शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मालदीव, पंतप्रधान मोदी आणि कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:26 IST

Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे.

गेल्यावर्षी भारत आणि मालदीव यांच्या संबंधांत मोठीच कटुता निर्माण झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर आणि या नितांत रमणीय अशा पर्यटनस्थळाला भारतीयांनी आवर्जून भेट द्यावी, असं आवाहन केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. त्यात   मालदीवच्या मंत्र्यांनीही यात उडी घेत थेट मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्यानंतर भारतात सर्व स्तरात चीड व्यक्त केली गेली.

मालदीवचे मंत्री मरियम शिऊना, अब्दुल्ला माजिद आणि माल्शा शरीफ यांनी यासंदर्भात अनावश्यक टिप्पण्या करत स्वच्छता आणि सेवेच्या बाबतीत भारत आमच्याशी कधीच स्पर्धा करू शकत नाही, अशी विधानंही केली होती. त्यानंतर भारतीय जनतेनं मालदीवच्या विरोधात स्वयंस्फूर्तीनं हॅशटॅग BoycottMaldives ही मोहीम चालवली होती. अनेकांनी पर्यटनासाठी मालदीवला जाण्यावर बहिष्कार टाकला. मालदीवची तिकिटं रद्द केली आणि लक्षद्वीपला जाणं पसंत केलं. त्याचा मालदीवला फारच मोठा फटका बसला. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्यावर  भारतावर टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना डच्चू मिळाला, शिवाय मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइजू यांनाही मध्यस्थी करावी लागली होती.

या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे. यासंदर्भात कतरिनानं म्हटलं आहे, मालदीव हे आरामदायी राहणीमान आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक आहे. ही एक अशी जागा आहे, जिथे साधेपणा आणि शांतता या दोन्ही गोष्टींचा संगम झालेला आहे. या ‘सनी साईड ऑफ लाईफ’चा मी चेहरा असल्याचा मला अभिमान आहे. मालदीवच्या ज्या नागरिकांनी आणि मालदीवच्या मंत्र्यांनी भारताची खिल्ली उडवली होती, त्याच मालदीवची कतरिना कैफ ब्रॅण्ड ॲम्बॅसडर कशी काय झाली याबाबत अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र, मालदीव आता ‘डॅमेज कंट्रोल’च्या मूडमध्ये आहे. पंतप्रधान मोदी यांनाही त्यांनी मालदीव भेटीचं आमंत्रण दिलं आहे. मोदी पुढील महिन्यात मालदीवला जाणार आहेत.

ज्या मालदीवला भारतीयांनी आजवर मोठ्या प्रमाणावर सर्वतोपरी मदत केली, तोच मालदीव उलटल्यावर, ‘इंडिया आऊट’सारख्या वादग्रस्त घोषणा त्यांनी दिल्यानंतर बॉलिवूडनंही मालदीवचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला होता. यात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर यांनी पुढाकार घेतला होता. अक्षय कुमारनं तर आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, ज्या देशातले सर्वाधिक पर्यटक मालदीवमध्ये येतात, ज्यांच्या भरवशावर इथली अर्थव्यवस्था चालते त्याच देशाची बदनामी करणं, नावं ठेवणं ही गोष्ट अतिशय आश्चर्यकारक आहे!

२०२३मध्ये जगातून भारतातले सर्वाधिक २,१०,१९८ नागरिक मालदीवला पर्यटनासाठी गेले होते. मात्र, दोन्ही देशांत वाद झाल्यानंतर जानेवारी ते एप्रिल २०२४ या काळात केवळ ४३,९९१ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले. २०२३ला याच काळात भारतीय पर्यटकांची इथली संख्या मात्र ७३,७८५ होती! भारतीय पर्यटक तब्बल ४० टक्क्यांनी घटले!

टॅग्स :Katrina Kaifकतरिना कैफMaldivesमालदीवIndiaभारतtourismपर्यटन