शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 10:13 IST

७२ वर्षांपूर्वी संविधान सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा आज आठवणे, ही काळाची सर्वात मोठी गरज आहे !

भारतीय राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सुपूर्द करण्याला आज ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यघटना समितीला सुपूर्द करताना संविधान सभेत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भाषण दिले. त्यांचे हे संविधान सभेतील शेवटचे भाषण होते. त्यात डॉ. आंबेडकरांनी केवळ राज्य घटनेचे महत्त्वच विशद केले नाही तर स्वतंत्र भारतासमोर असलेल्या संभाव्य धोक्यांबाबत इशाराही दिला होता. आज शीर्षस्थ राज्यकर्ते संविधानिक संस्थांचा (गैर)वापर करीत असताना डॉ. आंबेडकर यांनी निर्देश केलेल्या संभाव्य धोक्यांचा विचार अधिक सजगपणे करणे आवश्यक आहे.देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने केलेल्या चिंतनातून, संघर्षातून संविधान सभा अस्तित्वात येऊन संविधानाची निर्मिती झाली. संविधानतज्ज्ञ, मानवी हक्क आणि लोकशाहीचे थोर पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. संविधान सभेत प्रत्येक परिच्छेदावर आणि संविधान सभेतील सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांवर त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, विचारणीय आणि दिशादर्शक भाष्य केले. एखादा परिच्छेद किंवा दुरुस्तीच्या संदर्भात डॉ. आंबेडकर यांचा निर्णय अंतिम मानला यायचा. संविधानाबाबतचे त्यांचे प्रचंड ज्ञान आणि बुद्धिमत्तेपुढे सर्वच नतमस्तक व्हायचे.डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना  घटना समितीला सुपूर्द करताना दिलेल्या धोक्यांचे विवेचन करण्याची आवश्यकता ही आज काळाची गरज आहे. देशाच्या हितापेक्षा पंथ किंवा धर्माला अधिक महत्त्व देणे, व्यक्तिपूजा व एखाद्या नेत्याची भक्ती हा हुकूमशाहीकडे हमखास जाणारा मार्ग आहे, याचा इशारा ७२ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता.देशात लोकशाही अधिक दृढमूल करावयाची असल्यास केवळ लोकशाही नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाहीची मूल्ये रुजणे आवश्यक आहे. तरच बळकट लोकशाहीची फळे आपल्याला चाखायला मिळतील. त्याकरिता आपण सामाजिक व आर्थिक विकासाचे ध्येय  गाठले पाहिजे, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटले होते. आजही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आर्थिक व सामाजिक विषमता अधिक खोल होत असल्याचे प्रत्ययास येते.  घटनात्मक मार्गांचा वापर करूनही सामाजिक व आर्थिक प्रगतीचे ध्येय आपण साकारू शकत नाही, त्यावेळी अघटनात्मक मार्गांचा पाया रचला जातो. हे मार्गच पुढे अराजकतेचे व्याकरण ठरते, असा इशारा डॉ. बाबासाहेबांनी दिला होता. आज देशात चहुबाजूंनी होत असलेली आंदोलने अधिक तीव्र रूप धारण करताना दिसतात.  राज्यघटनेच्या चौकटीत राहून या आंदोलकांशी  चर्चा करण्यास मोदी सरकार तयार नसेल तर यातून  पुढील काळात अघटीत घडू शकते. घटना रक्षणाची जबाबदारी असलेले घटनाविरोधी वागतात, सर्व यंत्रणांना वेठबिगार मानतात ही बाब अराजकाला उत्तेजन देणारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भाषणात विरोधकांच्या मतांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे मत मांडले होते. घटना समितीमध्ये काम करताना त्यांनी स्वत: वैचारिक भिन्नतेचा सन्मान केला. या विचारामुळे चर्चा अधिक समृद्ध झाल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले. आज केंद्रातील सरकारला विरोधकांना विचारात घेण्याचे औदार्य दाखवावेसे वाटत नाही. त्यातून लोकशाहीला तडे जाण्याची भीती आहे. विरोधकांचे विचार लोकशाहीला मारक नाहीत, तर लोकशाही समृद्ध करणारे एक आयुध आहे ही धारणा डॉ. आंबेडकर यांची होती. दुर्दैवाने आज एकपक्षीय हुकूमशाही या देशावर लादण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत.या ऐतिहासिक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्तिपूजा लोकशाहीला मारकच नाही तर हुकूमशाहीला जन्म देणारी आहे, असा इशारा दिला आहे. तो आजही प्रासंगिक आहे. डॉ. आंबेडकर यांनी ७२ वर्षांपूर्वी दाखवलेल्या लोकशाहीसमोरील धोक्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर अराजकतेच्या व्याकरणाचा धडा आपल्याला मिळण्याची शक्यताच अधिक. त्याकरिता शासन आणि लोकांनी मिळून लोकशाहीची मूल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न करून लोकशाहीभिमुख समाजव्यवस्था निर्माण करावी. हाच लोकशाही टिकवून ठेवण्याचा खरा मार्ग संविधानाला अपेक्षित आहे. 

 

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनParliamentसंसदIndiaभारत