शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या मस्तकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:28 IST

योद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारकऱ्याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं.

- बाळासाहेब बोचरेयोद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारक-याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. गेली आठ वर्षे माऊलींचा अश्व म्हणून सोहळ्यात वाटचाल करणाºया ‘हिरा’ या अश्वाला रविवारी वारीच्या वाटेवर चालता चालता भाग्याचं मरण आलं. गेल्या आठ वर्षांत या अश्वाने लाखो भाविकांना लळा लावला होता.‘हिरा’ त्याचं नाव. पांढराशुभ्र रंग आणि तजेलदार उमदा असलेला हिरा चपळ तर होताच शिवाय रिंगणाच्या खेळात त्याला डोळे भरून पाहावं असंच वाटायचं. हिराचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अंकली (जि. बेळगाव) येथील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार हे मुख्य मानकरी आहेत. सोहळ्यासाठी त्यांचे दोन अश्व आणि माऊलींसाठी तंबू असतो. दोन अश्वांपैकी एक माऊलींचा अन् दुसरा स्वाराचा अश्व हे बहुतांशी वारक-यांना चांगलेच ज्ञात होते. पालखी पुढे २७ ंनंबरच्या दिंडीमागे चालणारे हे दोन अश्व आले म्हणजे गावोगावी माऊली आल्याचा आनंद गावक-यांना व्हायचा. एरवी आपण सर्वसामान्य अश्व किंवा एक पशू अशीच त्याची गणना करतो. पण सोहळ्यातील वारकरी पशूंनाही देवाच्या रूपात पाहतात. श्रीमंत शितोळे सरकार यांचा तर अश्वावर प्रचंड जीव. अनेक वेळा त्यांनी त्यांचा तबेला पाहायला या, असा आग्रह केला. अंकलीच्या तबेल्यात वर्षभर अश्वांना पोसले जाते. त्यांची तयारी करून घेतली जाते. मारुतीबुवा आणि मानतेश या काळजीवाहकांना सरकारांनी पारखून नेमले आहे. तबेल्यातील अश्वावर आपल्या कुटुंबातीलच सदस्यांप्रमाणे सरकार प्रेम लावतात.तरुण वयात पालखी सोहळ्यात हिरा दाखल झाला तेव्हा त्याला आवरणे कठीण जायचे, पण गेली आठ वर्षे तो माऊलीमय झाला होता. पालखी सोहळ्यातील चार गोल अन् तीन उभ्या रिंगणाच्या माध्यमातून वारकºयांमध्ये चैतन्य फुलविण्याचे काम हिराने केले. हिराचे रिंगण सुरू झाले की संपूच नये असे वाटते. हिराच्या टापा म्हणजे भाविकांच्या नेत्रपटलात साठवून ठेवलेल्या छबी असून, हिरा अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. धावणारे अश्व म्हणजे साक्षात माऊली आपल्यासमवेत खेळत आहेत अशी वारकºयांची श्रद्धा असून, रिंगणाचा खेळ झाल्यानंतर त्यांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी श्रद्धाळूंची उडणारी झुंबड पाहिली की प्राणिमात्रांवर किती आणि कसा जीव लावावा याची शिकवण इथेच मिळते. गेल्या आठ वर्षांत हिराने शेकडो मैलांचा प्रवास केला असून, हिराचे प्रत्येक पाऊल हे त्या मातीला पावन करत गेले आहे. माऊलींचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या जीवापुढे नतमस्तक होतात. श्रद्धेने त्याच्या पाया पडतात. असे किती श्रद्धाळू त्याने घडविले असतील याची मोजदाद नाही. किती जणांनी त्याच्या पायाची धूळ मस्तकी लावली असेल याची मोजदाद नाही. लाखोंच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिराच्या पायाची धूळ मस्तकी लागावी यासाठी धडपडणाºया भाविकांना हिराचा विरह पोटात कालवाकालव केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी