शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?

By अतुल कुलकर्णी | Updated: March 17, 2024 06:46 IST

पाच वर्षांतून एकदा ज्याला भाव येतो त्या मतदाराकडून तुम्हाला हे पत्र.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

नेते हो, नमस्कार.

पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या तुमच्या सणाची घोषणा कालच झाली. धुमधडाक्यात तुमचा सण सुरू होत आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने सर्वसामान्य अशा, पाच वर्षांतून एकदा ज्याला भाव येतो त्या मतदाराकडून तुम्हाला हे पत्र.

राजकारण म्हणजे काय? अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा खेळ म्हणजे राजकारण. असे कोणीतरी लिहून ठेवले आहे. गेले काही महिने अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना उभा महाराष्ट्र आडवा होऊन पाहत आहे. कधी कोणी कल्पना केली नसेल असे नातेसंबंध तुटताना, जुळताना दिसत आहेत. पाच वर्षांच्या एकाच टर्ममध्ये तुम्ही आम्हा मतदारांना काय काय दाखवणार आहात? आमचा जीव केवढा..? आमची बुद्धी केवढी..? आणि तुम्ही दाखवता केवढं... त्यामुळे तुमचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

जे कोणाला शक्य झाले नाही ते या निवडणुकीत होताना दिसत आहे. शरद पवार हे राजकारणातले एक मातब्बर घराणे. घरातली भांडणं कधी दाराबाहेर गेली नाहीत. मात्र या निवडणुकीत घरातली भांडणं दाराबाहेर अवघा देश आणि महाराष्ट्र बघेल. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमधील सामना या निवडणुकीतील लक्षणीय असेल. यानिमित्ताने अजित पवारांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय आईच्या प्रचारार्थ बारामती पिंजून काढताना दिसतील. त्याच वेळी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, बहीण सई पवार आणि पत्नी कुंती पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेल्या दिसतील. अख्खे पवार कुटुंब पूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच छत्राखाली होते. ते आता विभागले गेले. आता एकमेकांच्या विरोधात मैदान जिंकण्यासाठी पवार विरुद्ध पवार मैदानात समोरासमोर दिसतील. भाजपने बारामतीची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी करता करता, पवार विरुद्ध पवार कशी करून टाकली हे कोणाला कळलेही नाही.

या प्रचाराच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. गाठीभेटीत ते थेट पुण्यातला गुंड गजा मारणेच्या घरी पोहोचले. गजा मारणेने पार्थ पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही भेट लक्षणीय ठरली. त्याच गजा मारणेला काही दिवसांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी रस्त्यावर उभे करून झाप झाप झापले. निवडणुकीचे निकाल काहीही लागू देत... राजकारणातल्या अत्यंत सभ्य आणि घरंदाज पवार कुटुंबात या निवडणुकीने उभी फूट पाडली हे खरे. निवडणुकीचे वातावरण जसे तापत जाईल, मतदानाची तारीख जवळ येत जाईल, तसे घराघरात... रस्त्यावर... दोन समाजातील फूट उघडपणे दिसू लागेल..! जातीधर्मात नेमके काय चालू आहे हे देखील उभा महाराष्ट्र अस्वस्थपणे पाहात राहील..!

तिकडे बीड जिल्ह्यात एक वेगळीच निवडणूक महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लढलेले भाऊ-बहीण आता एकाच बाजूने लढताना दिसतील. पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. आपल्यासाठी जे काम करतील त्यांच्यासाठी आपणही काम करू, असे विधान त्यांनी केले. हे विधान त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासाठी होते हे वेगळे सांगायची गरज नाही. यावेळी धनंजय मुंडे यांना आधी पंकजाताईंसाठी काम करावे लागेल. तरच त्यांना त्यांच्या विधानसभेच्या वेळी मदत होऊ शकेल, असा इशाराच मिळाला आहे. धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर उद्धव सेनेत आहेत, तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह भाजपकडे. दोन चुलत भावांमधील लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहता येईल. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे साताऱ्याचे दोन चुलत भाऊ राजघराण्याचा वारसा ठेवून आहेत. गेल्या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना मदत केली होती, मात्र पाच वर्षांत दोघांमधील संबंध पुन्हा बिघडले आहेत. दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यामुळे या दोन चुलत भावांमधील लढाई कोणते वळण घेईल हे निकालच सांगेल. रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या त्या सुनबाई. खडसे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार आहेत. ते कोणती भूमिका घेणार? ते कोणत्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करणार हे पाहण्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागणार नाही.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आजकाल फार पटकन मित्र होतात. फार पटकन शत्रू होतात, असा हा काळ असल्याचे वास्तवदर्शी विधान केले आहे. त्यांनी कबीर आणि बशीर बद्र यांच्या काही ओळी ऐकवल्या.

रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय। टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय॥ 

या ओळी वाचायला चांगल्या आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नात्यानात्याची वीण विस्कटली आहे. नात्यात पडलेल्या गाठी सोडवणे अशक्य झाले आहे. काही गाठी सोडवायला जाल तर आणखी गुंता होईल, अशी सगळी स्थिती आहे.

दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ, तो शर्मिंदा न हों...

या ओळी जेव्हा बशीर बद्र यांनी लिहिल्या तेव्हा त्यांना, एकाच व्यासपीठावर काकाकडे दुर्लक्ष करून पुतण्या दुसरीकडेच बघत जाईल... किंवा ज्या बहिणीकडून भाऊ राखी बांधून घ्यायचा ती बहीण भावाकडे ढुंकूनही बघणार नाही... असे वाटले नसावे. जिथे नातीगोती पणाला लावण्याचे दिवस आहेत, तिथे बशीर बद्रचा विचार कोण करणार..? 

तेव्हा नेत्यांनो, तुमचा सण उत्साहात साजरा करा. भरपूर फटाके उडवा... गुलाल उधळा... मात्र ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही हे सगळे करणार आहात, त्या मतदाराला या पंचवार्षिक सणाच्या व्यतिरिक्तही वेळात वेळ काढून भेटत जा. पाच वर्षांपूर्वी भेटलेले तुम्हीच का..? असे विचारायची वेळ त्याच्यावर आणू नका... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

- तुमचाच, बाबूराव

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे