शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:25 IST

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा.

- पवन के. वर्माराष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा. पण विरोधी ऐक्याचा हवाला जी माणसे देतात, त्यांच्याकडून या ऐक्याच्या बतावणीला फारसे महत्त्व दिले जात नाही. ते सगळे भाजपचा जोरदार विरोध करीत असतात, पण ऐक्याच्या बाबतीत मात्र ते सारेच विस्कळीत असलेले दिसतात. महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यातून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते.बसपाच्या नेत्या मायावती म्हणतात की, आमचा पक्ष काँग्रेससोबत कधीही ऐक्य करणार नाही. लोकांचा विश्वासघात करण्यात काँग्रेस पक्ष हा नंबर एकवर असतो, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. प. बंगालमध्ये काँग्रेस पक्ष तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यावर आगपाखड करीत असतो आणि ममता बॅनर्जीदेखील काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्टांवर टीका करीत असतात. दिल्लीच्या लोकसभेच्या जागांसाठी समझोता करण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच हे पक्ष एकमेकांवर शरसंधान करण्याची एकही संधी सोडताना दिसत नव्हते!

त्यामुळे महागठबंधनचे चित्र निर्माण करण्यात या पक्षातील विभाजनवादी प्रवृत्ती असफल ठरत असल्याचे चित्र राजकीय निरीक्षकांना पाहायला मिळते. त्यामागील कोडे काही त्यांना उलगडत नाही. अनेक प्रसंगी सगळ्या विरोधकांनी ऐक्याचे नाटक केलेले आहे. एका व्यासपीठावर उभे राहून हातात हात घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केला आहे. पण व्यासपीठावरून खाली उतरल्यावर त्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना राजकीय स्किझोफ्रेनिया या मानसिक रोगाने पछाडले की काय असे वाटू लागले आहे!विरोधकांना असे वाटत असावे की राष्ट्रीय पातळीवर ऐक्याचा आभास निर्माण केल्यावर स्थानिक पातळीवर एकमेकांच्या जीवावर उठण्यात काहीही गैर नाही! परस्परातील हा विरोध हे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकत्र येतात तेव्हा गळून पडेल असे त्यांना वाटते. पण हा दृष्टिकोन बाळगणे हेच चुकीचे आहे. कारण राजकीय पक्षात कार्यकर्ते असतात. हे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जसे वागतात ते राष्ट्रीय पातळीवर सहजासहजी पुसले जात नाही. स्थानिक पातळीवरील वैरभाव सहजासहजी दूर होत नसतो. स्थानिक पातळीवरील वैरभावाचा संबंध राष्ट्रीय स्तरावर शिल्लक उरत नसतो, असे म्हणणे हे भ्रामक आशावाद बाळगण्यासारखे आहे! खºया ऐक्यासाठी केलेले प्रयत्न शक्यतेत उतरले असते जर काँग्रेसने उत्तर प्रदेशात सपा आणि बसपासोबत युती केली असती! त्या स्थितीत काँग्रेस आणि माकपने तृणमूल काँग्रेसला विरोध करण्याचा विचारही केला नसता आणि दिल्लीत आप आणि काँग्रेस हे निवडणुकीसाठी एकत्र आले असते! पण प्रत्यक्षात यापैकी काहीच घडले नाही!!
राजकीय मंचावर काँग्रेसतर्फे पुनरागमन करण्याचा प्रयत्न होत आहे असे मला वाटू लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ऐक्य करण्याची गरज त्या पक्षाला वाटत नाही. एक राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष या नात्याने काँग्रेसला आपल्या तळागाळातील कार्यकर्त्यांबाबत असलेल्या बांधिलकीकडे बघावेच लागेल किंवा पूर्वी ज्या क्षेत्रात काँग्रेस पक्ष प्रभावी होता तेथे पुनरागमन करण्याचा विचार त्या पक्षाला सोडून द्यावा लागेल. पण त्याचा अंतिम परिणाम असा होण्याची शक्यता आहे की तो पक्ष निवडणुकीत सपा बसपाच्या संयुक्त मतसंख्येला ग्रहण लावेल आणि भाजपचा आघात सहन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसलाही कमकुवत करून टाकेल! ओरिसातही तो पक्ष बीजू जनता दलाला मिळणारी मते खाऊन भाजपला बळ देईल!
सामान्य मतदाराला काय वाटते याचाही विचार करायला हवा. विरोधकांमध्ये जी एकमेकांवर कुरघोडी करण्याची लढाई सुरू आहे ती पाहून त्यांनी भाजपला बळ देऊन त्याच्या नेत्याचे हात बळकट करण्याचे ठरविले तर त्यांना दोष कसा देता येईल? लोकसभेसाठी मतदान करताना केंद्रात कशा तºहेचे सरकार असावे याचा विचार मतदारांकडून केला जाऊ शकतो.विरोधकांच्या ऐक्याचा विचार आता करणे योग्य होणार नाही. कारण बरेच पाणी यमुनेतून वाहून गेले आहे. त्यामुळे अशा ऐक्याचा प्रयत्न आता यशस्वी होण्याची शक्यता नाही. अशा ऐक्याचा प्रयत्न सुरुवातीलाच व्हायला हवा होता. स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षाने काही तरी गमावण्याची तयारी ठेवायला हवी होती. भाजपला कसेही करून सत्तेपासून दूर ठेवायचे असा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा होता. अशा ऐक्यासाठी महत्त्वाच्या राज्यांमध्ये व्यावहारिक तडजोडी करून विरोधकांचे ऐक्य मजबूत करण्याचा जर प्रयत्न झाला असता तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते.आज मात्र विखुरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांवर केलेली चिखलफेक विसरून परस्परांवर स्तुतिसुमनांची उधळण करतील आणि गोंधळाचे रूपांतर ऐक्यात होईल, अशा चमत्काराची अपेक्षा करीत आहेत. दुर्दैवाने राजकारणाचे वास्तव हे नेहमी सुखान्त शेवटाकडे नेणाºया परीकथेसारखे नसते हे त्यांनी समजून घ्यायला हवे!(लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसBJPभाजपा