शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कोपर्डीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:50 AM

कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला.

कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला. मुख्य आरोपीसह त्याला साथ करणाºया दोघांनाही तितकेच दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारांना होणाºया शिक्षेबाबत विधिवेत्ता जॉन सालमंड एक महत्त्वपूर्ण तत्त्व मांडतो. ‘शिक्षा ही फक्त गुन्हेगाराला नसते, तर असे गुन्हे करण्यास पुन्हा कोणी धजावू नये, त्यापासून परावृत्त व्हावेत’ हाही शिक्षेचा मुख्य उद्देश असतो, हे ते तत्त्व आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणाने तो धडा आज संपूर्ण महाराष्ट्राला दिला. यातील मुख्य आरोपीने अत्याचार व खुनाचे अत्यंत घृणास्पद कृत्य केले. इतर दोन आरोपींचा या गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. मात्र, कटात सहभाग असल्याचा दोष ठेवत त्यांनाही फाशी सुनावली. एखाद्या गुन्हेगाराला साथ करण्याची प्रवृत्ती आपणाला थेट फाशीच्या दोरापर्यंत घेऊन जाऊ शकते, हा एक मोठा धडा न्यायालयाने या निवाड्यातून दिला. स्त्रिया आणि मुलींना उपभोगाची वस्तू मानण्याची प्रवृत्ती सनातन आहे. हा रोग पुरुषी मनातून निघायला तयार नाही. बहुधा तो रक्ताचाच एक घटक असावा. या रोगावर अशीच कायदेशीर सर्जरी हवी. कोपर्डी खटला सत्र न्यायालयात चालला. पण, तरीही एक वर्षे चार महिन्यात निकाल हाती आला.गंभीर गुन्ह्यांचा असाच जलद निकाल लागला तर कायद्याचा धाक वाढेल. आरोपी आपल्या बचावासाठी कदाचित उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जातील. तेथेही लवकर निपटारा होणे आवश्यक आहे. कोपर्डी घटना ही राज्यावरील कलंक आहे. घटना जितकी वाईट, तितकीच त्यानंतर निर्माण झालेली सामाजिक तेढही. खरे तर कुठल्याही गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. माणसाची जात त्याला गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करीत नसते. पण, या घटनेला अकारण दलित-सवर्ण वादाचे रूप मिळाले. नगर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांडाच्या प्रकरणात काही उत्साही नेतेगणांनी संपूर्ण मराठा समाजालाच दोषी धरले. याउलट कोपर्डी प्रकरणात झाले. या सर्वच घटनांमुळे सामाजिक विसंवाद निर्माण झाला. कोपर्डीतील पीडितेला न्याय मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा समाज पुढारलेला मानला जातो. पण या समाजाचेही काही मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणात व संघटितपणे समोर आले. यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या शिस्तबद्ध मोर्चांनीही इतिहास निर्माण केला. त्यानंतर इतरही समाजांच्या मोर्चांची मालिका दिसू लागली. प्रत्येक समाजाला आपले प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. मात्र, सामाजिक विसंवाद निर्माण होणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळेच पुन्हा कोपर्डी घडू नये. कुठल्याही जातीधर्माची निर्भया ही महाराष्टÑाची लेक आहे. ही लेक सुरक्षित हवी म्हणून संपूर्ण राज्यानेच कोपर्डीतून धडा घ्यावा. कोपर्डीच्या निकालाची नगरमधीलच खर्ड्याच्या निकालाशी तुलना सुरू झाली आहे. खर्डा हे दलित अत्याचाराचे प्रकरण आहे. त्यात आरोपी निर्दोष सुटणे हे सरकारचे व सर्वच समाजाचे अपयश आहे. त्याचा दोष कुठल्या जातीला नको. कोपर्डी खटल्याचा निकाल हा कुठल्याही जातीचा विजय नाही, तसा कुठल्याही जातीचा पराभवदेखील नाही. कोपर्डीतील अत्याचार ही विकृती होती. न्यायालयाने तिला फाशीची वाट दाखवली. या व्यापक अर्थानेच या निकालाकडे पाहिले पाहिजे. न्यायमनानेच या निकालाचे स्वागत केले पाहिजे.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालयnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रAhmednagarअहमदनगर