शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:50 IST

लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये तात्पुरता हर्ष निर्माण करण्यापेक्षा राज्याच्या तिजोरीचे वास्तव चित्र जनतेपुढे मांडा. त्यांना विश्वासात घेऊन, निर्णयप्रक्रियेचा भाग बनवा. हे सरकार आपले आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, हा विश्वास संयमाने निर्माण करा.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि पहिल्या दोन तासांत गुरुवारी रात्रीच ते कामालाही लागले. कोणतेही नवे सरकार सत्तेवर आले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लोकानुनय करणारे निर्णय घेण्याकडे त्याचा कल असतो. मात्र, तसे करताना राज्याच्या तिजोरीला हे निर्णय परवडतील की नाही, याचाही विचार न करता आर्थिक बोजा वाढविणाऱ्या घोषणा केल्या जातात. त्यातून तेवढ्यापुरती प्रसिद्धी जरूर मिळते. मात्र, तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही. देशभर कोणत्याही राज्यात हेच दिसून येते, पण महाराष्टÑाच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाने या मोहात न पडता चांगला पायंडा पाडला.राज्यात ओल्या दुष्काळामुळे हजारो शेतकरी त्रस्त आहेत. कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सत्तेवर आलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमध्ये येण्याआधी राज्यभर दुष्काळ पाहणी दौरे केले होते. त्यात संपूर्ण कर्जमाफीची मागणीही त्यावेळी राज्यपालांकडे केली होती. शिवसेनाची भूमिका कर्जमाफीची नाही, तर कर्जमुक्तीची राहिलेली आहे. ती त्यांनी वारंवार जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच, असे आश्वासन सत्तेत येण्याआधी उद्धव ठाकरे करत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफी होणार, असे राज्यभरातील शेतकरी गृहीत धरून होते, पण आपल्या पहिल्याच बैठकीत या नव्या सरकारने असे काहीही केले नाही. या आधी किती घोषणा झाल्या आहेत? केंद्राने किती निधी दिला आहे? राज्याने किती निधीची तरतूद केली? प्रत्यक्षात किती कर्जमाफी दिली गेली? या सगळ्या प्रश्नांची माहिती तातडीने गोळा करून वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा. आम्हाला शेतकºयांना भरीव मदत करायची आहे, नुसते आश्वासन द्यायचे नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. राज्याच्या तिजोरीचा अंदाज न घेता उगाच लोकप्रिय घोषणा करण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनी टाळला. हाच संयम त्यांना राज्य चालविताना पदोपदी दाखवावा लागेल. त्यासाठी अनेकदा अप्रिय निर्णयदेखील घ्यावे लागतील. वेळप्रसंगी कटुता घ्यावी लागेल, पण घेतलेल्या निर्णयांची कारणे जर जनतेला विश्वासात घेऊन समजावून सांगितली; तर जनता सोबत येईल. शेवटी राज्याची तिजोरी भक्कम राहिली, तर राज्य भक्कम राहील.

आजवरच्या सरकारांनी जनतेला गृहीत धरण्याचे काम केले आहे. खरी माहिती द्यायची नाही; आर्थिक भार आधीच्या सरकारमुळे आला असे सांगत राहायचे, या शब्दजंजाळातून प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट ते आणखी जटिल होत जातात. भाजप सरकारने पाच वर्षे हेच केले. काँग्रेस- राष्टÑवादीने जे केले, त्यापेक्षा आम्ही कसे वेगळे केले, यातच त्यांनी पाच वर्षे घालविली. महाआघाडी सरकारने तो मोह टाळावा. उलट राज्याचे वास्तव चित्र त्यांनी जनतेसमोर आणावे. खरी माहिती द्या, त्यावरचे उपाय जनतेलाही विचारा, विश्वासाचे वातावरण निर्माण करा. सरकारच्या निर्णय प्रक्रियेचे आम्हीदेखील एक भाग आहोत, हा आत्मविश्वास राज्यात सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदतच करेल. रोज एकमेकांच्या विरोधात बोलायचे, जुन्या भाषणांच्या व्हिडीओंना नव्याने फोडणी द्यायची, हे कोणीतरी थांबवायला हवे. नाहीतर जुन्या आणि नव्यांमध्ये फरकच नाही, हे वास्तव पुन्हा लोकांसमोर येईल.टीका करणे सोपे असते, हे आत्ताच्या सत्ताधा-यांना विरोधात असताना कळून चुकले आहे आणि आत्ताच्या विरोधकांना सरकारची परिस्थिती कशी आहे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विकासाच्या कामात राजकारण न आणता, जनतेच्या आशाआकांक्षांना पंख द्या, त्यांचे प्रश्न सुटले; तर हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यांची ताकद हीच राज्याची ताकद आहे, याचा विसर पडू देऊ नका. जी संयमी सुरुवात केली आहे, त्यासाठी हे सरकार अभिनंदनास पात्र आहे, पण ही केवळ सुरुवात ठरू नये, ही अपेक्षाही आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार