आहेत, अशा दिसतात. मराठवाड्यात एकही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. अमरावती, नाशिकला ते होऊ शकते. विदर्भातील नागपूरला एम्ससारख्या वैद्यकीय संस्था उभारल्या जातील. मात्र अजूनही मराठवाड्यातील जनतेला हृदय, यकृत, किडनीच्या अत्याधुनिक उपचारासाठी मुंबई, पुणे वा हैदराबादच्या फेºया माराव्या लागतात.ताणतणाव आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ग्रामीण भागातही मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. जगण्याचे भान हरवलेली माणसे शेकडोंच्या संख्येने अवतीभोवती दिसतात. अशा रुग्णांनाही उपचारांसाठी येरवडा, ठाणे, नागपूरला रुग्ण पाठवावे लागतात. प्रत्येकाला सन्मानाने आयुष्य जगण्याचा अधिकार घटनादत्त आहे. परंतु, अनोळखी, भान विसरलेली माणसे, अर्धवस्त्र इतकेच नव्हे बºयाचदा विवस्त्रावस्थेत हिंडतात. त्यांना भरती करण्याची कुठलीही सोय मराठवाड्याच्या भूमीत नाही. वैद्यकीय क्षेत्रात लागणारे तांत्रिक मनुष्यबळ तयार करणारी कोणतीही यंत्रणा येथे नाही. एक्स-रे तंत्रज्ञापासून ते कॅथलॅब तंत्रज्ञापर्यंत हजारोंचे तांत्रिक मनुष्यबळ उभे करणारी एखादी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात द्या, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य तथा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी वारंवार केली.नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील बाल विभागात झालेल्या मृत्यूमुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले. मात्र त्याचवेळी मराठवाड्याच्या शासकीय रुग्णालयांतील नवजात बालकांसाठी आवश्यक असलेले न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये किती आधुनिक उपकरणे आहेत, हे तपासण्याची तसदी यंत्रणेने घेतली नाही. महिलांच्या आरोग्याविषयी तर अक्षम्य दुर्लक्ष होते. आदिवासीबहुल पट्ट्यातील किनवटमध्ये सहा महिन्यांत आठ मातामृत्यू झाले होते. परिणामी, केवळ ट्रॉमा केअरची संख्या वाढवून शासनाने पाठ थोपटून घेण्यापेक्षा माता व बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर व सिंधुदुर्गला हेल्थ केअरमध्ये मॉडेल जिल्हे बनवा, अशा सूचना दिल्या. त्यावरही मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. बेलखोडे यांनी प्रश्न उपस्थित केला. संकल्पना अभिनंदनीय आहे. विदर्भ, कोकणाचा विचार केला त्याचेही कौतुक. मात्र त्याचवेळी मराठवाड्यातील एखादा जिल्हा का निवडला नाही? विरोधक थंड आणि सत्ताधारी प्रभावहीन झाल्याची जाणीव मराठवाड्याला होत आहे. त्यामुळेच विकासाचा मार्ग इथल्या मातीतून जाताना दिसत नाही.dharmraj.hallale@lokmat.com