शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: राज्याच्या राजकारणाला समतोल सत्ताकारणाचे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 05:33 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारला महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

 महाराष्ट्राच्या राजकारणाने शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याच्या साक्षीने एक मोठे वळण घेतले आहे. मुंबई मराठी माणसांची आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्याच उदरात शिवसेनेचा जन्म झाला. बावन्न वर्षांनंतर या सेनेची स्थापना करणाºया ठाकरे कुटुंबीयांतील सदस्याने सत्ताग्रहण केले आहे. हे ग्रहणही काँग्रेस विचारसरणीच्या बरोबर जाण्याच्या निर्णयाने झाले आहे. त्यालादेखील राज्याच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्व आहे.पुलोद सरकारनंतर अनेक पक्षांचे आणि विचारांचे पाठबळ लाभलेले हे सरकार असणार आहे. त्यामुळे हे सरकार स्थापन करण्याचे गणित सुटले असले तरी सत्ता हाती घेऊन ती समतोलपणे राबविण्याचे कसब उद्धव ठाकरे यांना आत्मसात करावे लागणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी हे अनुभवी असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वत: कधीही संसदीय कामकाजात भाग घेतलेला नाही. त्यांच्या दृष्टीने ही कसोटी ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मुरब्बी पक्षांना सांभाळणे भाजपपेक्षा कठीण काम आहे. सरकारची धोरणे कशी ठरवायची, त्याचा समाजमनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तसेच राजकीय परिणाम काय होणार याची या पक्षांना जाणीव आहे. तसा अनुभव शिवसेनेला असला तरी अनेकवेळा भावनेवर स्वार होण्याची त्यांची पद्धत आहे. सरकार भावनेवर चालत नाही. त्याचेही एक राजकीय व्यवहार, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र असते. ही सर्व कसरत उद्धव ठाकरे यांना करावी लागणार आहे.

सत्ता समन्वयाने चालवायची, जनकल्याण हा केंद्रबिंदू मानायचा असे ठरविले तर ते शक्य आहे. वीस वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीची सत्ता जाऊन विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते, तेव्हा तिजोरीत खडखडाट होता. आघाडीचे सरकार चालविताना देशमुख यांनी उत्तम समन्वय ठेवला म्हणून राज्य सावरले गेले. आजच्या महाराष्ट्रासमोरही अनेक आव्हाने आहेत. शेतकरीवर्ग संकटात आहे, रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. निसर्गाच्या प्रकोपाने सामान्य माणूस हादरून गेला आहे. ही सर्व व्यवस्था सावरण्याचे दिवस आले असताना ठाकरे यांच्या शिरावर मुकुट आला आहे. तो मिरविण्यापेक्षा त्याच्या आधारे कडक धोरणे राबविण्याची तयारी करावी लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रस या पक्षांत अनुभवी नेत्यांची फळी आहे. त्यांना विश्वासात घेऊन राजकारणविरहित शासन निर्णय केले तर एक उत्तम पर्याय मिळाल्याचे समाधान जनतेला होईल.आजवर ठाकरी भाषेत ओरखडे ओढणे वेगळे आणि प्रत्यक्षात राजसत्तेवर ठाकरी वचक निर्माण करणे वेगळे असणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षाही खूप आहेत. शिवसेना हा पक्षच मुळात चळवळीतून पुढे आलेला आहे. सरकार एकदा निर्णय घेत नसेल तर निवेदने देणे, मोर्चा काढणे अशा मार्गाने जाण्याची परंपरा त्यांना नाही. ‘एक घाव, दोन तुकडे’ करण्याची रीत या पक्षाने अवलंबली आहे. तसेच निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार घेईल, या अपेक्षेचे ओझेही असणार आहे. त्याला साद घालावी लागेल. सभागृहात १०५ सदस्य असलेला भाजपसारखा सत्तेचा अनुभव असलेला सक्षम विरोधी पक्षही समोरून चाल करणार आहे. अशा प्रसंगी महाविकास साधण्यासाठी आघाडी मजबूत असावी लागेल. यश मिळाले तर विजयाची पताका कायमच खांद्यावर राहील. मात्र, त्याचबरोबर प्रसंगी अपयशाचेही धनी व्हावे लागेल.
महाविकास आघाडीने जो किमान समान कार्यक्रम आखला आहे, त्याच चाकोरीतून जातानाही वाट चुकणार नाही, कोणी मागे राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. येत्या काही दिवसांनी आणखी मंत्री साथीला येतील. एक मजबूत मंत्रिमंडळ असणार आहे. त्याचवेळी समंजसपणा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी व्यापक भूमिका घेण्यासाठी सज्ज रहावे लागेल. सरकारकडून राज्याच्या भल्याचे निर्णय होवोत, ही शुभेच्छा!

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस