शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:50 IST

लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये तात्पुरता हर्ष निर्माण करण्यापेक्षा राज्याच्या तिजोरीचे वास्तव चित्र जनतेपुढे मांडा. त्यांना विश्वासात घेऊन, निर्णयप्रक्रियेचा भाग बनवा. हे सरकार आपले आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, हा विश्वास संयमाने निर्माण करा.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि पहिल्या दोन तासांत गुरुवारी रात्रीच ते कामालाही लागले. कोणतेही नवे सरकार सत्तेवर आले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लोकानुनय करणारे निर्णय घेण्याकडे त्याचा कल असतो. मात्र, तसे करताना राज्याच्या तिजोरीला हे निर्णय परवडतील की नाही, याचाही विचार न करता आर्थिक बोजा वाढविणाऱ्या घोषणा केल्या जातात. त्यातून तेवढ्यापुरती प्रसिद्धी जरूर मिळते. मात्र, तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही. देशभर कोणत्याही राज्यात हेच दिसून येते, पण महाराष्टÑाच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाने या मोहात न पडता चांगला पायंडा पाडला.राज्यात ओल्या दुष्काळामुळे हजारो शेतकरी त्रस्त आहेत. कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सत्तेवर आलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमध्ये येण्याआधी राज्यभर दुष्काळ पाहणी दौरे केले होते. त्यात संपूर्ण कर्जमाफीची मागणीही त्यावेळी राज्यपालांकडे केली होती. शिवसेनाची भूमिका कर्जमाफीची नाही, तर कर्जमुक्तीची राहिलेली आहे. ती त्यांनी वारंवार जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच, असे आश्वासन सत्तेत येण्याआधी उद्धव ठाकरे करत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफी होणार, असे राज्यभरातील शेतकरी गृहीत धरून होते, पण आपल्या पहिल्याच बैठकीत या नव्या सरकारने असे काहीही केले नाही. या आधी किती घोषणा झाल्या आहेत? केंद्राने किती निधी दिला आहे? राज्याने किती निधीची तरतूद केली? प्रत्यक्षात किती कर्जमाफी दिली गेली? या सगळ्या प्रश्नांची माहिती तातडीने गोळा करून वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा. आम्हाला शेतकºयांना भरीव मदत करायची आहे, नुसते आश्वासन द्यायचे नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. राज्याच्या तिजोरीचा अंदाज न घेता उगाच लोकप्रिय घोषणा करण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनी टाळला. हाच संयम त्यांना राज्य चालविताना पदोपदी दाखवावा लागेल. त्यासाठी अनेकदा अप्रिय निर्णयदेखील घ्यावे लागतील. वेळप्रसंगी कटुता घ्यावी लागेल, पण घेतलेल्या निर्णयांची कारणे जर जनतेला विश्वासात घेऊन समजावून सांगितली; तर जनता सोबत येईल. शेवटी राज्याची तिजोरी भक्कम राहिली, तर राज्य भक्कम राहील.

आजवरच्या सरकारांनी जनतेला गृहीत धरण्याचे काम केले आहे. खरी माहिती द्यायची नाही; आर्थिक भार आधीच्या सरकारमुळे आला असे सांगत राहायचे, या शब्दजंजाळातून प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट ते आणखी जटिल होत जातात. भाजप सरकारने पाच वर्षे हेच केले. काँग्रेस- राष्टÑवादीने जे केले, त्यापेक्षा आम्ही कसे वेगळे केले, यातच त्यांनी पाच वर्षे घालविली. महाआघाडी सरकारने तो मोह टाळावा. उलट राज्याचे वास्तव चित्र त्यांनी जनतेसमोर आणावे. खरी माहिती द्या, त्यावरचे उपाय जनतेलाही विचारा, विश्वासाचे वातावरण निर्माण करा. सरकारच्या निर्णय प्रक्रियेचे आम्हीदेखील एक भाग आहोत, हा आत्मविश्वास राज्यात सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदतच करेल. रोज एकमेकांच्या विरोधात बोलायचे, जुन्या भाषणांच्या व्हिडीओंना नव्याने फोडणी द्यायची, हे कोणीतरी थांबवायला हवे. नाहीतर जुन्या आणि नव्यांमध्ये फरकच नाही, हे वास्तव पुन्हा लोकांसमोर येईल.टीका करणे सोपे असते, हे आत्ताच्या सत्ताधा-यांना विरोधात असताना कळून चुकले आहे आणि आत्ताच्या विरोधकांना सरकारची परिस्थिती कशी आहे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विकासाच्या कामात राजकारण न आणता, जनतेच्या आशाआकांक्षांना पंख द्या, त्यांचे प्रश्न सुटले; तर हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यांची ताकद हीच राज्याची ताकद आहे, याचा विसर पडू देऊ नका. जी संयमी सुरुवात केली आहे, त्यासाठी हे सरकार अभिनंदनास पात्र आहे, पण ही केवळ सुरुवात ठरू नये, ही अपेक्षाही आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार