शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:19 AM

कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत.

- महेश गायकवाड(पर्यावरणतज्ज्ञ)कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. जंगलात राहणारा माणूस म्हणतोय रान लाल झाल्याशिवाय जंगलात प्राणी आहेत की नाहीत हे कळतच नाही, म्हणजेच उंबराला फळं लागली की समजायचं शाकाहारी प्राणी आलेच लाल फळं खायला आणि त्यांना खायला मांसाहारी प्राणी, एवढं सोपं आहे त्याचं वन्यजीव पाहण्याचं गणित.अगदी आपण सहजपणे भटकायला निघालो तर आपल्याला वाटतं की काहीतरी फळ खायला मिळावं. पण त्यासाठी फक्त देशी झाडं उपयोगी असतात. त्याशिवाय आपल्याला फळं कशी मिळणार? गुलमोहर-निलगिरी यांची फळं आपण खाऊच शकत नाही. उपयोगी झाडं लावणं नितांत गरजेचं असताना आपण परदेशी शोभिवंत झाडं लावल्यामुळे काहीच खायला मिळत नाही आणि मग जंगल आणि माणूस असं नातं तुटत चाललंय की काय, असं म्हणायला हरकत नाही.पिंपळाच्या झाडाखाली लाखो बिया पडल्याचं पाहून खूप समाधान वाटतं. कारण रात्रभर शेकडो वाटवाघळं ताव मारीत असतात तर दिवसभर पक्षी आणि इतर जीव ताव मारतात. खरं तर अशी बहुपयोगी झाडं असतील तर, शेतीवरील हल्ले होताना ही झाडं जास्त प्रमाणात लावली तर मग द्राक्षं, बोरं या पिकांवर हल्लेच होणार नाहीत. खरं तर प्रत्येक गावात १00 अशी बहुपयोगी झाडं लावून जतन केल्यास सर्व हल्ले बंद होतील आणि पर्यायाने अनेक पक्षी व वाटवाघळं यांचं शेतीपिकावर अवलंबून राहणं बंद होईल.आपल्या भागात ग्रामपंचायत स्तरावर याबाबत जनजागृती होणं अत्यावश्यक आहे. कारण आजकाल गावात तर परदेशी झाडं लावण्याचं पीकच आलेलं आहे. त्यामुळे असणारी वड, उंबर, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी उपयोगी झाडं तोडण्याचा सपाटाच लावलेला आहे. अर्थात हे अज्ञान मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज असताना कुठलीही शासकीय योजना नाही. शिवाय परदेशी वृक्ष लागवडीत वन विभाग आघाडीवर आहे, मग शहाणपण कोठून येणार? आता सर्वांनी निसर्गवाचन शिकणं गरजेचं आहे. किमान येणारी नवीन पिढी तरी पर्यावरण साक्षर झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. निसर्ग वाचवायचा असल्यास तो वाचता आला पाहिजे हे सूत्र सर्वांसमोर आलं पाहिजे कारण हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.आपल्या परिसरातील वृक्षसंपदा सोडून चुकीची झाडं लावून परिसर व अधिवास नष्ट करण्याचं मोठं काम शासन करीत आहे. याला वेळीच थांबवलं पाहिजे नाहीतर आपला शेवट नक्कीच. आजचा शेतकरी वन्यजीव संघर्ष वाढीस लागण्यास परदेशी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. कारण बांधावरील उपयोगी झाडांची जागासुद्धा परदेशी निलगिरी-गुलमोहर- सुभाभूल - रेन ट्री - खोटा अशोक - खोटा काटेसावर अशी नानाविध विनापयोगी झाडे लावल्याने संघर्ष अटळ आहे. त्यात भर म्हणजे शहरात तर ८0 टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी झाडं लावून आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडं, गवत, झुडपं, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाडं सर्व काही नष्ट करून शेतीवरील वन्यजीवांचं अतिक्रमण अर्थात हल्ले वाढले. यात बोर, द्राक्ष, डाळिंब अशा वास येणाऱ्या पिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले. कारण परिसरातील उंबर, वड, पिंपळ, भोकर, जांभूळ, आंबा अशी शाकाहारी वन्यजीवांची खाद्याची झाडं तोडल्यामुळे या सर्व जीवांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला. यात वटवाघळं, पक्षी, माकडं, वानरं, हरणं असे अनेक वन्यजीव शेतीकडे आकर्षित होऊन आपली खाद्याची जागा शेती म्हणून पाहू लागले.शाळेतील मुलांना कचरा म्हणजे झाडांची वाळलेली पानं, गवत असं चुकीचं शिक्षण दिलं जात आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे. कारण हीच वाळलेली पानं, फुलं, गवत हे वनस्पती स्वत:साठी खत म्हणून निर्मिती करतात. प्रत्येक झाड एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाही म्हणून आपल्याच अंगावरील पाने गाळतात आणि त्याचा वापर स्वत:च्या वाढीसाठी करून घेतात.अर्थात शेती आणि शेतकरी अशी अतिशय बिकट असलेली परिस्थिती आणि संघर्ष फक्त सामान्य शेतकºयाच्या वाट्याला येऊ लागल्या, आणि संघर्ष वन्यजीवांना संपवण्यापर्यंत पोहोचला आहे. आपण सर्व जण एकच चांगलं काम करू शकतो ते म्हणजे आपल्या भागातील जैवविविधता आहे तशी नैसर्गिकरीत्या जोपासणं. सर्वात जास्त बहुपयोगी असलेला वड, आपल्या भारताचं राष्ट्रीय झाड म्हणून ओळखलं जातं. दिवसातील जास्त वेळ व मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन देणारं झाड असून वटपौर्णिमा साजरी करण्याचं मोठं कारण म्हणजे हा जीवनदायी वृक्ष आहे. अनेक समाजांत अशी समजूत आहे की, प्रत्येकाने किमान दोन तरी वड लावलेच पाहिजेत म्हणजे घडलेल्या पापांचं परिमार्जन होतं. सूरपारंब्याचा खेळ लहानपणी खेळणारे आपण, यापुढे किमान आपापल्या गावात एक तरी वड लावला पाहिजे.

टॅग्स :forestजंगलIndiaभारत