शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

क्रिया-प्रतिक्रियांचा जीवघेणा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:09 IST

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. 

ठळक मुद्देएडिटर्स व्ह्यूहिंसक घटनांनी देश हादरलाजळगावसारख्या शहरातही पोहलचे लोण

मिलिंद कुलकर्णी 

देशभरात अस्वस्थता आणि संघर्षाचे वातावरण आहे. एकीकडे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरु असताना दुसरीकडे हिंसक घटना घडत आहेत. समाजमाध्यमांद्वारे एकमेकांवर दोषारोप करुन हिंसेला जबाबदार धरले जात आहे. हिंसेला विशिष्ट समूह जबाबदार असल्याच्या प्रक्षोभक चित्रफिती प्रसारीत करुन आगीत तेल ओतले जात आहे. सरकार आणि पोलीस दलाकडे बोट दाखविले जात आहे. पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या कर्मचाºयांना जिवानीशी मारले जात आहे.  सामान्य माणसाचा हकनाक बळी जात आहे. काय चालले आहे, हे देशातील सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडे गेले आहे. कोण खरे, कोण खोटे? कुुणाची बाजू योग्य? हे समजायला मार्ग नाही, कारण सगळेच राज्य घटनेचा आधार घेत आहे, आम्हीच कायद्याचे पालन करीत आहोत, मुलभूत अधिकाराचे हनन होत असल्याचा दावा करीत त्याविरोधात आंदोलने, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे सुरु आहे. देशातील दिल्लीसारखी शहरे कोण पेटवत, भडकावत आहे, हे समोर येत नाही. दोन्ही गट एकमेकांकडे बोट दाखवत आहे. समर्थनार्थ चित्रफिती, संदेश प्रसारीत होत आहेत. प्रशासनाची कुचंबणा होत आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी हिंसेचे शिकार ठरत असतानाही त्यांना कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला जात आहे. दोन्ही बाजूने प्रत्येक घटनेचे भांडवल केले जात आहे. वस्तुुस्थितीचे आकलन न करता केवळ आपल्या सोयीची तेवढी माहिती प्रसारीत कशी होईल, त्यावर केवळ चर्चा कशी केंद्रित होईल, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. दु:खदायक, वेदनादायक प्रकार म्हणजे, यात संवैधानिक पदावरील व्यक्तींना वादात ओढले जात आहे. एकीकडे राज्य घटनेविषयी आदर व्यक्त करीत असताना त्या घटनेनुसार संवैधानिक पदावरील व्यक्तींविषयी जाहीर चर्चा करणे, त्यांच्याविषयी मतप्रदर्शन करणे हेच मुळी चुकीचे आहे. पण झाले असे आहे की, या मंडळींचा आपणच बरोबर असल्याचा अट्टाहास असतो. मध्यममार्गी कोणी नसावे, असाच एकंदर नूर सध्या आहे. डावे आणि उजवे या दोन्हीपेक्षा मध्यममार्गी, समन्वयवादी विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि बहुसंख्य समाज याच विचाराचा आहे. असे नसते तर आगडोंब देशभर पसरला असता, हे लक्षात घ्यायला हवे. संवैधानिक पदांसोबतच महापुरुषांना अकारण वेठीला धरले जात आहे. इतिहासापासून प्रेरणा मिळते. महापुरुषदेखील माणसेच होती. त्यांच्याकडून उदात्त कार्य जसे घडले तसे काही चुकादेखील घडलेल्या असू शकतात. भूतकाळ आणि वर्तमानकाळात मोठा फरक आहे, तो लक्षात घेऊन आपण पुढे जायला हवे. आम्ही इतिहासाचे ओझे घेऊन वर्तमानकाळात जगणार असू तर एकविसाव्या शतकातील, माहिती व तंत्रज्ञान युगातील मोकळा विचार आणि हवा कशी मिळणार? महापुरुषांचे चारित्र्यहनन करण्यापर्यंत मजल जाते, हे अतीशय वाईट आहे. केवळ महानगरांपर्यंत हे सीमित राहिलेले नाही, तर हे लोण जळगावसारख्या शहरांपर्यंत पोहोचले आहे. मध्यंतरी एका संघटनेचा कार्यक्रम सामाजिक सभागृहात झाला. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाºयांसाठी विशिष्ट टोपी परिधान करणे सक्तीचे होते. ती टोपी नसेल तर तुम्हाला व्याख्यानाला बसता येणार नाही? काय चालले आहे, कोणत्या युगात आपण आहोत? कबीर, तुकोबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची परंपरा लाभलेल्या या देशात  हा संकुचितपणा कसा आला? प्रबोधनाचा वारसा आम्ही कसा विसरत चाललो आहोत, हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. क्रियेची प्रतिक्रियादेखील धक्कादायक असते. धर्मस्थळावर जाहीर सभा घेण्यात आली. धर्म धोक्यात आहे, माणुसकी धोक्यात आहे, माणूस धोक्यात आहे, अशी भाषणे करण्याचे ते ठिकाण आहे काय? देवाचे नामस्मरण करण्याच्या जागी असे प्रकार होणे हे सांस्कृतिक, धार्मिक महाराष्टÑाच्यादृष्टीने चुकीचे आहे. कोणत्याही एका धर्माचे लांगुलचालन जसे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे केवळ विशिष्ट धर्माचेच हे राष्टÑ असेल असे म्हणणे देखील चुकीचे आणि राज्य घटनेच्या विरोधात आहे. या सगळ्या कोलाहलातून सामान्य माणसाचा रोजी रोटीचा संघर्ष काही संपणारा नाही. दंगली, मोर्चे, आंदोलने यातून त्याच्या रोजीरोटीवर गदा येत आहे. अमूक लोकांकडून खरेदी करु नका, असे संदेश त्यात भर घालत आहे, विचारी आणि विवेकी लोकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कोणत्याही विचाराची मंडळी असो परंतु जहाल मंडळी घातकच असते, हे लक्षात घ्यायला हवे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव