शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

महाश्रमदानाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:11 AM

अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता.

काकडदरा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातलं छोटसं पण टुमदार गाव. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीने प्रकाशझोतात आलेलं. अभिनेता आमिर खान याने दिलेल्या भेटीनंतर या गावातील नागरिकांमध्ये संचारलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. म्हणूनच तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे बक्षीस या गावाने पटकावले. यंदाही आमिर खान यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना श्रमदान आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या वर्षीही चांगलीच रंगात आहे. वर्धा जिल्ह्यातील रानवाडी येथील बंडू धुर्वे या अंध व्यक्तीच्या कार्याने प्रभावित होऊन आमिर खान याने परवा पत्नी किरण राव यांच्यासह चक्क रानवाडी गाठले. आठ तास मुक्कामच केला नाही तर हातात फावडे आणि टोपले घेत श्रमदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातही चिमुकल्यांनी मोठ्यांचा आदर्श घेत वॉटर कप स्पर्धेत खारीचा वाटा उचलला आहे. त्याचीही दखल आमिरने घेतली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबल वाढविले. शिवाय आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही त्याने या चिमुकल्यांना स्थान दिले. त्यामुळे बोरी महल या लहानशा गावाचे महत्त्वही आपसूकच वाढले आहे. पाणीटंचाईने गावा गावात हाहाकार माजविला असून त्यापासून सुटका म्हणजे आपले गाव पाणीदार करणे. त्यामुळे गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात महाश्रमदानात लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तर अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईत चांगलीच भर घातली आहे. याची चाहूल हिवाळ्यातच लागली होती. पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटल्याने तिरावरील ५० गावात पाणीटंचाई निर्माण झाली. पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. यावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. पाण्याची सोय वेळीच केली नाही तर उद्याचे भवितव्य अंध:कारमय आहे, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे. हे आता चिमुकल्यांनाही कळून चुकले आहे. त्यामुळे बोरी महल येथील विद्यार्थी आता स्वत:च रोपवाटिका तयार करतात. शोषखड्ड्यांसाठी श्रमदान करतात. बंधाºयाची आखणी करून देण्यात तर ते तरबेज झाले आहेत. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. गाव पाणीदार करण्याच्या दिशेने चिमुकल्यांनी उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय असून इतरांनीदेखील त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा