शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दिलासा आणि फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:29 IST

धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले.

मागील एक आठवड्यापासून विदर्भात पावसाचा चांगलाच जोर आहे. धान उत्पादक जिल्ह्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा ठरला तर काही ठिकाणी या पावसाने उभ्या पिकांना आडवे केले. हजारो हेक्टर शेती अद्याप पाण्याखाली आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. सुरुवातीला दडी मारणाऱ्या पावसाने आता कास्तकाराच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ६१ हजार ९३० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर चंद्रपुरात ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. ३०० जनावरे दगावली. ४०० हून अधिक घरांची पडझड झाली. सहा लोक पावसाचे बळी ठरल आहे. तर आशिया खंडातील मोठ्या वीज प्रकल्पांमध्ये समावेश होत असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाण्याअभावी घरघर लागली होती. आता संततधार पावसामुळे ही काळजी मिटली असली तरी ओल्या कोळशाचे नवीन संकट या प्रकल्पापुढे उभे ठाकले आहे. ही समस्या दर वर्षी निर्माण होत असली तरी वीज केंद्र व्यवस्थापन कोळसा साठवून ठेवण्यासाठी योग्य नियोजन करीत नाही. नऊपैकी सात संचांतून केवळ १२८३ मेगावॅट वीजनिर्मिती सध्या सुरू असल्याने ही बाब राज्याच्या वीज संकटात भर टाकणारी आहे. दुसरीकडे अनेक प्रकल्प १०० टक्के भरले असून काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे. पावसामुळे संकटातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नसून उलट पिकांना संजीवनी मिळाली आहे. हजारो हेक्टर धान शेतीला या पावसाने तारले आहे. त्यामुळे या भागातील कास्तकार सुखावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हा पाऊस लाभदायी ठरला आहे तर दक्षिण गडचिरोलीमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. अनेक तालुक्यांना अतिवृष्टीने ग्रासले. त्यामुळे धानासह कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने परिवहनाची समस्या निर्माण झाली. मागील तीन दिवसांपासून येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. आता झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण होण्याची वाट शेतकरी बघत आहेत. शासनाच्या मदतीचीही त्याला आस आहे. मात्र नेहमीप्रमाणे त्याला ती मिळेल की नाही, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भFarmerशेतकरी