शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:25 IST

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा.

- पवन के. वर्माराष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा. पण विरोधी ऐक्याचा हवाला जी माणसे देतात, त्यांच्याकडून या ऐक्याच्या बतावणीला फारसे महत्त्व दिले जात नाही. ते सगळे भाजपचा जोरदार विरोध करीत असतात, पण ऐक्याच्या बाबतीत मात्र ते सारेच विस्कळीत असलेले दिसतात. महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यातून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते.बसपाच्या नेत्या मायावती म्हणतात की, आमचा पक्ष काँग्रेससोबत कधीही ऐक्य करणार नाही. लोकांचा विश्वासघात करण्यात काँग्रेस पक्ष हा नंबर एकवर असतो, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. प. बंगालमध्ये काँग्रेस पक्ष तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर आगपाखड करीत असतो आणि ममता बॅनर्जीदेखील काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्टांवर टीका करीत असतात. दिल्लीच्या लोकसभेच्या जागांसाठी समझोता करण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच हे पक्ष एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी सोडताना दिसत नव्हते!

त्यामुळे महागठबंधनचे चित्र निर्माण करण्यात या पक्षातील विभाजनवादी प्रवृत्ती असफल ठरत असल्याचे चित्र राजकीय निरीक्षकांना पाहायला मिळते. त्यामागील कोडे काही त्यांना उलगडत नाही. अनेक प्रसंगी सगळ्या विरोधकांनी ऐक्याचे नाटक केलेले आहे. एका व्यासपीठावर उभे राहून हातात हात घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केला आहे. पण व्यासपीठावरून खाली उतरल्यावर त्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना राजकीय स्किझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पछाडले की काय असे वाटू लागले आहे!विरोधकांना असे वाटत असावे की राष्ट्रीय पातळीवर ऐक्याचा आभास निर्माण केल्यावर स्थानिक पातळीवर एकमेकांच्या जीवावर उठण्यात काहीही गैर नाही! परस्परातील हा विरोध हे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र येतात तेव्हा गळून पडेल असे त्यांना वाटते. पण हा दृष्टिकोन बाळगणे हेच चुकीचे आहे. कारण राजकीय पक्षात कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जसे वागतात ते राष्ट्रीय पातळीवर सहजासहजी पुसले जात नाही. स्थानिक पातळीवरील वैरभाव सहजासहजी दूर होत नसतो. स्थानिक पातळीवरील वैरभावाचा संबंध राष्ट्रीय स्तरावर शिल्लक उरत नसतो, असे म्हणणे हे भ्रामक आशावाद बाळगण्यासारखे आहे! खºया ऐक्यासाठी केलेले प्रयत्न शक्यतेत उतरले असते जर काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपा आणि बसपासोबत युती केली असती! त्या स्थितीत काँग्रेस आणि माकपने तृणमूल काँग्रेसला विरोध करण्याचा विचारही केला नसता आणि दिल्लीत आप आणि काँग्रेस हे निवडणुकीसाठी एकत्र आले असते! पण प्रत्यक्षात यापैकी काहीच घडले नाही!!
राजकीय मंचावर काँग्रेसतर्फे पुनरागमन करण्याचा प्रयत्न होत आहे असे मला वाटू लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ऐक्य करण्याची गरज त्या पक्षाला वाटत नाही. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष या नात्याने काँग्रेसला आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांबाबत असलेल्या बांधिलकीकडे बघावेच लागेल किंवा पूर्वी ज्या क्षेत्रात काँग्रेस पक्ष प्रभावी होता तेथे पुनरागमन करण्याचा विचार त्या पक्षाला सोडून द्यावा लागेल. पण त्याचा अंतिम परिणाम असा होण्याची शक्यता आहे की तो पक्ष निवडणुकीत सपा बसपाच्या संयुक्त मतसंख्येला ग्रहण लावेल आणि भाजपचा आघात सहन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसलाही कमकुवत करून टाकेल! ओरिसातही तो पक्ष बीजू जनता दलाला मिळणारी मते खाऊन भाजपला बळ देईल!
सामान्य मतदाराला काय वाटते याचाही विचार करायला हवा. विरोधकांमध्ये जी एकमेकांवर कुरघोडी करण्याची लढाई सुरू आहे ती पाहून त्यांनी भाजपला बळ देऊन त्याच्या नेत्याचे हात बळकट करण्याचे ठरविले तर त्यांना दोष कसा देता येईल? लोकसभेसाठी मतदान करताना केंद्रात कशा तºहेचे सरकार असावे याचा विचार मतदारांकडून केला जाऊ शकतो.विरोधकांच्या ऐक्याचा विचार आता करणे योग्य होणार नाही. कारण बरेच पाणी यमुनेतून वाहून गेले आहे. त्यामुळे अशा ऐक्याचा प्रयत्न आता यशस्वी होण्याची शक्यता नाही. अशा ऐक्याचा प्रयत्न सुरुवातीलाच व्हायला हवा होता. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाने काही तरी गमावण्याची तयारी ठेवायला हवी होती. भाजपला कसेही करून सत्तेपासून दूर ठेवायचे असा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा होता. अशा ऐक्यासाठी महत्त्वाच्या राज्यांमध्ये व्यावहारिक तडजोडी करून विरोधकांचे ऐक्य मजबूत करण्याचा जर प्रयत्न झाला असता तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते.आज मात्र विखुरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांवर केलेली चिखलफेक विसरून परस्परांवर स्तुतिसुमनांची उधळण करतील आणि गोंधळाचे रूपांतर ऐक्यात होईल, अशा चमत्काराची अपेक्षा करीत आहेत. दुर्दैवाने राजकारणाचे वास्तव हे नेहमी सुखान्त शेवटाकडे नेणाºया परीकथेसारखे नसते हे त्यांनी समजून घ्यायला हवे!(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा