शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 06:48 IST

भारताच्या कैदेतून सुटल्यावर सर्वत्र भाषणे देत फिरणारा 'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या मसूद अझरला 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताने मोठा तडाखा दिला आहे.

- निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार

'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेअंतर्गत भारतीय लष्करानं बहावलपूर या गावात केलेल्या हल्ल्यात 'जैश-ए-महंमद'चा प्रमुख मसूद अझरचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मसूदच्या दोन बहिणी आणि त्यांची कुटुंबं मिळून चौदा व्यक्ती या हल्ल्यात मृत पावल्या. त्यात लहान मुलंही आहेत. या हल्ल्यानंतर मसूदच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध झालं. 'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता' अशा आशयाची भावना त्याने या निवेदनात व्यक्त केली आहे.

कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा. वर्ष १९९४ मध्ये मसूदला काश्मीरमध्ये अटक झाली होती. मसूद भारतात अनेक तुरुंगांमधे होता. वर्ष १९९९ मध्ये मसूदच्या सहकाऱ्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणारं विमान पळवलं. 'मसूदला सोडलंत तर विमान आणि पळवलेली माणसं सोडू' अशी अट अपहरणकर्त्यांनी घातली. तत्कालीन भाजप सरकारनं ती अट मान्य केली आणि त्या काळातले परदेश मंत्री जसवंत सिंग यांच्या व्यक्तिगत उपस्थितीत मसूदला सोडण्यात आलं. मसूद पळाला, कराचीत गेला. तिथं त्यानं एक मोठ्ठी सभा घेतली आणि जाहीर केलं की, भारत नष्ट केल्याशिवाय, काश्मीर भारतातून सोडवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. मसूद हा कुणी किरकोळ दहशतवादी म्होरक्या नव्हता. काश्मीरमधे येण्याआधी त्यानं दीर्घकाळ ब्रिटनमधे दौरा करून बरेच जिहादी मिळवले होते, बरेच पैसे जमा केले होते. काश्मीर स्वतंत्र करणं हा त्याचा हेतू होता.

भारताच्या कैदेतून सुटल्यावर मसूद पाकिस्तानभर मोकळेपणानं फिरत राहिला. आधीची हरकत-उल-अन्सार ही दहशतवादी संघटना बरखास्त करून त्यानं 'जैश-ए-महंमद' ही संघटना स्थापन केली होती, तिचा तो सरचिटणीस, बहावलपूर हे त्यानं केंद्र केलं होतं. पाकिस्तानात जिहादी मदरशांची मोठ्ठी साखळी हक्कानी बंधूंनी तयार केली होती. हक्कानींचे जिहादी अफगाणिस्तानात घातपात करत असत. भारतातल्या घातपाताची जबाबदारी 'जैश-ए-महंमद 'वर होती.

हक्कानी संघटना आणि जैश या दोन्ही संघटनांना पैसा आणि बाकीची मदत पाकिस्तानचं 'आयएसआय' करत असे. यात काहीही गुप्त वगैरे नव्हतं. मसूदच्या कारवायांना वर्तमानपत्रांत भरपूर प्रसिद्धी मिळत असे. खुलेआम सभा घेऊन तो भारतविरोधी भाषणं करत फिरत असे. पाकिस्तान सरकारला बेकायदेशीर धंदे करण्यासाठी नॉन स्टेट अॅक्टर्सची गरज कायमच होती. हक्कानी आणि मसूद हे त्यापैकी. पाकिस्तान सरकार त्यांच्याकरवी बेकायदेशीर धंदे करून घेत असे. अफगाण सरकारनं अनेकवेळा पाकिस्तानकडं तक्रारी नोंदल्या आणि 'या खासगी सैन्याला आवरा' असं सांगितलं. पाकिस्ताननं अफगाण सरकारच्या विनंत्यांना कचऱ्याची टोपली दाखवली.

वर्ष १९९९ मध्ये सुटल्यावर मसूदने आपल्या उपकारकर्त्यावरच सूड उगवला. २००१ मध्ये त्यानं दिल्लीत संसदेवरच हल्ला घडवला. वर्ष २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यातही मसूदचा मोठा हात होता. १७३ भारतीय आणि ९ जिहादी या हल्ल्यात मरण पावले. १० दहशतवादी बिनधास्त मुंबईत घुसले. गल्लीगल्लीत फिरले. ताज हॉटेल, हॉस्पिटल, बाटला हाउस, बोरीबंदर स्टेशन इत्यादी ठिकाणी हिंडून गोळीबार केला. व्यवस्थेतील गलथानपणामुळं पोलिस अधिकाऱ्यांचा बळी गेला. भारताच्या संरक्षण सिद्धतेची जगभर नाचक्की झाली. दहशतवाद्यांना तेच व्हायला हवं होतं.

वर्ष २०१६ मध्ये मसूदनं सु-नियोजित पठाणकोट हल्ला घडवला. पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळामधे ४ जिहादी घुसले. पाकिस्तानमधून बोटीनं नदी पार करून ते पठाणकोटमधे पोचले. दाणादाण उडवून ९ माणसं मारून ते स्वतः ही मृत पावले. आत्मघातकी हल्लाच होता तो आणि मरण्यासाठीच ते पठाणकोटमध्ये आले होते. भारतातला गलथानपणा त्यांना उघड करायचा होता. वर्ष २०१९ मध्ये एक आत्मघातकी माणूस एका ट्रकवर टनावारी स्फोटकं घेऊन जम्मू, श्रीनगर रस्त्यावर पुलवामा या ठिकाणी पोहोचला. या रस्त्यावरून केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना नेणारा ट्रकचा काफिला जाणार आहे, हे त्याला माहीत होतं. तो काफिल्यावर धडकला. प्रचंड स्फोट झाला. ४० जवान मारले गेले.

ही घटना जगभर गाजली. हा हल्ला जैश-ए-महंमदनं, मसूद अझरनं योजला होता, हे जगभर प्रसिद्ध झालं. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, संयुक्त राष्ट्रसंघाने मसूदला दहशतवादी म्हणून जाहीर केलं. मसूद बिनधास्त पाकिस्तानभर फिरत होता. पाकिस्तानी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था त्याला असे.मसूद अझर बहावलपूरमधे जन्मला. तिथल्या देवबंदी मदरशात त्यानं इस्लामी शिक्षण घेतलं. नंतर अफगाणिस्तानातल्या जिहादी दहशतवादी शाळेत तो दाखल झाला. नंतर काही काळ तो अफगाणिस्तानात लढला, जखमी झाल्यावर पाकिस्तानात परतला. तिथून त्यानं त्याची जिहादी करियर सुरू केली. सोमालियात गेला. इंग्लंडमधे गेला. तिथं तो कुराणावर भाषणं करीत असे. 'आयएसआय'नं त्याच्यावर भारताची जबाबदारी सोपवली, काश्मीर हे त्याचं कार्यक्षेत्रं ठरलं. बहावलपूरमधून तो भारतावरच्या हल्ल्याचं नियोजन करू लागला.

त्याचा तोच तळ भारताच्या लष्कराने उद्ध्वस्त केला आहे. त्याचे नातेवाईक आणि साथीदार मारले गेले आहेत. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेच्या पोटात अशा अनेक कहाण्या दडलेल्या आहेत. त्यांचा उलगडा व्हायला काही काळ जावा लागेल, हे मात्र खरं.damlenilkanth@gmail.com

टॅग्स :masood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर