शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

लोकपाल दृष्टिपथात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:02 IST

लोकपाल आणि लोकायुक्त कायदा लागू होऊन चार वर्षे उलटल्यानंतर का होईना देशात पहिल्या लोकपालांची नेमणूक दृष्टिपथात आल्यासारखे वाटते.

लोकपाल आणि लोकायुक्त कायदा लागू होऊन चार वर्षे उलटल्यानंतर का होईना देशात पहिल्या लोकपालांची नेमणूक दृष्टिपथात आल्यासारखे वाटते. निदान आता लोकपाल न नेमण्याची कोणतीही सबब सरकारकडे राहिलेली नाही. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे वचन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने पहिली चार वर्षे चालढकल करण्यात घालविली. खरे तर भ्रष्टाचार निर्मूलनाचे प्रभावी साधन असलेल्या लोकपालांची सर्व कायदेशीर चौकट मोदींना सत्तेवर आल्यापासून तयार मिळाली होती. ते सत्तेवर येण्याच्या आधीच संसदेने लोकपाल कायदा मंजूर केला होता व राष्ट्रपतींच्या संमतीनंतर १६ जानेवारी २०१४ पासून तो अमलातही आला. एवढेच नव्हे तर मोदी सत्तेवर येण्याच्या आधीच पूर्वीच्या सरकारने लोकपालांचे अध्यक्ष आणि आठ सदस्य नेमण्यासाठी इच्छुकांकडून अर्जही मागवून ठेवले होते. पण इच्छुक तयार असले तरी त्यांच्यातून निवड करण्याची व्यवस्थाच अस्तित्वात नाही, अशी उफराटी स्थिती निर्माण झाली. लोकपाल कायद्यानुसार लोकपालांची निवड पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनियुक्त केलेला एक न्यायाधीश आणि एक ख्यातनाम विधिज्ञ यांचा समावेश असलेल्या निवड मंडळाने करायची असते. आधीचे संपुआ सरकार असताना कायदा लागू होताच सरकारने लगेच निवड मंडळाची रचना पूर्ण केली व इच्छुकांकडून नावेही मागविली. त्यावेळी महिना-दोन महिन्यांत लोकपालांची निवड आणि नियुक्ती होऊही शकली असती. पण अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी लोकपालांसाठी आग्रह धरणाऱ्या भाजपाने मोडता घातला. त्यावेळी २०१४ ची लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर होती. मावळत्या सरकारने आपल्या पसंतीचा लोकपाल पुढील पाच वर्षांसाठी येणाºया सरकारवर न लादता हे काम नव्या सरकारवर सोडावे, अशी मानभावी भूमिका भाजपाने त्यावेळी घेतली. त्या दिवसांत संपुआ सरकारची अवस्था एवढी केविलवाणी झाली होती की त्यांनीही हा विषय नेटाने रेटण्याचे धाडस केले नाही. हे निवड मंडळ सुमारे तीन वर्षे पूर्ण क्षमतेने अस्तित्वात होते, पण मोदी सरकारने लोकपालांची निवड केली नाही. आधीच्या सरकारने निवड मंडळावर ‘ख्यातनाम विधिज्ञ’ म्हणून नेमलेले ज्येष्ठ वकील पी.पी. राव यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निधन झाले त्यामुळे या जागेवर कुणाची तरी नव्याने निवड करणे गरजेचे झाले. मोदी सरकारला टाळाटाळ करण्यास हे आयते निमित्त मिळाले. ‘ख्यातनाम विधिज्ञा’ची निवड करणाºया निवड समितीत लोकसभेतील विरोधी पक्षनेता एक सदस्य असतो. नव्या लोकसभेत कुणीही मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसल्याने निवड कशी करायची, ही अडचण मोदी सरकारने पुढे केली. सर्वोच्च न्यायालयाने ही सबब फेटाळून लोकपाल लवकरात लवकर नेमण्यास सांगितले. त्यालाही वर्ष उलटून गेले. अखेर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला बाजूला ठेवून सरकारने निवड मंडळावर ‘ख्यातनाम विधिज्ञ’ म्हणून माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांची निवड केली. आता निवड मंडळ पूर्ण झाल्याने सरकारला सबब नाही. त्यामुळे लवकरच लोकपाल नेमले जाणे अपेक्षित आहे. पुढील लोकसभा निवडणूक दिसू लागली आहे. मोदींचा स्वभाव आणि भाजपाची कार्यशैली पाहता निवडणुकीवर डोळा ठेवून या नेमणुका नक्की केल्या जातील. श्रेय लाटण्याचाही पुरेपूर प्रयत्न होईल. स्वत: मोदींनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना तब्बल १२ वर्षे लोकायुक्त नेमला नव्हता. त्यामुळे देशाला पहिला लोकपाल देण्याचे श्रेय त्यांनी घेतले तरी ते निर्लेप नसेल. ठरल्या वेळी पहाट होतच असते, कोंबड्याला मात्र आपल्या आरवण्याने ती झाली असे वाटत असते. श्रेय कुणीही घेवो पण देशाला अखेर लोकपाल मिळतील, हेही नसे थोडके! पण संसदेने केलेला कायदा लागू करतानाही एवढे राजकारण व्हावे यावरून आपल्या लोकशाहीची अपरिपक्वताच दिसते.