शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

महागठबंधन आणि कॉंग्रेसची गोची!

By रवी टाले | Published: April 06, 2019 6:47 PM

स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नुकताच कॉंग्रेसवर अत्यंत गंभीर स्वरुपाचा आरोप केला. कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखिल कर्नाटकातील मांड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या पक्षाची कॉंग्रेससोबत युती आहे; मात्र मांड्या मतदारसंघात आपल्या चिरंजिवांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस चक्रव्यूह रचत असून, त्यासाठी भारतीय जनता पक्षासोबतही कॉंग्रेसचे साटेलोटे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावरील कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा घोषित करून, कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावर आरुढ केले होते. कुमारस्वामी यांच्या शपथविधी समारंभाच्या निमित्ताने देशातील झाडून सारे भाजपविरोधी पक्ष एकत्र आले होते आणि तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्ताच्यूत करण्यासाठी देशव्यापी विरोधी ऐक्य (महागठबंधन) साकारण्याचे सुतोवाच झाले होते. आज तेच कुमारस्वामी जर कॉंग्रेसवर भाजपसोबत साटेलोटे करून त्यांच्या चिरंजिवांना पराभूत करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप करीत असतील, तर परिस्थिती नक्कीच गंभीर आहे, असे म्हटले पाहिजे.महागठबंधन साकारण्याचे सुतोवाच ते लोकसभा निवडणूक हा प्रवास बारकाईने तपासल्यास, कॉंग्रेसच्या मनात नेमके आहे तरी काय, असा प्रश्न कोणत्याही सुजाण राजकीय निरीक्षकाच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनास लाभलेले अभूतपूर्व यश, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करण्याच्या रणनितीस आलेली गोड फळे आणि कर्नाटकात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने दाखविलेली लवचिकता, यामुळे विरोधी ऐक्याबाबत देशभर हुरूप निर्माण झाला होता.कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकांमध्ये मात्र कॉंग्रेसने कर्नाटकात निवडणुकोत्तर दाखविलेली लवचिकता दाखविली नाही आणि जवळपास स्वबळावर तिन्ही राज्यांमध्ये सत्ताही हस्तगत केली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसपेक्षा प्रबळ आहेत, त्या बहुतांश राज्यांमध्ये भाजपविरोधी महागठबंधन साकारू शकले नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश ही त्याची उदाहरणे! ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस प्रबळ आहे त्या राज्यांमध्ये महागठबंधन साकारण्याचा तर मग प्रश्नच मिटला!नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा टेकू घेऊन भाजपने राष्ट्रीय राजकारणातील एक धृव म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले. त्यानंतर काही काळाने देशाच्या राजकारणाने ‘कॉंग्रेस व कॉंग्रेस विरोधी’ ते ‘भाजप व भाजप विरोधी’ असे वळण घेतले. या स्थित्यंतरामध्ये सर्वाधिक गोची झाली ती कॉंग्रेसची! स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला. भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांमधील मतविभाजनाच्या आधारे भाजप मजबूत होत गेला आणि ज्या राज्यांमध्ये जनसंघाला फारसा जनाधार नव्हता त्या राज्यांमध्येही विस्तारत गेला. कालांतराने कॉंग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांच्या ते लक्षात आले आणि मग भाजपला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये कॉंग्रेसही सामील झाली. इथे राजकारणाने घेतलेले वळण पूर्ण झाले. काहीही करून भाजपला रोखायचे हाच कॉंग्रेसचा ‘अजेंडा’ झाल्याचा लाभ प्रादेशिक पक्षांच्या बेरक्या नेत्यांनी अचूक घेतला. भाजपचा बागुलबुवा दाखवून त्यांनी कॉंग्रेसला संकोचण्यास भाग पाडले आणि स्वत:चा विस्तार करून घेतला. आज उत्तर प्रदेश, बिहारसारख्या मोठ्या राज्यांमध्ये कॉंग्रेसला आपले स्थान शोधावे लागत असण्यामागचे कारण हे आहे.महागठबंधन साकारण्यात आलेल्या अपयशासाठी आज कॉंग्रेसला बोल लावल्या जात आहे; मात्र केवळ भाजपला रोखण्यासाठी म्हणून कॉंग्रेसने स्वत:चा किती संकोच करून घ्यायचा, यालाही मर्यादा होतीच! आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपला रोखण्यासाठी एका मर्यादेपलीकडे माघार घेण्यास नकार दिला असेल आणि त्यामुळे महागठबंधन साकारू शकले नसेल तर त्यासाठी केवळ त्यांनाच दोषी ठरवून चालणार नाही. भाजपला रोखण्यासाठी विरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी माघार घेण्याची किंमत प्रत्येक वेळी कॉंग्रेसलाच चुकवावी लागली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याचा तात्कालिक उद्देश भले साध्य झाला असेल; पण त्यामुळे इतर पक्षांचा लाभ आणि कॉंग्रेसचे नुकसान होत गेले. शिवाय एवढे करूनही २०१४ मध्ये भाजपने स्वबळावर केंद्रात सत्तेत येण्यापर्यंत मजल गाठलीच! त्यामुळे कॉंग्रेसला जुने वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर केवळ भाजपसोबत लढून चालणार नाही, तर इतर पक्षांशीही लढावेच लागेल; अन्यथा भाजपविरोधी पक्षांपैकी एक पक्ष एवढीच कॉंग्रेसची मर्यादित ओळख शिल्लक राहील!- रवी टाले                                                                                                    

 ravi.tale@lokmat.com 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस