शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कृष्णा-मोहम्मद साथसाथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 08:29 IST

हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.  

वनडे किंवा टी-२० लढतींमधील एकेका चेंडूचा थरार, रोमांच फिका पडावा, अशी झुंज सोमवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या व अखेरच्या सामन्यात शेवटच्या दिवशी क्रिकेट रसिकांनी अनुभवली. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.  

शेवटच्या दिवशी विजयासाठी हव्या अवघ्या ३५ धावा इंग्लंडचे पाच फलंदाज सहज काढतील, अँडरसन-तेंडुलकर चषक पटकावतील, असेच अनेकांना वाटत होते. परंतु, क्रिकेटमधील अनिश्चितता सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ भिडला होता. अकल्पित घडले. भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी, ६ धावांनी विजयाची नोंद झाली. ही मालिका इतिहासात नोंद होईल. पाचही कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यंत रंगले. आयपीएलचा थरार पाठीवर टाकून भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये पोहोचला, तेव्हा अपेक्षा होती की, संघाने किमान स्मरणात राहील, अशी कामगिरी केली तरी भरपूर. कारण, गाैतम गंभीर हा नवा मुख्य प्रशिक्षक, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिल नवा कर्णधार. विराट कोहली, रवीचंद्रन अश्विन नाहीत. सगळे तरुण खेळाडू आणि सामना बॅझबाॅल रूपाने प्रत्येक चेंडू धोपटून काढणाऱ्या इंग्लंडशी. तेव्हा, हा दाैरा फारतर अनुभव देणारा असेल, असेच वाटले. मात्र, गाैतम गंभीरने पोरांना सांगितले, ही ‘यंग टीम’ नाही, तर ‘गन टीम’ आहे, ही खूणगाठ बांधा. तसेच घडले. तरुण तोफांनी असा धमाका केला की, इंग्लिश संघ पुरता निष्प्रभ झाला. ही तरुण पोरे पराभवाने खचली नाहीत. उलट अधिक जाेमाने उसळी मारली. परिणामी, लीड्समध्ये इंग्लंड, बर्मिंगहम येथे भारत, लाॅर्डसवर इंग्लंड, मँचेस्टरला सन्मानजनक बरोबरी आणि शेवटी ओव्हलवर भारताचा दिमाखदार विजय, असा विजयाचा लंबक हेलकावत राहिला. 

झटपट क्रिकेट, चाैकार-षटकारांची आतषबाजी, गोलंदाजांची कत्तल यामुळे कंटाळवाणे वाटणाऱ्या कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळाली. पाच दिवसांची कसोटी हेच खरे क्रिकेट असे मानणारे आता छाती पुढे काढून चालतील. रोज तीस-तीस षटकांची तीन अशी पाच दिवसांत पंधरा सत्रे, क्रिकेट तंत्राचा कस, गोलंदाजांचा हात आणि फलंदाजांचे पाय यावर बेतलेले डावपेच, शारीरिक क्षमता, तसेच मानसिक कणखरपणाचा कस, इकडून तिकडे हेलकावणारे जय-पराजयाचे पारडे, असे संपूर्ण क्रिकेट म्हणजे कसोटी. त्यात हवी जिंकण्याची जिद्द, त्यासाठी प्रचंड परिश्रमाची तयारी व कमालीचा लढाऊ बाणा. तो दोन्ही संघांनी दाखविला. पाय जायबंदी असताना, ऋषभ पंत व हात गळ्यात असताना ख्रिस वोक्स संघासाठी मैदानात उतरला. २० जून ते ४ ऑगस्ट या पंचेचाळीस दिवसांत अनेक विक्रम नोंदविले गेले. खोऱ्याने धावा निघाल्या. भारताकडून बारा व इंग्लंडची नऊ, अशी तब्बल एकवीस शतके ठोकली गेली. १८ शतकी भागीदारी झाल्या. जाे रूट महान खेळाडूंच्या यादीत पुढे गेला, तर शुभमन गिल, ऋषम पंत दिग्गजांच्या पंगतीत विराजमान झाले. कर्णधाराकडून सर्वाधिक धावांच्या बाबतीत शुभमनने ग्रॅहम गुचला मागे टाकले. चार शतकांसह ७५४ धावांसह तो थोर फलंदाज डाॅन ब्रॅडमननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

मालिकेत सर्वाधिक धावांचा सुनील गावस्कर यांचा विक्रम भलेही त्याला मोडता आला नाही; परंतु स्वत: गावस्करच म्हणाले की, कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळून शुभमनची कामगिरी सरस आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय मारा सांभाळताना मोहम्मद सिराजची कारकीर्द बहरली. एखाद्या चुकीने, क्षणाने खेळाडूची कारकीर्द संपते. जावेद मियांदादने ठोकलेल्या षटकाराने चेतन शर्माची कारकीर्द संपली. ओव्हलवर हॅरी ब्रुकचा झेल घेताना सिराज सीमारेषेबाहेर गेला तो असाच क्षण होता. त्या चुकीची भरपाई लढवय्या सिराजने थेट सामना जिंकून केली. भारतीय संघाच्या या कामगिरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, SENA नावाच्या दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया टापूमधील भारतीय संघाची धडक. वेगवान खेळपट्ट्यांच्या या टापूत सामना अनिर्णीत राखला, तरी मोठे समाधान. इंग्लंड दाैऱ्याने ती व्याख्या पार बदलून टाकली. तुमच्या रणांगणावरही आम्हीच जिंकू, भारतीय क्रिकेटची पताका उंचच उंच फडकत ठेवू, हा संदेश ‘गन टीम’ने क्रिकेटच्या जन्मभूमीवर कोरून ठेवला.

टॅग्स :India VS Englandभारत विरुद्ध इंग्लंडIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघMohammed Sirajमोहम्मद सिराजIndiaभारतEnglandइंग्लंड