शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
4
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
5
Stock Market Today: ३२० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, मेटल आणि फार्मा सेक्टरमध्ये तेजी; IT स्टॉक्स आपटले
6
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
7
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
8
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
10
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
11
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
12
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
13
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
14
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
15
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
17
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
18
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
19
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
20
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे

आजचा अग्रलेख: निर्णय झाले, कोंडी कायम! आंदोलनाची धग कमी होण्यासाठी सरकारची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 08:21 IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारची धडपड सुरू असली तरी आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय त्यासाठी निर्णायक ठरतील असे वाटत नाही.

आरक्षणप्रश्नी मराठा समाज अत्यंत आक्रमक झालेला असताना आणि सध्याच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले व बेमुदत उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मराठा समाजासाठी काही निर्णय होणे अपेक्षितच होते. आंदोलनाची धग कमी व्हावी आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारची धडपड सुरू असली तरी आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय त्यासाठी निर्णायक ठरतील असे वाटत नाही. सरकार आणि आंदोलक यांच्यात संवाद व्हावा, असे वातावरण अद्याप तयार होऊ शकलेले नाही.

आंदोलनामुळे सरकारला धडकी भरली आहे हे दिसतेच आहे. त्यामुळे आरक्षणाच्या दृष्टीने निर्णयांच्या प्रक्रियेला गती द्यायला सरकारला भाग पाडले आहे. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने अहवालात नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या. त्यातील ज्यांच्या १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरू आहे. याचा अर्थ यापुढेही ज्यांच्या अशा नोंदी आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. ज्यांना असे कुणबी प्रमाणपत्र मिळेल त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच दिले होते, आता ते प्रत्यक्ष अंमलात आणण्यास सुरुवात झाली आहे.

तपासलेल्या एकूण नोंदींची संख्या पावणेदोन कोटी आहे आणि त्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणार असलेल्यांची संख्या काही हजारांतच आहे. त्यामुळे या निर्णयाने आंदोलकांचे पूर्ण समाधान होईल, अशी शक्यता नाही. मात्र त्याचवेळी अशी प्रमाणपत्रे देण्याचा घेतलेला निर्णय, मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमणे, मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारणे आणि मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी अत्यंत पूरक असा इम्पिरिकल डेटा राज्य मागासवर्ग आयोगामार्फत नव्याने गोळा करण्याचा घेतलेला निर्णय बघता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकार संवेदनशील असल्याचे दिसते. इम्पेरिकल डेटा नव्याने गोळा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे ते मुख्यत्वे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणप्रश्नी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनशी संबंधित आहे. या पिटीशनवर सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्यापूर्वी मराठा आरक्षणाची बाजू भक्कम व्हावी यासाठी हा डेटा उपयुक्त ठरणार आहे.

ओबीसींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळावे यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या समितीने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा केला होता आणि त्याचा आरक्षणासाठी मोठा फायदा झाला होता. मराठा समाजाचा असाच डेटा गोळा करून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला तर आरक्षण मिळविण्यासाठी ते साहाय्यभूत ठरेल ही राज्य सरकारची भूमिका दिसते. न्यायालयातही टिकावे असे आरक्षण आम्ही देऊ असे शिंदे सरकार सातत्याने सांगत आहे. त्या दृष्टीने हा प्रयास सरकार करणार असले तरी त्याचा उपयोग कालापव्ययासाठी होवू नये हीच रास्त अपेक्षा आहे. आंदोलनाचा आवेग प्रचंड आहे आणि तो कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर सरकारला प्रतिसादाची गतीदेखील वाढवावी लागेल. तसे झाले नाही तर आंदोलक आणि सरकारमध्ये संवाद होण्याची शक्यता तर मावळेलच, शिवाय वातावरण चिघळण्याचीच शक्यता बळावत जाईल. ते राज्याच्या हिताचे निश्चितच नसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मराठा आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. सध्याच्या आरक्षण आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून न बघता आंदोलनकर्त्यांना न्याय मिळावा आणि तणावाचे वातावरण निवळावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. सरकारने घेतलेले निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावून लावले आहेत. त्यामुळे आता सरकारला जरांगे पाटील यांचे आणि पर्यायाने आंदोलनाचे समाधान होईल, असे ठोस काहीतरी करण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील