शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मनाचिये गुंथी - संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:16 AM

अंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं.

किशोर पाठकअंधारात चिमण्या फडफडतात की कावळे कोकलतात कळत नाही. अंदाज घ्यायचा पाखरांचा. त्यांच्या आवाजाचा आणि मग मार्गक्रमण करायचं. किंबहुना आपण कोण याचाही अशावेळी अंदाज घ्यावा लागतो. आपण शोधत असतो आपल्यालाच कळत नाही आपण आपण आहोत की अजून कोणी? असं निरर्थक होत जाणं म्हणजे स्वत:ला दिशांच्या स्वाधीन करणं. मग वारा वाहील तसा आपला प्रवास आणि आपण या सर्वात अनोळखी होत जातो स्वत: मग शोधूही लागतो आपल्यालाच. हा शोध विलक्षण असतो. आपण हरवलोत की नाही माहीत नाही. पण आपण आपल्याला सापडत नाही. अखंड शोध चालू असतो. वाटतं की हेच आहोत आपण, पण आपण ते नसतो आणि आपण जे असतो त्यावर विश्वास बसत नाही. आपण तेच आहोत असं जरी कुणी म्हटलं तरी ते खरं वाटत नाही. पुन्हा खरं काय त्याचाही अदमास लागत नाही. ज्याला आपण खरं मानतो त्याला पूर्ण असत्य कुणीतरी म्हणतं. मग खरं काय? हा खऱ्याचा प्रवास खरं तर खडतरच. कारण गवसलेले सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही आणि असलेल्याचा आपला सातत्याने नकार म्हणूनच आपण ते नाकारतो आणि जे पूर्ण नाकारतो तेच सत्य म्हणून समोर दत्त म्हणून उभं राहतं. आता असा संभ्रम पोकळ अवस्था मनाची होतेच तेव्हा आपण कुठल्या पर्वातून जात असतो? म्हणजे प्रत्येक वयात असे संभ्रम आपल्याला भेडसावतात. लहानपणी आपल्याला गरम तव्याला, ज्योतीला हात लावावासा वाटतो. आई बाबा नाही म्हणतात. वर्गात आपली गृहितके सर नामंजूर करतात. त्यांच्या पद्धतीने विचार करावा लागतो. तरुणपणी एखादीबद्दल आकर्षण वाटते ती आपली पत्नी होऊ शकत नाही. एक मित्र म्हणाला, अति सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून नको. का तर मला न्यूनगंड येईल. पण असा न्यूनगंड स्त्रियांना येत नाही? एखाद्या अतिशय नाजूक तरुणीला जाडाभरडा, काळा कुळकुळीत धिप्पाड नवरा मिळतो तेव्हा तिला काय वाटत असेल म्हणजे आपण पूर्ण मनाचं, मनासारखं वागू शकत नाही म्हणजे आपल्यावर कुणी बळजबरी केलीच असते असे नाही पण नाही आपण काही करू शकत. चांगला विचार डोक्यात घुसला की पक्का जाऊन बसतो. त्याचा राग येत नाही. आपण त्याचा विचार करतो. संभ्रमाची अवस्था दूर जाऊ लागते. खरंतर संभ्रम काही क्षण का होईना दूर गेलेले असतात आणि नवे संभ्रम निर्माण होण्यापूर्वीचा स्वच्छ प्रकाश असतो तो. ज्यात नक्की चांगलंच वाटतं. कारण संभ्रम नसतात, नवे नसतात आणि जुने संपलेले असतात.