शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

लोकसभेच्या प्रचारात सभ्यतेचेच वावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:55 IST

विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे.

१९५२ पासून कधी नव्हे तेवढी आपल्या निवडणूक प्रचाराने खालची पातळी २०१९ च्या निवडणुकीत गाठली आहे. देशात याआधीही अनेक चुरशीच्या निवडणुका झाल्या. १९६७ व १९७७ या दोन निवडणुका कमालीच्या टोकदार व हिंसक पातळीवरच्या म्हणता येतील अशा झाल्या. पण पुढारी, माध्यमे, सोशल मीडिया, प्रचारक आणि पक्षांचे कार्यकर्ते यांनी या वेळी प्रचाराची जी नीच व हीन पातळी गाठली तेवढी याआधी ती दुसऱ्या कोणत्याही निवडणुकीत देशाला पाहावी लागली नाही. सुब्रह्मण्यम स्वामी या माणसाच्या जिभेला हाड नाही. ते वाजपेयींपासून जेटलींपर्यंतच्या साऱ्यांना शिवीगाळ करीत आले. अशा माणसाने राहुल गांधींच्या जन्माचे दाखले मागणे व प्रियांकाच्या धर्मश्रद्धेविषयी प्रश्न विचारणे स्वाभाविक मानले पाहिजे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे हे माझ्या शापाने मेल्याचे सांगणे, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्र कळत नाही असे एखाद्या सडकछाप पुढाºयाने म्हणणे, नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या संबंधांची नको तशी चर्चा करणे हा सारा अशाच वाचाळ प्रचाराचा भाग म्हणता येईल. पण तो तसा नाही. यातल्या काहींना घाणेरडी वक्तव्ये करत प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. राहुल आणि सोनिया यांना शिवीगाळ करणे हे त्यांच्या पक्षालाही धर्मकर्तव्यासारखे वाटणारे आहे. मात्र याहून वाईट प्रकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा ऐन मतदानाच्या क्षणापर्यंत वापर करणे हा आहे.
झारखंड, केरळ व बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशांचा ससेमिरा लावणे, त्यांच्या सहकाºयांना अटक करणे, रॉबर्ट वाड्राविरुद्ध पोलीस कारवाई करणे, स्टॅलीन आणि द्रमुकच्या पुढा-यांवर छापे घालणे हा सारा या दुष्टाव्याचा पुरावा आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोसून सोडलेल्या ट्रोल्सकडून पुढा-यांवर लैंगिक आरोप करणे, स्त्रियांविरुद्ध बेशरम विनोद करणे यासारखे प्रकार याआधी आपल्या निवडणुकीत कधी झाले नाहीत. मोदी व त्यांचे सरकार यावर टीका करणा-यांबाबत तर या माध्यमांनी सारे तारतम्यच गुंडाळून ठेवले आहे. त्यांना दिल्या जाणा-या शिव्या आपण कधी सडकेवरही ऐकल्या नसतात. या व अशा भाषेचा वापर प्रत्यक्ष मोदी, शहा, गिरीराज, योगी इत्यादींनी तर केला; पण ज्यामुळे प्रचाराची व लोकशाहीची शान आणखी डागाळेल अशी भाषा सुमित्रा महाजन, आदित्यनाथ, स्मृती इराणी यांनीही वापरली. येत्या काळात आपले राजकारण जास्तीचे हिंस्र, अश्लील व हीन पातळीवर जाणार असल्याचीच ही लक्षणे आहेत. याला आळा घालू शकणा-या निवडणूक आयोगालाही नखे वा दात नाहीत आणि त्याला पुरेशी क्षमताही पुरविलेली नाही हेही या काळात दिसले.
आझम खान व जया प्रदा यांचा संघर्ष, दानवे व खैरे यांची खडाखडी, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांनी पश्चिम बंगालमध्ये तसेच आप व काँग्रेस यांनी दिल्लीत एकमेकांवर केलेली चिखलफेक किंवा प्रादेशिक पुढाºयांनी गल्लीतल्या पोरांनी एकमेकांना ऐकवावी अशी केलेली शिवीगाळ हे प्रकारही या काळात फार झालेत. ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला पोलीस आर्थिक अन्वेषण विभाग, गुप्तहेर खाते, विकत घेतलेली माध्यमे या साºयाच गोष्टी वापरता येतात. विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे. एखाद्याची जातकुळी वा आई-बहीण उद्धारणे ही गोष्ट आता अनेकांना नेहमीची वाटू लागली आहे.
सोशल मीडियावर येणारे ‘संदेश’ आणि त्यावरची विधाने पाहिली की आपण आपल्याच सभ्य देशात राहत आहोत की नाही हा प्रश्न साºयांना पडावा. राजकारण हे धर्मक्षेत्र आहे आणि त्यातली स्पर्धा धर्माच्या सुसंस्कृत पातळीवर लढविली पाहिजे, असे गांधी आणि विनोबा म्हणत. ही माणसे आजचा काळ पाहायला जिवंत नाहीत हे त्यांचे भाग्य वा आपले दुर्दैव मानले पाहिजे. राजकारणाला सभ्यतेचे व सुसंस्कृतपणाचे वळण देण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत नसतील तर ते काम जनतेनेच आता हाती घेतले पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग