शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

निष्ठेचा दीपस्तंभ निमाला

By admin | Updated: November 25, 2014 00:14 IST

मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला.

मुरली देवरा यांच्या काळाच्या पडद्याआड जाण्याने राजकारण आणि समाजजीवनाची बहुआयामी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक जातिवंत उद्योजक हरपला. वाजली तर निष्ठा आणि मोडली तर बंडाळी, अशा बदललेल्या राजकारणातही निष्ठेची ज्योत प्रज्वलित ठेवणारा दीपस्तंभ निमाला. विद्वेषाला थारा न देणारा संयमी, मृदुभाषी नेता गेला. सुसंवादाचा पूल बांधण्याचे व्रत घेतलेला एक दिलदार यजमान अनंतात विलीन झाला. मुंबईसारख्या मायानगरीने तिचा एक अनभिषिक्त राजा गमावला. एका व्यक्तीच्या जाण्याने इतके सारे होणो, ही त्या व्यक्तीच्या बहुआयामी महतीची साक्ष आहे. मुंबईवर दीर्घकाळ आपला प्रभाव ठेवणा:या मोजक्या नेत्यांच्या मांदियाळीत मुरली देवरा यांचे स्थान अढळ होते. काँग्रेसपुरता विचार करावयाचा झाल्यास स. का. पाटील आणि रजनी पटेल यांच्यानंतर मुंबईवर देवरा यांच्याइतकी पकड अन्य कोणत्याही नेत्याला ठेवता आली नाही. 1981 पासून 2क्क्3 सालार्पयत तब्बल 22 वर्षे ते मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. ते किती वर्षे या पदावर राहिले, याच्या बरोबरीने त्या काळातील राजकीय संक्रमणही तितकेच महत्त्वाचे आहे. आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या जनता राजवटीचा अस्त करताना इंदिरा गांधी यांचे नेतृत्व नव्या तेजाने तळपले. त्यानंतर अल्पावधीतच देवरा यांचा मुंबईच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. तेव्हा मिळालेले स्थान त्यांनी अढळपदासारखे निगुतीने जपले आणि जोपासले. दिल्लीपासून गल्लीर्पयत सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांनी ठेवलेले संबंध त्यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा पोत दाखवीत राहिले. संघर्षापेक्षा समन्वयावर अधिक भर देणा:या या नेत्याने यथावकाश जगभरातील अनेक देशांत सुहृद मिळविले. त्यांना मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले तेव्हा ते लोकप्रतिनिधीही नव्हते. किंबहुना 1978ची विधानसभा आणि 198क्ची लोकसभा निवडणूक त्यांना पराभवाची चव चाखवून गेली होती. पुढे देशाचे राजकारण मंडल आणि कमंडलूने ढवळून काढल्याच्या काळात ते अनेकदा लोकसभेवर निवडून गेले. 199क्च्या दशकात दोन निवडणुकांत विजयाने त्यांना हुलकावणी दिल्यानंतर ते सार्वत्रिक निवडणुकांपासून दूर राहिले. पण त्यांचे राजकीय व्यक्तित्व जय अथवा पराजयाच्या तागडीत तोलण्याच्या पलीकडचे होते. जयाचा उन्माद नाही, पराभवाने खचणो नाही, अशी विलक्षण स्थितप्रज्ञता कमावलेल्या या नेत्याने आपले अवघे आयुष्य काँग्रेसला वाहिले होते. स्निग्धता आणि कठोरता यांच्या संतुलनातून साकारलेल्या त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानेही अव्याहत विश्वास दाखविला. नेहरू-गांधी घराण्याच्या नावाचा जप करण्यापेक्षा आपली निष्ठा ते कृतीतून व्यक्त करीत राहिले. काँग्रेसची शताब्दी मुंबईत भव्य स्वरूपात साजरी करताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांच्याकडून विशेष पॅकेज मिळविले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे संपूर्ण परिवारासहित हजर राहणो, ही देवरांच्या वादातीत निष्ठेला मिळालेली मानवंदना आहे. देवरांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ए. आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असे अनेकानेक भिन्न प्रकृतीचे मुख्यमंत्री झाले. त्या कोणाशीही देवरांचा संघर्ष झाला नाही. किंबहुना त्यांनी काँग्रेसचे हित प्रधान मानून त्यात तडजोड न करता व्यापक हितासाठी आवश्यक असलेली समन्वयाची पूरक भूमिका निभावली. उद्योगपतींपासून मुंबईच्या एखाद्या मोहल्ल्यातल्या दरिद्रीनारायणार्पयत कोणीही त्यांच्यार्पयत पोहोचू शकत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे आणि काँग्रेसचे मुंबईतील राजनैतिक दूत ही त्यांची ओळख बनली. संसदीय पातळीवरील चर्चासत्रंपासून मुंबईच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून मोठे अर्थसाह्य मिळविण्यार्पयत अनेक पातळ्य़ांवर ते प्रभावी कार्य करीत राहिले. प्रसारमाध्यमांमधील वार्ताहरापासून संपादक आणि मालकार्पयत स्नेहपूर्ण संबंध असतानाही ते प्रसिद्धीच्या आहारी गेले नाहीत. पत्नी हेमा यांचे मराठीपणही त्यांनी मनस्वीपणो जपले. त्यांचे आयुष्य जगण्याला अर्थ देणारे होते. 
मरणं प्रकृति: शरीरिणां, विकृति: जीवनम् उच्यते बुधै:
मरण ही प्रकृती आहे आणि जगणो ही असाधारण गोष्ट आहे, हा रघुवंशातील सिद्धांत त्यांनी आचरणात आणला, हीच त्यांची महती.