शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना हरवल्या?

By admin | Updated: July 26, 2016 02:17 IST

गुजरात राज्यात चार दलित युवकांवर तथाकथित सवर्ण गोरक्षकांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आणि त्याशिवाय अन्यत्रदेखील दलितांवर होत असलेल्या

गुजरात राज्यात चार दलित युवकांवर तथाकथित सवर्ण गोरक्षकांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आणि त्याशिवाय अन्यत्रदेखील दलितांवर होत असलेल्या अत्त्याचाराच्या घटना सतत वाढत असताना हा विषय जेव्हां देश पातळीवरील दोन महत्वाच्या व्यक्तींमध्ये वादाचा विषय बनतो तेव्हां ते बड्यांमधील संवेदना हरवल्याचेच लक्षण मानले गेले पाहिजे. केन्द्रीय मंत्रिमंडळात थावरचंद गेहलोत सध्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत तर पन्नालाल पुनिया राष्ट्रीय पातळीवरील अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोगाने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध करुन देशातल्या विविध राज्यांमधील दलितविरोधी गुन्ह्यांची जंत्री सादर केली आहे. परंतु ही जंत्री चुकीची असल्याचा आणि अत्त्याचारांची आकडेवारी फुगवून अहवालात नमूद केली असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. त्याचे साधे कारण म्हणजे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दलितांवरील अत्त्याचाराचे सर्वाधिक प्रकार गुजरात राज्यात नोंदविले गेले आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे त्या राज्यांमधील अशा घटनांची आकडेवारी जाणीवपूर्वक वाढवून नोंदविली असल्याचा गेहलोत यांचा स्पष्ट आरोप आहे तर आपण दिलेली आकडेवारी (राज्यसभा सदस्य असल्याने) संसदेतील प्रश्नोत्तरांमधून केन्द्रीय गृह मंत्रालयाकडूनच आपल्याला मिळाल्याचे पुनिया यांनी म्हटले आहे. योगायोग म्हणजे गेहलोत यांनी केलेल्या कमी आकडेवारीच्या दाव्याचा उगमदेखील पुन्हा केन्द्रीय गृह मंत्रालय हाच आहे. महत्वाच्या पदांवर असलेल्या या दोन व्यक्तींमधील असा वाद पाहिल्यानंतर पुनिया हे एक काँग्रेसी नेते आहेत आणि संपुआच्या काळात त्यांची संबंधिंत आयोगावर नेमणूक करण्यात आली होती, हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. अर्थात संबंधित पदांवर येण्यापूर्वी त्या दोहोंची राजकीय विचारसरणी भले भिन्न असली तरी दोघांची सामाजिक बांधीलकी एकसमान असायला काही हरकत नव्हती. पण तसे दिसत नाही आणि ते त्यांनीच उघड करुन दाखविले आहे. परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे दलितांवरील अत्त्याचाराचे प्रकरण एक की अनेक याला म्हणजे आकडेवारीच्या खेळाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप प्रत्त्यारोपाना महत्व आहे का कोणत्याही राज्यात एकदेखील अत्त्याचाराचे प्रकरण घडणार नाही अशी तजवीज करण्याला आहे? दोहोंना त्यात स्वारस्य नसावे असे दिसते. अन्यथा पुनिया यांनी गुजरातला दोष देताक्षणी गेहलोत यांनी केरळ आणि कर्नाटक म्हणजे काँग्रेसशासित राज्यांकडे लगेच बोट दाखवले नसते.