शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दिलासा आणि फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:29 IST

धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले.

मागील एक आठवड्यापासून विदर्भात पावसाचा चांगलाच जोर आहे. धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले. हजारो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. सुरुवातीला दडी मारणाऱ्या पावसाने आता कास्तकाराच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६१ हजार ९३० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर चंद्रपुरात ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. ३०० जनावरे दगावली. ४०० हून अधिक घरांची पडझड झाली. सहा लोक पावसाचे बळी ठरल आहे. तर आशिया खंडातील मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये समावेश होत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाण्याअभावी घरघर लागली होती. आता संततधार पावसामुळे ही काळजी मिटली असली तरी ओल्या कोळशाचे नवीन संकट या प्रकल्पापुढे उभे ठाकले आहे. ही समस्या दर वर्षी निर्माण होत असली तरी वीज केंद्र व्यवस्थापन कोळसा साठवून ठेवण्यासाठी योग्य नियोजन करीत नाही. नऊपैकी सात संचांतून केवळ १२८३ मेगावॅट वीजनिर्मिती सध्या सुरू असल्याने ही बाब राज्याच्या वीज संकटात भर टाकणारी आहे. दुसरीकडे अनेक प्रकल्प १०० टक्के भरले असून काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. पावसामुळे संकटातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसून उलट पिकांना संजीवनी मिळाली आहे. हजारो हेक्टर धान शेतीला या पावसाने तारले आहे. त्यामुळे या भागातील कास्तकार सुखावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हा पाऊस लाभदायी ठरला आहे तर दक्षिण गडचिरोलीमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले. त्यामुळे धानासह कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने परिवहनाची समस्या निर्माण झाली. मागील तीन दिवसांपासून येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. आता झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण होण्याची वाट शेतकरी बघत आहेत. शासनाच्या मदतीचीही त्याला आस आहे. मात्र नेहमीप्रमाणे त्याला ती मिळेल की नाही, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भFarmerशेतकरी