शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

वैश्विक मूल्यांची मांडणी करणारा महाकवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 00:26 IST

अलौकिक प्रतिभावंत कविकुलगुरू कालिदासाचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते.

- विजय बाविस्करआषाढातील पहिल्या दिवशी सर्जनशील निसर्गाने आसमंतात नवनिर्मितीची प्रक्रिया आरंभ केलेली असते. पावसाचे जे नवचैतन्य निसर्गात अवतरते, त्यातून कालिदासाच्या ‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ या ओळी ओठांवर रेंगाळू लागतात. या ओळींच्या रूपाने कालिदासाच्या स्मृती तनामनात ताज्या होत राहतात.कालिदासाच्या साहित्यात निसर्गाला विशिष्ट स्थान आहे. त्याचे ऋतुसंहार काव्य म्हणजे तर निसर्गाचा जीवनपटच आहे. ‘मेघदूता’तील यक्षाची विरहभावना आकाशाच्या निळाईवर रंगरेषेसारखी उजळते, तर त्याच्या पत्नीच्या विरहमूर्तीला निसर्गछटांची सोनेरी किनार लाभते. ‘कुमारसंभव’ आणि ‘रघुवंश’मध्ये निसर्गातील चित्रणाबरोबर वसंतवैभवाचा उत्सवही ओसंडला आहे.संस्कृत साहित्यात ‘कालिदास’ हा भारतीय संस्कृतीचा प्रातिनिधिक कवी मानला जातो. महाकवी, भावकवी व नाटककार या तिन्ही भूमिकांमधून तो समर्थपणे उभा राहतो. निसर्गात ॠतुचक्राचे माणसाच्या दैनंदिन जीवनावर आणि मनावरही पडसाद उमटतात. निसर्गाच्या ॠतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हे जाणणारा निसर्गसौंदर्याला, मानवी भावभावनेला व जगण्याच्या वास्तवाला शब्दसौंदर्याने फुलवणारा हा ‘महाकवी’ वैश्विक मूल्यांची मांडणी आपल्या रचनांमधून करतो. संस्कृत वाङ्मयाच्या या थोर नाटककारास जयदेव कवीने ‘कविकुलगुरू’ अशी पदवी दिली. बाण कवीने त्याच्या काव्याचे वर्णन ‘मधुररसाने थबथबलेली मंजिरीच’ असे केले आहे.इतिहास, पुराणे, अद्वैतवेदान्त, ज्योतिषशास्त्र, वैद्यक, गणित, व्याकरण, अर्थशास्त्र, संगीत, चित्रकला आदी शास्त्रे व कलांचा अभ्यासक असा कालिदास ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातला राजा विक्रमादित्य याच्या पदरी असलेल्या नवरत्नांपैकी एक. याचे वास्तव्य मध्य प्रदेशात; परंतु बंगाल, ओडिशा, काश्मीर अशा प्रदेशांतही त्याने वास्तव्य केले. त्याच्या काव्यात या सर्व ठिकाणच्या निसर्गसौंदर्याचे अप्रतिम वर्णन चपखलपणे आढळते. हिमालयावरील त्याचे विशेष प्रेम ‘मेघदूत’ या काव्यात प्रकटले आहेच. विद्येबाबत व गुरूंबद्दल त्याला नितांत आदर होता. शृंगारात त्याची वृत्ती अधिक रमत असे. ही वस्तुस्थिती असली तरी तो स्वैराचारी नव्हता. विनोदी, विनयसंपन्न, निरलस आणि वत्सल अशी त्याची प्रतिमा होती. ‘शाकुंतल’ या नाटकात कालिदासाच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची साक्ष आढळते. प्रसिद्ध जर्मन कवी गटे याने, ‘स्वर्ग व पृथ्वी यांचे मधुर मिलन जर कुठे पाहायचे असेल, तर मी कालिदासाच्या ‘शाकुंतल’कडे निर्देश करीन,’ असे गौरवोद्गार काढले आहेत. कोणतीही गोष्ट त्याग व तपस्या यांच्या आधारावरच दिव्य बनते, असे त्याचे ठाम मत होते. त्यामुळेच अद्वितीय श्रेष्ठत्व असलेल्या या कविकुलगुरूचे स्मरण आजही आषाढाच्या पहिल्या दिवशी शब्दोत्सवातून साजरे होते. 

टॅग्स :newsबातम्याcultureसांस्कृतिक