शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या मस्तकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:28 IST

योद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारकऱ्याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं.

- बाळासाहेब बोचरेयोद्ध्याला जसं रणांगणातच वीरमरण यावं असं वाटतं तसंच वारक-याला वारीच्या वाटेवर मरण यावं असं वाटतं. वारकरी संप्रदायात अशा मरणाला भाग्यवान समजतात. वारकरी धर्माच्या सच्चा पाईकाच्या नशिबी असं मरण येतं. गेली आठ वर्षे माऊलींचा अश्व म्हणून सोहळ्यात वाटचाल करणाºया ‘हिरा’ या अश्वाला रविवारी वारीच्या वाटेवर चालता चालता भाग्याचं मरण आलं. गेल्या आठ वर्षांत या अश्वाने लाखो भाविकांना लळा लावला होता.‘हिरा’ त्याचं नाव. पांढराशुभ्र रंग आणि तजेलदार उमदा असलेला हिरा चपळ तर होताच शिवाय रिंगणाच्या खेळात त्याला डोळे भरून पाहावं असंच वाटायचं. हिराचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अंकली (जि. बेळगाव) येथील श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार हे मुख्य मानकरी आहेत. सोहळ्यासाठी त्यांचे दोन अश्व आणि माऊलींसाठी तंबू असतो. दोन अश्वांपैकी एक माऊलींचा अन् दुसरा स्वाराचा अश्व हे बहुतांशी वारक-यांना चांगलेच ज्ञात होते. पालखी पुढे २७ ंनंबरच्या दिंडीमागे चालणारे हे दोन अश्व आले म्हणजे गावोगावी माऊली आल्याचा आनंद गावक-यांना व्हायचा. एरवी आपण सर्वसामान्य अश्व किंवा एक पशू अशीच त्याची गणना करतो. पण सोहळ्यातील वारकरी पशूंनाही देवाच्या रूपात पाहतात. श्रीमंत शितोळे सरकार यांचा तर अश्वावर प्रचंड जीव. अनेक वेळा त्यांनी त्यांचा तबेला पाहायला या, असा आग्रह केला. अंकलीच्या तबेल्यात वर्षभर अश्वांना पोसले जाते. त्यांची तयारी करून घेतली जाते. मारुतीबुवा आणि मानतेश या काळजीवाहकांना सरकारांनी पारखून नेमले आहे. तबेल्यातील अश्वावर आपल्या कुटुंबातीलच सदस्यांप्रमाणे सरकार प्रेम लावतात.तरुण वयात पालखी सोहळ्यात हिरा दाखल झाला तेव्हा त्याला आवरणे कठीण जायचे, पण गेली आठ वर्षे तो माऊलीमय झाला होता. पालखी सोहळ्यातील चार गोल अन् तीन उभ्या रिंगणाच्या माध्यमातून वारकºयांमध्ये चैतन्य फुलविण्याचे काम हिराने केले. हिराचे रिंगण सुरू झाले की संपूच नये असे वाटते. हिराच्या टापा म्हणजे भाविकांच्या नेत्रपटलात साठवून ठेवलेल्या छबी असून, हिरा अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला होता. धावणारे अश्व म्हणजे साक्षात माऊली आपल्यासमवेत खेळत आहेत अशी वारकºयांची श्रद्धा असून, रिंगणाचा खेळ झाल्यानंतर त्यांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी श्रद्धाळूंची उडणारी झुंबड पाहिली की प्राणिमात्रांवर किती आणि कसा जीव लावावा याची शिकवण इथेच मिळते. गेल्या आठ वर्षांत हिराने शेकडो मैलांचा प्रवास केला असून, हिराचे प्रत्येक पाऊल हे त्या मातीला पावन करत गेले आहे. माऊलींचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक या जीवापुढे नतमस्तक होतात. श्रद्धेने त्याच्या पाया पडतात. असे किती श्रद्धाळू त्याने घडविले असतील याची मोजदाद नाही. किती जणांनी त्याच्या पायाची धूळ मस्तकी लावली असेल याची मोजदाद नाही. लाखोंच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिराच्या पायाची धूळ मस्तकी लागावी यासाठी धडपडणाºया भाविकांना हिराचा विरह पोटात कालवाकालव केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी