शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जगाला वेड लावणारे (पडद्यावरचे) महात्मा गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 10:39 IST

Mahatma Gandhi : चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले, की जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते.

- प्रकाश मगदूम  (सनदी अधिकारी, चित्रपट अभ्यासक)जगातील सर्वाधिक फोटो ज्यांचे घेतले गेले आहेत आणि सर्वांत जास्त चित्रीकरण ज्यांच्यावर झाले आहे, अशा व्यक्तींमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचे नाव घेतले जाते. गांधींचा जन्म होऊन १५०हून जास्त वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या मृत्यूला सोमवारी ७५ वर्षे झाली. तरीसुद्धा हलत्या बोलत्या चित्रांचे जे सिनेमा नावाचे माध्यम आहे त्यामध्ये या माणसाविषयीचे कुतूहल काही कमी होत नाही. यातला विरोधाभास असा की, गांधींना सिनेमा आवडत नव्हता. केवळ वेळ वाया घालवण्याची ही गोष्ट असून, त्यापासून काहीही फायदा होत नाही, उलट नुकसानच होते, असे त्यांचे मत होते आणि त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले.  

गांधींचे जीवन हे अनेक चमत्कारी गोष्टींनी भरलेले आहे आणि त्यातील नाट्याकडे अनेकानेक चित्रपट दिग्दर्शकांचे लक्ष आकृष्ट झाले. मध्यमवर्गीय घरात जन्मलेला एक लाजरा - बुजरा युवक इंग्लंडमध्ये शिक्षण घेतो, आफ्रिकेत जाऊन स्वबांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करतो आणि भारतात परत येऊन बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याविरूध्द स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करतो, तेही अहिंसात्मक पद्धतीचा अवलंब करून! या सर्व गोष्टी चित्रपट उद्योगासाठी कथानक म्हणून पूरक होत्या. अशा प्रकारे त्यांची मूल्ये आणि तत्वे यावर विविध भाषांमध्ये आणि वेगवेगळया कालावधीमध्ये चित्रपट बनले. त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण आढावा घेणारे चरित्रपट बनले. गांधीजी जिवंत असते, तर सध्याच्या प्रश्नावर त्यांची काय भूमिका असती, असा कल्पनाविलास करूनसुद्धा कलाकृती बनवल्या गेल्या.या सर्व विषयांपैकी गांधींची हत्या हा विषय चित्रपट उद्योगाला कायमच खुणावत आला आहे. एका अहिंसेच्या पुजाऱ्याला निःशस्त्र अवस्थेत वयाच्या ७८व्या वर्षी गोळ्या घालून ठार केले जाते आणि सर्व जगाला मोठा धक्का बसतो. मानवतेला काळिमा फासणारी ही कृती ज्या पद्धतीने घडली, ज्या काळात घडली, त्या पार्श्वभूमीचा  विचार करता चित्रपट उद्योगाला त्यामध्ये नाट्य जाणवले. त्यामागे विचारधारेचा संघर्ष जाणवला. 

गांधींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये पुन्हा एकदा या विषयाकडे लक्ष वेधले गेले आणि At Five Past Five हा चित्रपट निर्माण झाला. सुरुवातीचे काही क्षण पडद्यावर अंधारच दिसतो. थोर संगीतकार वसंत देसाई यांनी पार्श्वसंगीत दिलेले गांधींच्या आवडत्या वैष्णव जन तो... या अभंगाचे सूर फक्त ऐकायला येतात. मग भिंतीवरचे घड्याळ दुपारचे ३:३० ही वेळ दाखवते. अतिशय तणावाखाली असणारा एक तरुण हातात पिस्तूल खेळवताना दिसतो. खून करण्याचा पक्का इरादा असणाऱ्या मारेकऱ्यासाठीसुद्धा प्रत्यक्ष गुन्हा करण्यापूर्वीचे काही क्षण चलबिचल करणारे असतात. त्यानंतर एक मोठा आवाज ऐकायला येतो, ‘सर्वांसमोर तुला मारले जाईल !’ - प्रत्यक्ष नावाने उल्लेख केला नसला तरी हे स्पष्ट केले जाते, की मरणाऱ्या व्यक्तिचा जन्म पोरबंदरमध्ये झाला आहे.

ललित सहगल यांनी लिहिलेल्या ‘हत्या एक आकार की’ या हिंदी नाटकावर आधारित हा चित्रपट कुमार वासुदेव यांनी दिग्दर्शित केला होता. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या वासुदेव यांनी नंतर ‘हमलोग’ या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शन केले होते. 

कथानक असे आहे की, हत्येच्या कटात सहभागी असलेले चार साथीदार एकत्र जमले आहेत आणि त्यावेळी एक जण अचानक माघार घेतो. त्याच्या मते त्यांचा विरोध विचारसरणीला आहे, व्यक्तिला नाही. त्यामुळे ही हत्या अनावश्यक आणि चुकीचे कृत्य आहे. आपली विवेकबुद्धी जागृत असलेल्या या माणसामुळे बाकीचे साथीदार चिंतेत पडतात. मग असे ठरते, की एक आभासी कोर्ट बोलावून त्यासमोर निवाडा करायचा. बाकीच्या पात्रांपैकी एक जण वकील, एक जण न्यायाधीश आणि तिसरा इतिहासाचे प्रतिनिधित्व करतो, अशा प्रकारे कोर्टाचे कामकाज सुरू होते. आरोपी म्हणून विवेकबुद्धी जागृत असलेल्या या माणसाला पिंजऱ्यात उभे केले जाते आणि आरोपांचे उत्तर देण्याची जबाबदारीही त्याच्यावर टाकली जाते. आरोप म्हणून विचारले जाणारे प्रश्न म्हणजे गांधींवर घेतले जाणारे ठरावीक आक्षेप असतात.

मुस्लिमांचे लांगूलचालन, नेताजी बोससारख्यांचे खच्चीकरण, भगतसिंग इत्यादी क्रांतिकारकांचा बचाव न करणे... या प्रत्येक आरोपांचे खंडन मुद्देसूद पुराव्यासकट आणि तेही गांधींचे शब्द आणि लेखन यांचा वापर करून केले जाते. या कोर्टामध्ये सर्वसामान्य जनतासुद्धा हजर असते आणि गांधींच्या प्रत्येक उत्तराला टाळ्या वाजवून पाठिंबा देते. त्यामुळे हे गुन्हेगार आणखीन बावचळतात. पण, शेवटी हा सर्व साळसूदपणे केलेला बनाव असतो. आरोपीला दोषी ठरवायचेच असते आणि न्यायाधीश शेवटी तसे फर्मावतो. १९६९ मध्ये झालेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गांधी पुरस्काराने वासुदेव यांना सन्मानित करण्यात आले.

हा चित्रपट इंग्रजी भाषेत बनवला होता. त्यामुळे जास्त प्रेक्षकांपुढे तो पोहोचू शकला नाही. दुसरी बाब म्हणजे, चित्रपट एक तासाचा होता. त्यामुळे नेहमीच्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबरोबर दाखवला जाणे अवघड बनले. त्यासाठी वेगळा वेळ राखून ठेवणे हे व्यावसायिक गणितात बसले नाही. म्हणून केवळ आमंत्रितांसाठी असे काही शो झाले. त्याव्यतिरिक्त हा चित्रपट कोणालाही पाहायला मिळाला नाही. चित्रपट न आवडणाऱ्या एका माणसावर सिनेमा इंडस्ट्रीने इतके प्रेम केले की, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगातील सर्वाधिक चित्रीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये गांधींचे नाव घेतले जाते. अजूनही या जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाविषयी कुतूहल जागृतच आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर, त्यांच्या मूल्यांवर आधारित चित्रपट बनत राहतील..(प्रकाश मगदूम यांच्या The Mahatma on Celluloid : A Cinematic Biography या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकानिमित्त...)(लेखातील मते वैयक्तिक आहेत.)

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत