शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकपालांची लटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:05 IST

एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही.

एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची सशक्त यंत्रणा, असा लोकपाल कायद्याचा गाजावाजा केला गेला. मोदी सरकार तर भ्रष्टाचार निर्मूलनाचा वसा घेऊन सत्तेवर आले आणि याच मंत्राचा जप मोदी प्रत्येक भाषणात करत असतात. परंतु कृतीची जोड नसल्याने मोदी सरकारची ही उक्ती दांभिक वाटू लागली आहे. स्वत: मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना तब्बल २० वर्षे लोकायुक्त नेमला नव्हता. आता केंद्रात सत्तेवर आल्यानंतरही त्यांची तीच मानसिकता लोकपालांच्या बाबतीत दिसून येत आहे. वरकरणी सांगितल्या जाणाºया अडचणी या अप्रामाणिक हेतू झाकण्यासाठी पुढे केल्या जाणाºया लंगड्या सबबी आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी भाजपाने त्याचा उपयोग पाहुण्याच्या काठीने विंचू मारण्यासाठी करून घेतला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जर्जर झालेल्या संपुआ-२ सरकारने सर्वांच्या दाढीला हात लावून १८ डिसेंबर २०१३ रोजी लोकपाल कायदा संसदेत मंजूर करून घेतला. त्यानंतर ते सरकार प्रत्यक्ष लोकपाल नेमण्याच्या दृष्टीने कामालाही लागले. सरकारच्या या घाईने भाजपाची नियत फिरली. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सरकार आपल्या मर्जीतील लोकांची लोकपाल म्हणून वर्णी लावू पाहात आहे, असा आरोप त्यावेळी भाजपाने केला व हे काम नव्या सरकारवर सोपवावे, असा पवित्रा घेतला. यानंतर अवघ्या तीन महिन्यांत देशातील जनतेने न भूतो अशा बहुमताने भाजपाला सत्तेवर बसविले. खरे तर मोदी सरकारला ही एक नामी संधी होती. आयता मंजूर झालेला लोकपाल कायदा या सरकारच्या हाताशी होता. पण मोदी सरकारने हा कायदा बडगा म्हणून हाती घेण्याऐवजी तो अडगळीत टाकला. लोकपाल निवड समितीमध्ये सदस्याची एक जागा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे नियमांनुसार अधिकृत विरोधी पक्षनेत्याचे पद काँग्रेसला मिळाले नाही. मनातून लोकपाल नेमायचा नसलेल्या मोदी सरकारला ही नामी सबब मिळाली. यावर उपाय म्हणून लोकसभेत मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला लोकपाल निवड समितीवर सदस्य म्हणून नेमण्याची दुरुस्ती मूळ कायद्यात करण्याचे एक पिल्लू सोडले गेले. प्रत्यक्षात ही दुरुस्ती मंजूर करून घेण्यासाठी सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. दरम्यानच्या काळात आधीच्या सरकारने नेमलेल्या पी. पी. राव यांचे गेल्या सप्टेंबरमध्ये निधन झाले व निवड समितीवरील ‘ख्यातनाम विधिज्ञ’ सदस्याची जागा रिकामी झाली. या रिकाम्या जागेवर नेमणुकीसाठी कायदा दुरुस्ती करण्याची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याची जागा रिकामी ठेवून उर्वरित सदस्यही या जागेसाठी सदस्याची निवड करू शकतात व तसे करणे कायद्याला धरून आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी स्पष्ट केले. तरी मोदी सरकारने काही केले नाही. सर्वोच्च न्यायालयाने पराण्या मारणे सुरूच ठेवल्यावर सरकारने १ मार्च रोजी विधिज्ञ सदस्य निवडण्यासाठी लोकपाल निवड समितीची बैठक बोलावली व त्यासाठी लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना ‘विशेष निमंत्रित’ म्हणून पाचारण केले. साहजिकच हे तोंडदेखले आवतण खरगे यांनी अव्हेरले. खरे तर मोदी सरकारची प्रामाणिक इच्छा असती तर खरगेंनी नकार दिल्यावर बाकीच्या सदस्यांची बैठक घेऊन निवड करता आली असती. पण खरगेंनी नकार दिल्यावर बैठकच घेतली गेली नाही. लवकरच बैठक घेऊन नेमणूक करू, हे पालुपद सरकारने सुरू ठेवले आहे. आधीच्या समितीने ‘शोध समिती’वर अध्यक्ष म्हणून नेमलेले निवृत्त न्यायाधीश के. टी. थॉमस यांनी राजीनामा दिल्याने व ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांनी पद न स्वीकारल्याने त्या दोन जागाही रिकाम्या आहेत. त्या भरण्याच्या दृष्टीनेही सरकारच्या काही हालचाली दिसत नाहीत. नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने, असे म्हटले जाते. पण मोदी सरकारला या नकटीला बोहल्यावरच चढवायचे नाही, असे दिसते!

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत