शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या मस्तकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:28 IST

योद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारकऱ्याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं.

- बाळासाहेब बोचरेयोद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारक-याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. गेली आठ वर्षे माऊलींचा अश्व म्हणून सोहळ्यात वाटचाल करणाºया ‘हिरा’ या अश्वाला रविवारी वारीच्या वाटेवर चालता चालता भाग्याचं मरण आलं. गेल्या आठ वर्षांत या अश्वाने लाखो भाविकांना लळा लावला होता.‘हिरा’ त्याचं नाव. पांढराशुभ्र रंग आणि तजेलदार उमदा असलेला हिरा चपळ तर होताच शिवाय रिंगणाच्या खेळात त्याला डोळे भरून पाहावं असंच वाटायचं. हिराचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अंकली (जि. बेळगाव) येथील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार हे मुख्य मानकरी आहेत. सोहळ्यासाठी त्यांचे दोन अश्व आणि माऊलींसाठी तंबू असतो. दोन अश्वांपैकी एक माऊलींचा अन् दुसरा स्वाराचा अश्व हे बहुतांशी वारक-यांना चांगलेच ज्ञात होते. पालखी पुढे २७ ंनंबरच्या दिंडीमागे चालणारे हे दोन अश्व आले म्हणजे गावोगावी माऊली आल्याचा आनंद गावक-यांना व्हायचा. एरवी आपण सर्वसामान्य अश्व किंवा एक पशू अशीच त्याची गणना करतो. पण सोहळ्यातील वारकरी पशूंनाही देवाच्या रूपात पाहतात. श्रीमंत शितोळे सरकार यांचा तर अश्वावर प्रचंड जीव. अनेक वेळा त्यांनी त्यांचा तबेला पाहायला या, असा आग्रह केला. अंकलीच्या तबेल्यात वर्षभर अश्वांना पोसले जाते. त्यांची तयारी करून घेतली जाते. मारुतीबुवा आणि मानतेश या काळजीवाहकांना सरकारांनी पारखून नेमले आहे. तबेल्यातील अश्वावर आपल्या कुटुंबातीलच सदस्यांप्रमाणे सरकार प्रेम लावतात.तरुण वयात पालखी सोहळ्यात हिरा दाखल झाला तेव्हा त्याला आवरणे कठीण जायचे, पण गेली आठ वर्षे तो माऊलीमय झाला होता. पालखी सोहळ्यातील चार गोल अन् तीन उभ्या रिंगणाच्या माध्यमातून वारकºयांमध्ये चैतन्य फुलविण्याचे काम हिराने केले. हिराचे रिंगण सुरू झाले की संपूच नये असे वाटते. हिराच्या टापा म्हणजे भाविकांच्या नेत्रपटलात साठवून ठेवलेल्या छबी असून, हिरा अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. धावणारे अश्व म्हणजे साक्षात माऊली आपल्यासमवेत खेळत आहेत अशी वारकºयांची श्रद्धा असून, रिंगणाचा खेळ झाल्यानंतर त्यांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी श्रद्धाळूंची उडणारी झुंबड पाहिली की प्राणिमात्रांवर किती आणि कसा जीव लावावा याची शिकवण इथेच मिळते. गेल्या आठ वर्षांत हिराने शेकडो मैलांचा प्रवास केला असून, हिराचे प्रत्येक पाऊल हे त्या मातीला पावन करत गेले आहे. माऊलींचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या जीवापुढे नतमस्तक होतात. श्रद्धेने त्याच्या पाया पडतात. असे किती श्रद्धाळू त्याने घडविले असतील याची मोजदाद नाही. किती जणांनी त्याच्या पायाची धूळ मस्तकी लावली असेल याची मोजदाद नाही. लाखोंच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिराच्या पायाची धूळ मस्तकी लागावी यासाठी धडपडणाºया भाविकांना हिराचा विरह पोटात कालवाकालव केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी