शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं..!

By अतुल कुलकर्णी | Published: April 11, 2018 4:00 AM

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे...’ ही कविता लिहिली, ती त्यांच्या काळातली. आज काळ बदलला. त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांची आजच्या काळातली कविता...प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणिखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !!आमच्या पक्षात कावळा, साप, मुंगूस,कुत्रा असं काहीही म्हणत प्रेम करता येतं;कितीही चुकलो आम्ही, तरीहीखुर्चीवरच प्रेम करता येतं...!पाच वर्षं सरली की अंगात घुमू लागतात,जागेपणी पुन्हा एकदा खुर्चीचे झोपाळे;मनामध्ये झुलू लगतात !आठवतं ना? तुमची पाच जेव्हा सरली होती, खुर्ची तुमची कशी घामाने भरली होती !जाती पातीच्या लाटांवर बेभान होऊननाचला होतात तुम्ही,खुर्ची तुमची बुडता बुडतावाचला होतात तुम्ही!बुडली होती खुर्ची तुमची,अजून तुम्हाला वळत नाही,खुर्चीच्या स्वप्नावाचून दिवस तुमचासरता सरत नाही...!तुम्हालाही ते कळलं होतं,मलासुद्धा कळलं होतं !कारणप्रेम खरं तर खुर्चीवरच असतंखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !आम्ही खुर्चीसाठी भांडत नाहीअसं म्हणणारी माणसं झूट असतात,खुर्चीसाठीच झुरणारी माणसंचखरी सच्ची असतात...असाच एक जण मला म्हणाला,आम्ही कधी खुर्चीसाठी काम केलं नाही,पाच वेळा निवडून आलो तरीखुर्चीवर प्रेमबिम केलं नाही !आमचं काही नडलं का?खुर्चीशिवाय अडलं का?तो खरं तर खोटं बोलत होता...खुर्चीसाठीच तो आतून तळमळत होता...तेव्हा मी लगेच त्याला म्हटलं,प्रेम खरं तर खुर्चीवरच असतं आणिखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं...!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !खुर्चीसाठी गाजराचं थाटावं लागतं दुकानअच्छे दिन आणि जुमल्यांचंखोटं खोटं बांधावं लागत मकान...भर दुपारी उन्हात कधीखुर्चीसाठी फिरावं लागतं...मनात आमच्या खुर्ची नाहीअसंच सतत सांगावं लागतं...खुर्चीसाठी कधी कधी रुसणं असतं,खुर्चीशिवाय जगणं सगळं व्यर्थ असतं...खुर्ची आहे तर आम्ही असतो,खुर्ची नसेल आम्ही कुठेच नसतो...जनतेसाठी लढतोय आम्ही,असं सांगावं लागतं... पण,प्रेम खरं तर खुर्चीवरच असतंखुर्ची म्हणजेच आमचं पहिलं प्रेम असतं..!तुमच्या आमच्या खुर्चीत फार अंतर असतं !