शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आजचा अग्रलेख: ‘प्रहार’ की ‘हार’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:13 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणाकरिता ५९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शिवसेना साठीत प्रवेश करताना इतकी जराजर्जर झालेली असेल ...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणाकरिता ५९ वर्षांपूर्वी स्थापन केलेली शिवसेना साठीत प्रवेश करताना इतकी जराजर्जर झालेली असेल व तिला तिच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल, असे बाळासाहेबांना स्वप्नातही वाटले नसेल. बाळासाहेब हे धर्म, कर्मकांड वगैरे न मानणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव. बाळासाहेबांनी राजकारणात  वेळोवेळी ज्या भूमिका घेतल्या त्या त्यांच्यावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी स्वीकारल्या. 

शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेत भाजपचे प्रमोद महाजन व अन्य नेत्यांना भविष्यातील उत्कर्षाची शिडी दिसली. भाजपने शिवसेनेसोबत युती केली. ठाकरे यांचे बुक्के व कधीकधी लाथा सुद्धा हसत सहन केल्या. नरेंद्र मोदी यांचा उदय झाल्यावर आणि बाळासाहेब निवर्तल्यावर मात्र परिस्थिती बदलली. भाजप मोठा भाऊ झाला आणि शिवसेनेकडे धाकलेपण आले. हे धाकलेपण स्वीकारायला उद्धव ठाकरे तयार झाले नाहीत. अडवाणी-महाजन यांनी मातोश्रीवर जाऊन जसे हात जोडले तसे ते आता उद्धव-आदित्य यांनी दिल्लीला जाऊन जोडावे ही भाजपची अपेक्षा होती. मात्र ‘झुकेगा नही’ हा बाणा उद्धव यांनी ठेवला.

गुरुवारच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणातही आपण भाजपवर ‘प्रहार’ करण्यास सिद्ध आहोत याच पवित्र्यात ते होते व त्यामुळे त्यांनी भाजप व त्यांच्या मित्रांना ‘कम ऑन किल मी’ असे आव्हान दिले. मात्र ‘मला संपवायला येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या’ अशी डायलॉगबाजीही त्यांनी केली. उद्धव हे बाळासाहेब यांचे पुत्र व त्यांनी त्यांच्या हयातीत निश्चित केलेले वारस. मात्र बाळासाहेबांची शिवसेना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे या शिवसैनिकाकडे सोपवली. छगन भुजबळ, नारायण राणे या ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनाही जे जमले नाही ते शिंदे यांनी करून दाखवले.  त्यामुळेच ते मुख्यमंत्री बनले. शिंदे यांनीही वर्धापन दिनाचा जंगी कार्यक्रम केला.

शिंदेसेना आता महायुतीच्या सत्तेत ‘लहान भाऊ’ असली, तरी तिचाही सुप्त संघर्ष भाजपच्या नेत्यांसोबत सुरू आहे. मात्र शिंदे यांच्या भाषणात त्यांनी लक्ष्य केले ते उद्धव यांनाच. काट्याने काटा काढण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला, हे खरे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव यांची बहुमताची सत्ता आली नाही तर भाजप वाट्टेल ते करून आपल्या मनमर्जीची सत्ता बसवेल. अशा परिस्थितीत शिंदेसेना किंवा मनसेलाही महापौरपदाची लॉटरी लागू शकते. मात्र ठाकरेंचा काटा काढल्यावर मग  शिंदेसेना, मनसे यांची उपयुक्तता भाजपकरता हळूहळू लोप पावायला लागेल. भाजपचा हा खेळ उद्धव, राज व शिंदे यांच्या लक्षात आला आहे. 

मात्र राजकीय सारीपटावरील सोंगट्या भाजप आपल्या इच्छेनुसार हलवू शकतो, ही सध्याची स्थिती आहे. येथेच उद्धव यांच्या भाषणातील मनसेसोबत युती करण्याचा मुद्दा चर्चेत येतो. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे’, असे जाहीर करून उद्धव यांनी मनसेसोबत महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत दिले. मात्र २०१४ व २०१७ च्या निवडणुकीत युतीचे गाजर दाखवून उद्धव यांनी ऐनवेळी दगा दिल्याने मनसे नेत्यांच्या मनात शंका आहे. युतीकरिता झुलवत ठेवून ऐनवेळी दगा द्यायचा व मनसेला बदनाम करायचे, असा उद्धव यांचा कावा तर नाही ना? - अशी शंका मनसे घेत आहे. उद्धव-राज यांची युती ही यावेळी उद्धव यांची अधिक गरज आहे. त्यामुळे मुंबईतील दादर, माहीम, परळ, वरळी वगैरे मराठी लोकवस्तीमधील १०० ते १२५ जागांपैकी जास्तीत जास्त जागा मिळवण्याकरिता मनसे यावेळी आग्रही भूमिका घेऊ शकते. तशी भूमिका मनसे घेईल असे मानले जात आहे. याचा अर्थ उद्धव यांना आपल्या ताटातला वाटा काढून भावाला द्यायचा आहे. याला उद्धव तयार होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजराती व हिंदी भाषिकबहुल मतदारसंघात स्वत: लढून भाजप मराठी मतदारांचा वरचष्मा असलेले प्रभाग मनसेला हसत देऊ शकते. याचा अर्थ, उद्धव यांना भाजपला शह द्यायचा असेल तर राज यांच्याशी तडजोड करावीच लागेल. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे