शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अधिवेशनाने काय दिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 09:20 IST

Maharashtra winter session 2021 : आवाजी मतदानाचा विषय राज्यपालांकडे नक्कीच अडकेल याचा अंदाज सरकारला असायला हवा होता. तरीही आवाजी मतदानाचा ठराव केला गेला व तो अपेक्षेनुसार राज्यपालांकडे अडकला.

विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले अन् पुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता नागपुरी उन्हात २८ फेब्रुवारीपासून होणार आहे. यावेळी हिवाळी अधिवेशनाची नागपूरची संधी गेली. निदान फेब्रुवारीतील अधिवेशनाबद्दल तरी तसे होऊ नये. जागा बदलली; तरी नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. मुख्यमंत्री एक मिनिटही उपस्थित राहू शकले नाहीत असे हे राज्याच्या इतिहासातील पहिलेच अधिवेशन. येतील, येतील असे सांगितले गेले, पण ते आले नाहीत. तब्येतीच्या मर्यादा त्यांना सतावत आहेत असे दिसते. त्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगली बॅटिंग केली.

कामकाज रेटून नेण्यावर सरकारचा नेहमीच भर असतो आणि हे अधिवेशन पाचच दिवसांचे म्हटल्यानंतर तर, सरकार त्यासाठी विशेष आग्रही होते. मात्र, राज्यपालांच्या कुलपती या नात्याने असलेल्या अधिकारांचा संकोच करणारे, उच्च शिक्षण मंत्र्यांना अनिर्बंध अधिकार देणारे आणि कुलगुरूंची उंची कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक ज्या पद्धतीने घाईघाईत अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवाज बंद करून मंजूर करण्यात आले. त्याचे पडसाद भविष्यात नक्कीच उमटतील. ते टाळले असते, तर अधिवेशनाचा शेवट गोड झाला असता.

सरकार विरुध्द राजभवन अशी वर्चस्वाची लढाई महत्त्वाची, की विद्यापीठांची स्वायत्तता महत्त्वाची याचा विचार होणे आवश्यक आहे. हे अधिवेशन सर्वाधिक लक्षात राहील ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळल्याने. त्यासाठी जबाबदार कोण?, राज्यपाल की, राज्यपालांच्या आडून भाजप की, महाविकास आघाडीतील असमन्वय, यावर वादविवाद होऊ शकतील पण, १७० हून अधिक आमदारांचा भक्कम पाठिंबा असलेले महाविकास आघाडी सरकार आपला अध्यक्ष निवडून आणू शकले नाही, हे वास्तव उरतेच.

तीन पक्षांमध्ये काँग्रेस हा लहान पक्ष असला, तरी सरकार स्थापण्यात त्यांची भूमिका महत्त्वाचीच होती. अशावेळी काँग्रेसचा आदर करीत कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात करण्याची जबाबदारी शिवसेना व राष्ट्रवादीची देखील होती. काँग्रेसनेही त्या दोघांवर त्यासाठी दबाव आणायला हवा होता.  सरकार भक्कम आहे म्हणता, तर मग पूर्वीचीच गुप्त मतदान पद्धत कायम का ठेवली नाही?, घातपाताची भीती होती म्हणूनच   आवाजी मतदानाचा नियम केला गेला. अशा घटनांमुळे ‘सरकारकडे बहुमत आहे, पण सरकारमध्ये एकमत नाही’, या आरोपाला बळ मिळते. आवाजी मतदानाचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात अडकला. राजभवन विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटल्याचे अवघ्या देशाने पाहिले. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीचे संकेत दिल्याने की काय; अध्यक्षपदापेक्षा सत्ता महत्त्वाची असा विचार करून सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसले.

आवाजी मतदानाचा विषय राज्यपालांकडे नक्कीच अडकेल याचा अंदाज सरकारला असायला हवा होता. तरीही आवाजी मतदानाचा ठराव केला गेला व तो अपेक्षेनुसार राज्यपालांकडे अडकला. लागोपाठ तिसऱ्या अधिवेशनात काँग्रेसची अध्यक्षपदाची झोळी रिकामी राहिली. अध्यक्षपदाची निवड न होण्यामागे राज्यपालांनी निर्माण केलेला पेचप्रसंग हे तर कारण आहेच; पण अध्यक्षपद आपल्या गळ्यात पडले तर काय करता?- या भीतीपोटी अनुत्सुक काँग्रेसचे धुरीण, हंगामी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच असल्याने त्यांची स्वस्थता अन् राज्यपाल काहीही म्हणत असले तरी निवडणूक झालीच पाहिजे  या भावनेचा शिवसेनेसह तिन्ही पक्षांमध्ये असलेला अभाव हीदेखील कारणे आहेत. आमदारांच्या सभागृहातील आणि विधानभवन परिसरातील वर्तनाबद्दल माध्यमांनी लिहिले तर, तो हक्कभंग होऊन शिक्षा होण्याची भीती!

आमदारांच्या गैरवर्तणुकीला चाप बसावा म्हणून या अधिवेशनात आचारसंहिता निश्चित केली गेली आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतला हे स्वागतार्ह पाऊल आहे. नेते, मंत्र्यांची टिंगलटवाळी करण्यासाठी अंगविक्षेप, म्याव-म्याव असे भलतेसलते प्रकार याच अधिवेशनात घडल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना आचारसंहितेची उपरती झाली. महाराष्ट्राची ओळख ही अत्यंत सुसंस्कृत राज्य अशी आहे आणि ती तशीच कायम ठेवायची, तर आमदारांचे सभागृहातील आणि सार्वजनिक जीवनातील वर्तन सुधारायलाच हवे. आता सोनारानेच कान टोचल्याने आचारसंहितेची कवचकुंडले घालून आमदार नीट वागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.  

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा