शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

कोपर्डीचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:46 IST

कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला.

कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय केला. मुख्य आरोपीसह त्याला साथ करणाºया दोघांनाही तितकेच दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारांना होणाºया शिक्षेबाबत विधिवेत्ता जॉन सालमंड एक महत्त्वपूर्ण तत्त्व मांडतो. ‘शिक्षा ही फक्त गुन्हेगाराला नसते, तर असे गुन्हे करण्यास पुन्हा कोणी धजावू नये, त्यापासून परावृत्त व्हावेत’ हाही शिक्षेचा मुख्य उद्देश असतो, हे ते तत्त्व आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणाने तो धडा आज संपूर्ण महाराष्ट्राला दिला. यातील मुख्य आरोपीने अत्याचार व खुनाचे अत्यंत घृणास्पद कृत्य केले. इतर दोन आरोपींचा या गुन्ह्यांत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. मात्र, कटात सहभाग असल्याचा दोष ठेवत त्यांनाही फाशी सुनावली. एखाद्या गुन्हेगाराला साथ करण्याची प्रवृत्ती आपणाला थेट फाशीच्या दोरापर्यंत घेऊन जाऊ शकते, हा एक मोठा धडा न्यायालयाने या निवाड्यातून दिला. स्त्रिया आणि मुलींना उपभोगाची वस्तू मानण्याची प्रवृत्ती सनातन आहे. हा रोग पुरुषी मनातून निघायला तयार नाही. बहुधा तो रक्ताचाच एक घटक असावा. या रोगावर अशीच कायदेशीर सर्जरी हवी. कोपर्डी खटला सत्र न्यायालयात चालला. पण, तरीही एक वर्षे चार महिन्यात निकाल हाती आला.गंभीर गुन्ह्यांचा असाच जलद निकाल लागला तर कायद्याचा धाक वाढेल. आरोपी आपल्या बचावासाठी कदाचित उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जातील. तेथेही लवकर निपटारा होणे आवश्यक आहे. कोपर्डी घटना ही राज्यावरील कलंक आहे. घटना जितकी वाईट, तितकीच त्यानंतर निर्माण झालेली सामाजिक तेढही. खरे तर कुठल्याही गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. माणसाची जात त्याला गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करीत नसते. पण, या घटनेला अकारण दलित-सवर्ण वादाचे रूप मिळाले. नगर जिल्ह्यात घडलेल्या दलित हत्याकांडाच्या प्रकरणात काही उत्साही नेतेगणांनी संपूर्ण मराठा समाजालाच दोषी धरले. याउलट कोपर्डी प्रकरणात झाले. या सर्वच घटनांमुळे सामाजिक विसंवाद निर्माण झाला. कोपर्डीतील पीडितेला न्याय मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. मराठा समाज पुढारलेला मानला जातो. पण या समाजाचेही काही मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रथमच इतक्या व्यापक प्रमाणात व संघटितपणे समोर आले. यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघाले. या शिस्तबद्ध मोर्चांनीही इतिहास निर्माण केला. त्यानंतर इतरही समाजांच्या मोर्चांची मालिका दिसू लागली. प्रत्येक समाजाला आपले प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. मात्र, सामाजिक विसंवाद निर्माण होणे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. त्यामुळेच पुन्हा कोपर्डी घडू नये. कुठल्याही जातीधर्माची निर्भया ही महाराष्टÑाची लेक आहे. ही लेक सुरक्षित हवी म्हणून संपूर्ण राज्यानेच कोपर्डीतून धडा घ्यावा. कोपर्डीच्या निकालाची नगरमधीलच खर्ड्याच्या निकालाशी तुलना सुरू झाली आहे. खर्डा हे दलित अत्याचाराचे प्रकरण आहे. त्यात आरोपी निर्दोष सुटणे हे सरकारचे व सर्वच समाजाचे अपयश आहे. त्याचा दोष कुठल्या जातीला नको. कोपर्डी खटल्याचा निकाल हा कुठल्याही जातीचा विजय नाही, तसा कुठल्याही जातीचा पराभवदेखील नाही. कोपर्डीतील अत्याचार ही विकृती होती. न्यायालयाने तिला फाशीची वाट दाखवली. या व्यापक अर्थानेच या निकालाकडे पाहिले पाहिजे. न्यायमनानेच या निकालाचे स्वागत केले पाहिजे.

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालयnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रAhmednagarअहमदनगर