शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा वर्षावर येऊन ठेपला २०२४चा रणसंग्राम... मोदींपुढे आव्हान कुणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 08:58 IST

केसीआर या संक्षिप्त नावाने ओळखले जात असलेल्या राव यांनी काही दिवसांपूर्वीच तेलगू राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण करीत, त्यांची राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची महत्त्वाकांक्षा उघड केली होती.

उण्यापुऱ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षापुढे आव्हान नेमके उभे करणार तरी कोण, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या देशापुढे बुधवारी चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले. गत दोन लोकसभा निवडणुकांत स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपने देशातील बहुतांश विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचेच आव्हान उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर, सर्व भाजपविरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली यावे आणि थेट लढतीत भाजपला सत्तेतून पायउतार करावे, असा प्रयत्न गत काही दिवसांपासून सुरू होता; पण आघाडीच्या नेतृत्वाच्या मुद्दयावरील मतभेदांमुळे चर्चेचे गाडे काही पुढे सरकले नाही. त्यामुळे मग पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या उभारणीची चाचपणी काही नेत्यांनी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पुढाकाराने देशभरातील प्रमुख विरोधी नेत्यांची उपस्थिती असलेली मोठी सभा बुधवारी तेलंगणातील खम्मम येथे पार पडली.

केसीआर या संक्षिप्त नावाने ओळखले जात असलेल्या राव यांनी काही दिवसांपूर्वीच तेलगू राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण करीत, त्यांची राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची महत्त्वाकांक्षा उघड केली होती. खम्मम येथील सभेला अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, पिनरई विजयन, भगवंत मान, डी. राजा आदी दिग्गज विरोधी नेत्यांची उपस्थिती होती. देशातील दुसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी गत काही दिवसांपासून भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने दक्षिणोत्तर देश पिंजून काढत आहेत. ती यात्रा राजधानी दिल्लीत पोहोचली तेव्हा पार पडलेल्या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण काँग्रेस पक्षातर्फे अनेक विरोधी नेत्यांना देण्यात आले होते; परंतु बहुतांश प्रमुख विरोधी नेत्यांनी ते डावलले. त्या सर्वच नेत्यांनी खम्मम येथे मात्र आवर्जून हजेरी लावली आणि त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीतील लढतीचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले.

नजीकच्या भविष्यात फार धक्कादायक घडामोडी न घडल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आता नावापुरतीच शिल्लक असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी आणि केसीआर यांच्या पुढाकाराने आकारास येऊ बघत असलेली तिसरी आघाडी, अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसत आहे. अर्थात लढत चौरंगी, पंचरंगी अथवा बहुरंगी होण्याचीही शक्यता मोडीत काढता येत नाही. त्यामागचे मोठे कारण म्हणजे पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत; पण काँग्रेस आणि केसीआरप्रणीत संभाव्य आघाडी या दोघांपासूनही अंतर राखत इरादे मात्र पुरेसे स्पष्ट केले आहेत.

भाजपेतर-काँग्रेसेतर आघाडी स्थापन करून थेट पंतप्रधान पदी झेप घेऊ बघणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या एकाही नेत्याचे गृहराज्य वगळता इतर राज्यांत सामर्थ्य नाही. केवळ भाजप अथवा नरेंद्र मोदी नकोत या एकमेव मुद्दयावर काँग्रेससकट इतर सर्व पक्षांनी आपल्याला समर्थन द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. इथे गंमत अशी आहे, की काँग्रेस सोबत असली तरच भाजपच्या विरोधात दोन अधिक दोन बरोबर चार असे गणित साधले जाऊ शकते, अन्यथा नाही; मात्र ज्या प्रादेशिक पक्षांची त्यांच्या गृहराज्यात पारंपरिकरीत्या काँग्रेससोबत लढत आहे, त्या प्रादेशिक पक्षांसाठी काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे किमान येत्या लोकसभा निवडणुकीत तरी भाजप विरुद्ध इतर सगळे अशी थेट लढत दिसण्याची शक्यता दुरापास्तच दिसते. अर्थात निवडणुकोतर युतीची शक्यता शिल्लक उरतेच आणि सध्याच्या घडीला भाजपसाठी सर्वांत मोठा धोका तोच आहे.

भाजपला स्वबळावर अथवा जे काही थोडेफार छोटे पक्ष रालोआत शिल्लक आहेत, त्यांच्या मदतीने बहुमतापर्यंत पोहोचता आले नाही तर त्या पक्षाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी इतर सर्व पक्ष एकत्र येतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. एवढेच नव्हे तर रालोआत शिल्लक असलेले काही पक्षही विरोधी आघाडीच्या नौकेत उडी घ्यायला मागेपुढे बघणार नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपसाठी खरे आव्हान पुन्हा एकदा लोकसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हेच आहे!

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTelanganaतेलंगणाBJPभाजपा