शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Maharashtra Flood: पुनर्वसनाचे आव्हान! सरकारला दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 06:18 IST

Ratnagiri, Chiplun Flood: चिपळूण शहराला लागून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात झालेल्या प्रचंड पावसाने अख्खे शहर पुरात भिजून चिंब झाले.

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. विशेषत: गुरुवार, २२ जुलै रोजी या संपूर्ण भागात तीनशे ते नऊशे मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे तीन दिवसांत पंधराशे मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. याच ठिकाणाहून कृष्णा-कोयनेसह पाच नद्यांचा उगम होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाट, गगनबावडा, दाजीपूर इत्यादी ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने पंचगंगा नदीला महापूर आला. कोकणात गोव्याच्या सीमेपासून पालघर म्हणजे गुजरातच्या सीमेपर्यंत कोसळधार पाऊस होता. सुमारे १०२ ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने दरडी कोसळण्याचे मोठे संकट अंगावर आले.

चिपळूण शहराला लागून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात झालेल्या प्रचंड पावसाने अख्खे शहर पुरात भिजून चिंब झाले. महाडची देखील हीच अवस्था होती. तेथून जवळच असलेल्या तळिये गावावर दरड कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले. अद्यापही काही लोक बेपत्ता आहेत. महाबळेश्वर परिसरात लहान-मोठ्या दरडी कोसळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या सर्व आपत्तीत आतापर्यंत ११२ जणांना जीव गमवावा लागला आहे. अद्याप ९९ जणांचा शोध लागलेला नाही. हा आकडा मोठा असू शकतो. सुमारे तीन हजार २१२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नऊ जिल्ह्यांतील एक लाख ३५ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे. त्यापैकी सांगली या एका जिल्ह्यात ७८ हजार लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तेथे ४० हजार ८८२ जणांना हलविण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता दलाच्या ३४ टीम्स दाखल झाल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा आहेत.

मान्सूनचे वारे पाऊस घेऊन येतात आणि सह्याद्रीला अडून पावसाने चिंब करून टाकतात; पण त्याचे स्वरूप असे अक्राळविक्राळ असेल असे वाटले नव्हते. कोकणात, तसेच घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची एखाद-दुसरी घटना घडत असे, पण चालू वर्षी ढगफुटी झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावेच्या गावे गाडली गेली. वाशिष्ठी नदीला अचानक महापुराचा लोंढा आला. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर पाण्याखाली गेले. या साऱ्यांच्या पुनर्वसनाचे आव्हान राज्य सरकारच्या समोर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवस कोकणचे दौरे करून परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्यांच्या घरातील माणसं मृत्युमुखी पडली आहेत आणि घरही जमीनदोस्त झाले आहे, त्यातूनही वाचलेल्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत द्यावी लागणार आहे.

पशुधनाचे व शेतीचे नुकसान झाले आहे. चिपळूण किंवा खेडसारख्या तालुक्याच्या गावची बाजारपेठच पाण्यावर तरंगावी तशी तरंगत होती. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे नीट करून तातडीने मदत देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्याच विविध खात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूणच्या एस.टी. आगारात पंधरा-वीस फूट पाणी उभे राहिल्याने एस.टी. गाड्या बुडाल्या आहेत. आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. सरकारची मदत म्हणजे फार मोठ्या दिव्यातून जावे लागते. त्यासाठी झालेले नुकसान कागदावर आणावे लागते. मात्र, आगीत किंवा पुराच्या पाण्यात असे पुरावेच नष्ट होत असतात. त्यांच्या झालेल्या नुकसानीशी मेळ घालताना माणूस वैतागून जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनेक सार्वजनिक संस्थांचेही नुकसान झाले आहे.

पाणीपुरवठा योजना, वीज वितरण व्यवस्था, रस्ते, गटारी, शाळा, महाविद्यालये इत्यादींच्या उभारणीसाठीही मदत करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आता राज्य सरकारने तातडीची मदत देऊन अशा दरडी कोसळण्याच्या जागांची पाहणी करून काही गावांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्याचा विचार करायला हवा. चिपळूणच्या अतिक्रमणांनीदेखील संकटात भर टाकली आहे. ती अतिक्रमणे मोडून काढली पाहिजेत, तेव्हा लोकप्रतिनिधींनी आडवे पडता कामा नये, आजचे संकट पुन्हा येणारच नाही, असे  कोणी सांगू शकत नाही. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला दोनच वर्षांपूर्वी महापुराने अर्धमेले करून टाकले होते. आता पुन्हा महापुराने प्रचंड नुकसान होत आहे. कोविडशी लढताना महाराष्ट्र शासनाला महापूर, अतिवृष्टी आणि दरडी कोसळून ओढवलेल्या आव्हानांचाही पराभव करावा लागणार आहे. त्यासाठी पुनर्वसनाची दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल.

टॅग्स :floodपूरRatnagiri Floodरत्नागिरी पूरchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाKolhapur Floodकोल्हापूर पूर