शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना हरवल्या?

By admin | Updated: July 26, 2016 02:17 IST

गुजरात राज्यात चार दलित युवकांवर तथाकथित सवर्ण गोरक्षकांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आणि त्याशिवाय अन्यत्रदेखील दलितांवर होत असलेल्या

गुजरात राज्यात चार दलित युवकांवर तथाकथित सवर्ण गोरक्षकांनी केलेल्या अमानुष अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आणि त्याशिवाय अन्यत्रदेखील दलितांवर होत असलेल्या अत्त्याचाराच्या घटना सतत वाढत असताना हा विषय जेव्हां देश पातळीवरील दोन महत्वाच्या व्यक्तींमध्ये वादाचा विषय बनतो तेव्हां ते बड्यांमधील संवेदना हरवल्याचेच लक्षण मानले गेले पाहिजे. केन्द्रीय मंत्रिमंडळात थावरचंद गेहलोत सध्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत तर पन्नालाल पुनिया राष्ट्रीय पातळीवरील अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोगाने अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध करुन देशातल्या विविध राज्यांमधील दलितविरोधी गुन्ह्यांची जंत्री सादर केली आहे. परंतु ही जंत्री चुकीची असल्याचा आणि अत्त्याचारांची आकडेवारी फुगवून अहवालात नमूद केली असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. त्याचे साधे कारण म्हणजे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दलितांवरील अत्त्याचाराचे सर्वाधिक प्रकार गुजरात राज्यात नोंदविले गेले आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे त्या राज्यांमधील अशा घटनांची आकडेवारी जाणीवपूर्वक वाढवून नोंदविली असल्याचा गेहलोत यांचा स्पष्ट आरोप आहे तर आपण दिलेली आकडेवारी (राज्यसभा सदस्य असल्याने) संसदेतील प्रश्नोत्तरांमधून केन्द्रीय गृह मंत्रालयाकडूनच आपल्याला मिळाल्याचे पुनिया यांनी म्हटले आहे. योगायोग म्हणजे गेहलोत यांनी केलेल्या कमी आकडेवारीच्या दाव्याचा उगमदेखील पुन्हा केन्द्रीय गृह मंत्रालय हाच आहे. महत्वाच्या पदांवर असलेल्या या दोन व्यक्तींमधील असा वाद पाहिल्यानंतर पुनिया हे एक काँग्रेसी नेते आहेत आणि संपुआच्या काळात त्यांची संबंधिंत आयोगावर नेमणूक करण्यात आली होती, हे स्वतंत्रपणे सांगण्याची गरज नाही. अर्थात संबंधित पदांवर येण्यापूर्वी त्या दोहोंची राजकीय विचारसरणी भले भिन्न असली तरी दोघांची सामाजिक बांधीलकी एकसमान असायला काही हरकत नव्हती. पण तसे दिसत नाही आणि ते त्यांनीच उघड करुन दाखविले आहे. परंतु त्याहूनही महत्वाचे म्हणजे दलितांवरील अत्त्याचाराचे प्रकरण एक की अनेक याला म्हणजे आकडेवारीच्या खेळाला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप प्रत्त्यारोपाना महत्व आहे का कोणत्याही राज्यात एकदेखील अत्त्याचाराचे प्रकरण घडणार नाही अशी तजवीज करण्याला आहे? दोहोंना त्यात स्वारस्य नसावे असे दिसते. अन्यथा पुनिया यांनी गुजरातला दोष देताक्षणी गेहलोत यांनी केरळ आणि कर्नाटक म्हणजे काँग्रेसशासित राज्यांकडे लगेच बोट दाखवले नसते.