शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘संकल्पा’साठी ‘अर्थ’ आहे? निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्याचे महायुतीसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 08:07 IST

लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्यासह जी विविध आश्वासने महायुतीने निवडणूक काळात दिलेली होती; ती पाच वर्षे या सरकारचा पाठलाग करत राहतील, हे मात्र नक्की.

विधानसभा निवडणूक निकालाने सत्तारूढ महायुतीला प्रचंड यश मिळवून दिल्यानंतरचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. निवडणुकीच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता किती झाली, याची स्पष्टता १० मार्चला वित्तमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडतील तेव्हा येईलच. अर्थात सर्वच आश्वासने एका झटक्यात पूर्ण करण्याची कोणतीही घाई या सरकारला नाही. हाताशी पुढली पाच वर्षे आहेत. राज्यावर ७ लाख ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. घालून दिलेल्या नियमाच्या मर्यादेतच हे कर्ज घेतल्याचे समर्थन प्रत्येकच सरकार करत आले आहे आणि या सरकारची भूमिकाही काही वेगळी नाही. 

एकीकडे कर्जाचा मोठा डोंगर, महायुती सरकारने अडीच वर्षांच्या काळात सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’सह विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला अतिरिक्त भार यातून मार्ग काढत अजित पवार हे आपल्या पोतडीतून लोकाभिमुख योजनांचा गुच्छ यावेळी बाहेर काढतील, याची अजिबात शक्यता नाही. सरकार येऊन इनमिन तीन महिने झाले आहेत. 

नवीन सूनबाईचे पहिले सहा-आठ महिने खूप लाड होतात, तिच्या मनासारखे होऊ दिले जाते.  सरकारबाबत सध्या सर्वांचा दृष्टिकोन तसा स्वागताचा असला, तरी दोन महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, अशी शक्यता लक्षात घेता जनतेच्या पदरात नवीन काहीतरी पाडल्याचा आभास तरी या सरकारला निर्माण करावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बदल्याचे नाही तर आपण बदलाचे राजकारण करू’ असा शब्द देत प्रामाणिक आणि पारदर्शक कारभाराची हमी दिलेली आहे. 

हात ‘देता’ ठेवून खैरात वाटण्याची पद्धत महायुती सरकारने अवलंबलेली होती, ती कायम ठेवणे आता सरकारसाठी गरजेचे नाही आणि राज्याच्या तिजोरीला ते परवडणारेही नाही. शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेले अजित पवार अर्थसंकल्प मांडतील तेव्हा आर्थिक शिस्तीच्या चार गोष्टींचा समावेश करतील, अशी अपेक्षा आहे. योजनांची आणि लाभार्थींची द्विरुक्ती टाळणे, आस्थापना खर्च कमी करणे, सरकारी तिजोरीची लूट थांबवणे याबाबतचे कठोर निर्णय अजित पवार यांनी घ्यावेत, अशी अपेक्षा आहे. 

निवडणुकीच्या चार-सहा महिने आधीपासूनच इतकी खैरात झाली की, आता देण्यासारखे काही शिल्लक नाही. लाडकी बहीण योजनेतील लाखो लाभार्थींची संख्या कमी होत असल्याच्या वा कमी केली जात असल्याच्या बातम्या वरचेवर येतच आहेत. दारी कार असलेल्या, आयकर भरणाऱ्या बहिणींची नावे कमी केली जात असल्याचे समर्थन सरकार आता करते. निवडणुकीच्या आधी हे लक्षात आले नव्हते का, या प्रश्नाचे उत्तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. तरीही,  ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी कमी करण्यासह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला कितपत घेरू शकतील, हा प्रश्न आहेच. 

विरोधकांची मानसिकता असेल तर सरकारची कोंडी करण्यासाठीचे अनेक मुद्दे आहेत. बीडमधील गुंडगिरी, त्यात ‘आका’ म्हणून ज्यांचा सातत्याने उल्लेख होत आहे ते धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात कायम असणे, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतरही मंत्रिपदी चिकटून असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करतील, असे अपेक्षित आहे.  विरोधी पक्षांचे आमदार आपापल्या कामांसाठी मंत्री, मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेतात, हा अलीकडचा अनुभव लक्षात घेता ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’ असे होऊ नये एवढीच अपेक्षा! 

महाविकास आघाडीतील विसंवाद वाढत चालल्याचे माध्यमांमधून अनेकदा येत असते. मात्र, वास्तविकता तशी नाही, आम्ही आजही तसेच एकसंध आहोत, याचा प्रत्यय देण्याची संधी विरोधकांना अधिवेशनानिमित्त आहे. पण त्यांना त्याचे महत्त्व कळले तर! विरोधी पक्षनेतेपदही अद्याप महाविकास आघाडीला मिळू शकलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचा म्हणून एकच चेहरा आज विधानसभेत नाही आणि सरकारला विरोध करण्याची सामूहिक जबाबदारी उचलण्याइतका समन्वय विरोधकांमध्ये दिसत नाही. त्यामुळे सरकारला विरोधकांची भीती वाटावी, अशी स्थिती दिसत नाही. पण कोणाचाही विरोध नसताना स्वत: आधी दिलेल्या शब्दांमध्ये स्वत:चाच पाय फसण्याची पाळी सत्ताधाऱ्यांवर येऊ शकते. लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्यासह जी विविध आश्वासने महायुतीने निवडणूक काळात दिलेली होती; ती पाच वर्षे या सरकारचा पाठलाग करत राहतील, हे मात्र नक्की.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनState Governmentराज्य सरकारMahayutiमहायुती