शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा महाराष्ट्र आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 20:25 IST

शेती क्षेत्रच कोसळून पडल्याचा परिणाम देशातील ६० टक्के लोकसंख्येवर झाला व देशाची अर्थव्यवस्था आणखीनच कमकुवत बनली.

- राजू नायकअवकाळी पाऊस, अवर्षण व त्यात भर वातावरण बदलांच्या परिणामांची, त्यामुळे एका बाजूला अर्थकारण गटांगळ्या खात असतानाच, देशातील शेतकऱ्याला सर्वात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. दशकभराच्या उत्पादन घटण्यातून निर्माण झालेली आर्थिक विवंचना, सामाजिक संकटे व नैराश्य यात गटांगळ्या खात तो अधिकाधिक कर्जाच्या खाईत लोटला जात असून व्यसनाधीनही बनत आहे. शेती क्षेत्रच कोसळून पडल्याचा परिणाम देशातील ६० टक्के लोकसंख्येवर झाला व देशाची अर्थव्यवस्था आणखीनच कमकुवत बनली.

आर्थिक हलाखीचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर होतो व त्याचे पर्यवसान शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये होऊ लागले असून महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांचे जीवन खूपच खडतर बनले असल्याचा पडताळा येतो. देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रातशेतकरी मात्र आर्थिक हलाखीमुळे सतत आत्महत्या करतात हे खूपच दुर्दैवी आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी केंद्राच्या ताज्या अहवालानुसार २०१८ मध्ये देशात एकूण १०,३४९ आत्महत्या नोंदविण्यात आल्या त्यात महाराष्ट्रातच ३५९४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून ते राष्ट्रीय सरासरीच्या ३५ टक्के आहे. २०१७ व २०१९ मध्ये महाराष्ट्रातील आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीत ३५ टक्केच राहिले आहे. वर्षाच्या आरंभीच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी केंद्राने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये देशात शेतीवर अवलंबून असलेल्या १०,६५५ लोकांनी आत्महत्या केली. परंतु ही आकडेवारी २०१६ पेक्षा कमीच आहे. त्यात ५९५४ शेतकरी तर ४७०० कृषी मजूर आहेत.

२०१७ मध्ये देशात नोंदविलेल्या एकूण आत्महत्यांमध्ये शेतकऱ्यांनी जीव गमावण्याचे प्रमाण ८.२ टक्के आहे. एनसीआरबीने ऑक्टोबर २०१७ मध्येच गुन्हेविषयक अहवाल प्रसिद्ध केला होता; परंतु आत्महत्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली नव्हती. त्यानंतर २०१६ मधील शेतकºयांची आत्महत्या आकडेवारी त्यांनी प्रसिद्ध केली, जी गतसालापेक्षा घटलेली आहे, असा केंद्राचा दावा आहे.

२०१६ मध्ये ६२७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जी पुन्हा २०१५ पेक्षाही कमी अहे. २०१५ मध्ये ती संख्या ८००७ होती; परंतु महिला शेतकºयांच्या आत्महत्यांमध्ये मात्र वाढ झाली आहे. ही संख्या २०१६ मध्ये २७५ होती, ती २०१७ मध्ये ४८० इतकी बनली. २०१७ मध्ये महाराष्ट्रात सर्वात अधिक आत्महत्या नोंदविण्यात आल्या (३२.२ टक्के), त्या खालोखाल कर्नाटक (१८.३), मध्य प्रदेश (११.६), आंध्र (७.१), छत्तीसगड (६ टक्के). २०१६ मध्येही कर्नाटक, मध्य प्रदेशपेक्षाही महाराष्ट्रात सर्वात अधिक आत्महत्या नोंदविण्यात आल्या होत्या. आपला देश कृषीप्रधान आहे, त्याची शेखीही मिरवली जाते; परंतु सरकारे बदलली तरी शेतकºयांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे मात्र कोणालाच शक्य झालेले नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारgoaगोवाFarmerशेतकरी