शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

महाविकास आघाडीच्या सरकारची संयमी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:50 IST

लोकप्रिय घोषणा करून जनतेमध्ये तात्पुरता हर्ष निर्माण करण्यापेक्षा राज्याच्या तिजोरीचे वास्तव चित्र जनतेपुढे मांडा. त्यांना विश्वासात घेऊन, निर्णयप्रक्रियेचा भाग बनवा. हे सरकार आपले आहे, आपल्या कल्याणासाठी आहे, हा विश्वास संयमाने निर्माण करा.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि पहिल्या दोन तासांत गुरुवारी रात्रीच ते कामालाही लागले. कोणतेही नवे सरकार सत्तेवर आले की, पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत लोकानुनय करणारे निर्णय घेण्याकडे त्याचा कल असतो. मात्र, तसे करताना राज्याच्या तिजोरीला हे निर्णय परवडतील की नाही, याचाही विचार न करता आर्थिक बोजा वाढविणाऱ्या घोषणा केल्या जातात. त्यातून तेवढ्यापुरती प्रसिद्धी जरूर मिळते. मात्र, तिजोरीवर आणि पर्यायाने जनतेच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढण्याशिवाय काहीही साध्य होत नाही. देशभर कोणत्याही राज्यात हेच दिसून येते, पण महाराष्टÑाच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाने या मोहात न पडता चांगला पायंडा पाडला.राज्यात ओल्या दुष्काळामुळे हजारो शेतकरी त्रस्त आहेत. कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सत्तेवर आलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमध्ये येण्याआधी राज्यभर दुष्काळ पाहणी दौरे केले होते. त्यात संपूर्ण कर्जमाफीची मागणीही त्यावेळी राज्यपालांकडे केली होती. शिवसेनाची भूमिका कर्जमाफीची नाही, तर कर्जमुक्तीची राहिलेली आहे. ती त्यांनी वारंवार जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच, असे आश्वासन सत्तेत येण्याआधी उद्धव ठाकरे करत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफी होणार, असे राज्यभरातील शेतकरी गृहीत धरून होते, पण आपल्या पहिल्याच बैठकीत या नव्या सरकारने असे काहीही केले नाही. या आधी किती घोषणा झाल्या आहेत? केंद्राने किती निधी दिला आहे? राज्याने किती निधीची तरतूद केली? प्रत्यक्षात किती कर्जमाफी दिली गेली? या सगळ्या प्रश्नांची माहिती तातडीने गोळा करून वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा. आम्हाला शेतकºयांना भरीव मदत करायची आहे, नुसते आश्वासन द्यायचे नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमी भूमिका घेतली. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. राज्याच्या तिजोरीचा अंदाज न घेता उगाच लोकप्रिय घोषणा करण्याचा मोह मुख्यमंत्र्यांनी टाळला. हाच संयम त्यांना राज्य चालविताना पदोपदी दाखवावा लागेल. त्यासाठी अनेकदा अप्रिय निर्णयदेखील घ्यावे लागतील. वेळप्रसंगी कटुता घ्यावी लागेल, पण घेतलेल्या निर्णयांची कारणे जर जनतेला विश्वासात घेऊन समजावून सांगितली; तर जनता सोबत येईल. शेवटी राज्याची तिजोरी भक्कम राहिली, तर राज्य भक्कम राहील.

आजवरच्या सरकारांनी जनतेला गृहीत धरण्याचे काम केले आहे. खरी माहिती द्यायची नाही; आर्थिक भार आधीच्या सरकारमुळे आला असे सांगत राहायचे, या शब्दजंजाळातून प्रश्न कधीच सुटत नाहीत. उलट ते आणखी जटिल होत जातात. भाजप सरकारने पाच वर्षे हेच केले. काँग्रेस- राष्टÑवादीने जे केले, त्यापेक्षा आम्ही कसे वेगळे केले, यातच त्यांनी पाच वर्षे घालविली. महाआघाडी सरकारने तो मोह टाळावा. उलट राज्याचे वास्तव चित्र त्यांनी जनतेसमोर आणावे. खरी माहिती द्या, त्यावरचे उपाय जनतेलाही विचारा, विश्वासाचे वातावरण निर्माण करा. सरकारच्या निर्णय प्रक्रियेचे आम्हीदेखील एक भाग आहोत, हा आत्मविश्वास राज्यात सकारात्मक वातावरण तयार करण्यास मदतच करेल. रोज एकमेकांच्या विरोधात बोलायचे, जुन्या भाषणांच्या व्हिडीओंना नव्याने फोडणी द्यायची, हे कोणीतरी थांबवायला हवे. नाहीतर जुन्या आणि नव्यांमध्ये फरकच नाही, हे वास्तव पुन्हा लोकांसमोर येईल.टीका करणे सोपे असते, हे आत्ताच्या सत्ताधा-यांना विरोधात असताना कळून चुकले आहे आणि आत्ताच्या विरोधकांना सरकारची परिस्थिती कशी आहे, हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विकासाच्या कामात राजकारण न आणता, जनतेच्या आशाआकांक्षांना पंख द्या, त्यांचे प्रश्न सुटले; तर हीच जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यांची ताकद हीच राज्याची ताकद आहे, याचा विसर पडू देऊ नका. जी संयमी सुरुवात केली आहे, त्यासाठी हे सरकार अभिनंदनास पात्र आहे, पण ही केवळ सुरुवात ठरू नये, ही अपेक्षाही आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार