शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मालदीव, पंतप्रधान मोदी आणि कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:26 IST

Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे.

गेल्यावर्षी भारत आणि मालदीव यांच्या संबंधांत मोठीच कटुता निर्माण झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर आणि या नितांत रमणीय अशा पर्यटनस्थळाला भारतीयांनी आवर्जून भेट द्यावी, असं आवाहन केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. त्यात   मालदीवच्या मंत्र्यांनीही यात उडी घेत थेट मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्यानंतर भारतात सर्व स्तरात चीड व्यक्त केली गेली.

मालदीवचे मंत्री मरियम शिऊना, अब्दुल्ला माजिद आणि माल्शा शरीफ यांनी यासंदर्भात अनावश्यक टिप्पण्या करत स्वच्छता आणि सेवेच्या बाबतीत भारत आमच्याशी कधीच स्पर्धा करू शकत नाही, अशी विधानंही केली होती. त्यानंतर भारतीय जनतेनं मालदीवच्या विरोधात स्वयंस्फूर्तीनं हॅशटॅग BoycottMaldives ही मोहीम चालवली होती. अनेकांनी पर्यटनासाठी मालदीवला जाण्यावर बहिष्कार टाकला. मालदीवची तिकिटं रद्द केली आणि लक्षद्वीपला जाणं पसंत केलं. त्याचा मालदीवला फारच मोठा फटका बसला. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्यावर  भारतावर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना डच्चू मिळाला, शिवाय मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइजू यांनाही मध्यस्थी करावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे. यासंदर्भात कतरिनानं म्हटलं आहे, मालदीव हे आरामदायी राहणीमान आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक आहे. ही एक अशी जागा आहे, जिथे साधेपणा आणि शांतता या दोन्ही गोष्टींचा संगम झालेला आहे. या ‘सनी साईड ऑफ लाईफ’चा मी चेहरा असल्याचा मला अभिमान आहे. मालदीवच्या ज्या नागरिकांनी आणि मालदीवच्या मंत्र्यांनी भारताची खिल्ली उडवली होती, त्याच मालदीवची कतरिना कैफ ब्रॅण्ड ॲम्बॅसडर कशी काय झाली याबाबत अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, मालदीव आता ‘डॅमेज कंट्रोल’च्या मूडमध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांनी मालदीव भेटीचं आमंत्रण दिलं आहे. मोदी पुढील महिन्यात मालदीवला जाणार आहेत.

ज्या मालदीवला भारतीयांनी आजवर मोठ्या प्रमाणावर सर्वतोपरी मदत केली, तोच मालदीव उलटल्यावर, ‘इंडिया आऊट’सारख्या वादग्रस्त घोषणा त्यांनी दिल्यानंतर बॉलिवूडनंही मालदीवचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता. यात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर यांनी पुढाकार घेतला होता. अक्षय कुमारनं तर आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ज्या देशातले सर्वाधिक पर्यटक मालदीवमध्ये येतात, ज्यांच्या भरवशावर इथली अर्थव्यवस्था चालते त्याच देशाची बदनामी करणं, नावं ठेवणं ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे!

२०२३मध्ये जगातून भारतातले सर्वाधिक २,१०,१९८ नागरिक मालदीवला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, दोन्ही देशांत वाद झाल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०२४ या काळात केवळ ४३,९९१ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले. २०२३ला याच काळात भारतीय पर्यटकांची इथली संख्या मात्र ७३,७८५ होती! भारतीय पर्यटक तब्बल ४० टक्क्यांनी घटले!

टॅग्स :Katrina Kaifकतरिना कैफMaldivesमालदीवIndiaभारतtourismपर्यटन